Home आपलं शहर चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी करत ‘इसरो’चं नवीन मिशन..

चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी करत ‘इसरो’चं नवीन मिशन..

0
चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी करत ‘इसरो’चं नवीन मिशन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आता शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासाच्या तयारीत भारताला चंद्राविषयीची सखोल माहितीही मिळेल. भारत शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासासाठी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणार आहे. ‘इसरो’च्या नवीन मिशनबाबत गुजरातमधील अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक डॉ.अनिल भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, भारत आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. १९७५ मध्ये आर्य भट्ट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर, भारताने अंतराळ विज्ञानात वेगाने प्रगती केली आणि स्वतःचे प्रक्षेपण केंद्र बांधले. आमची चंद्रयान आणि मंगळ मोहीम यशस्वी झाली आहे. भविष्यात आम्ही शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आमचे तंत्रज्ञान विकसित करणार आहोत. जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ म्हणजेच जाक्साच्या सहकार्याने, आम्ही चंद्राच्या गडद ठिकाणी ‘मून लेन्सर’ आणि ‘रोव्हर’ ठेवण्याच्या मोहिमेवर वेगाने काम करत आहोत. या मिशनबाबत जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’सोबत बोलणी सुरू आहेत.

शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ‘इसरो’ ‘जाक्सा’सह करणार हातमिळवणी

उत्तरांचल विद्यापीठात आयोजित ‘आकाश तत्व’ या राष्ट्रीय चर्चासत्रात शेवटच्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांनी आकाशाविषयी विविध पैलूंवर आपली मते मांडली. डॉ.अनिल भारद्वाज म्हणाले की, ‘इसरो’ जपानच्या सहकार्याने चंद्रावरील न उलगडलेले रहस्य शोधण्याचे काम करत आहे. ‘आदित्य एल-वन मिशन’वरही वेगाने काम केले जात आहे. अमेरिकेतील जॉर्ज मेसन विद्यापीठाचे प्रा. जे. शुक्ला यांनी हवामान बदल आणि हवामान अंदाजाची सद्यस्थिती सांगितली.

सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियाकलापांचे परिणाम डीआरडीओ शास्त्रज्ञ अंकुश कोहली यांनी भारतावर पर्यावरणीय बदल आणि विविध भू-आधारित तंत्रज्ञानाच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

आयआयटी मुंबई प्रा. गीता विचारे यांनी सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियांमुळे प्लाझ्माच्या रूपात मोठ्या प्रमाणात रेडिएशन आणि चार्ज केलेले कण आढळून आल्याने सौर वाऱ्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो, याचा भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्यात इतकी ऊर्जा आहे की ते आपली कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस, ऑइल प्लांट, इलेक्ट्रिक ग्रीड यांसारख्या यंत्रणा नष्ट करू शकते.

‘नासा’चे शास्त्रज्ञ डॉ.एन.गोपाल स्वामी यांनी सूर्यावरील जगभरातील संशोधन आणि सूर्यावर घडणाऱ्या घटनांचे पृथ्वीवर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here