Home आपलं शहर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून बुलढाणा, महाराष्ट्र,विदर्भ या समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य घडले – साहेबराव पाटोळे

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून बुलढाणा, महाराष्ट्र,विदर्भ या समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य घडले – साहेबराव पाटोळे

0
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून बुलढाणा, महाराष्ट्र,विदर्भ या समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य घडले – साहेबराव पाटोळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं.अत्यंत अल्पशिक्षित असले तरी उपजत शाहिरीला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश उपाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी लोणार शहरात काढण्यात आलेल्या मिरवणूकीच्या समारोप वेळी केले.

संजय नगर भागात उर्दू शाळा निर्माण करा; समाज बांधवांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बँड पथक, लाठीकाठी पथक, मल्लखांब पथकांद्वारे कला प्रदर्शन करण्यात करण्यात आले. या मिरवणूकीत शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. खुशालराव मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, नगराध्यक्षा पूनमताई पाटोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष नितीन शिंदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन खरात, नगर परिषद उपाध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद, आबेद खान पठाण, शेख रऊफ शेख महेबुब, रमजान परसुवाले, गुलाबराव सरदार, काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, भरत राठोड, अरुण जावळे, एजाज खान, छगन कंकाळ, प्रवीण नेवरे, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, राहुल मापारी, इम्रान खान पठाण, युवा सेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी, काँग्रेस नेते दौलत मानकर, राहुल मापारी, प्रमोद मापारी, शंकर पाटोळे, रतन पाटोळे, गजानन बाजड, किसन बाजड, गजानन बाजड, श्रावण बाजड, मनीष पाटोळे, ओम पाटोळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

माळीपुरा चौक येथे लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली, यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले व उपस्थितांना फराळ पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, राहुल सरदार, रहमान नवरंगवादी, विठ्ठल घायाळ, गोपाल तोष्णीवाल, किशोर मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here