Home आपलं शहर गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

0
गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर : चकमकीत ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलिस नाईकसह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण ७ जणांना अटक केली असून आणखीन दोन आरोपी फरार आहेत.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पूर्वेकडील गांजा विकणारा व्यापारी समीर सकपाळ (वय ३५) यांचे १४ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.

अपहरणकर्त्यांनी सकपाळ यांना अज्ञातस्थळी नेले आणि आपण पोलीस असून “तुझ्या इनकॉउंटरची ऑर्डर निघाली आहे तुला चकमकीत ठार मारू” अशी धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितली.

यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सकपाळ याच्याकडील ५० हजार रोख रक्कम, भ्रमणध्वनी आणि सोन्याचे लॉकेट असा ऐवज काढून घेतला होता.
नवघर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून ७ जणांना अटक केली.

आरोपी दादासाहेब दिनकर मिसाळ (वय ४१) हा नवी मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर काम करतो.
या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल केले असून ७ जणांना अटक केली आहे,
तर दोन आरोपी फरार आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here