Home महाराष्ट्र मराठवाडा लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

0
लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

चाकूर-लातूर, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून मंजुरी मिळून देखील लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित असून हे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, २०१२ – १३ मध्ये लातूररोड नांदेड या १५५ कि. मी.रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती त्यानुसार या रेल्वे मार्गाच्या सर्वेचे काम २०१६ मध्येच पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गासाठी दोन हजार ५२ कोटी ९३ लक्ष अंदाजित खर्चास मंजुरी ही मिळालेली आहे. परंतु अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. हा रेल्वे मार्ग गुलबर्गा ते नांदेड असा असून लातूररोड जंक्शन वरुन अहमदपूर लोहा मार्गे नांदेड जाणार असल्यामुळे या रेल्वे मार्गामुळे प्रवाशी नागरीकाबरोबरच व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा होणार असून व्यायसायिक दृष्ट्या लातूररोड हे औद्योगिक केंद्र बनणार आहे.

त्यामुळे रेल्वेच्या उत्पनातही वाढ होणार आहे. हा रेल्वे मार्ग मराडवाठा विभागाचे भुषण ठरणार आहे. याकरिता या भागातील लोकांची गरज लक्षात घेवून लवकरात लवकर रखडलेल्या लातूररोड नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरु करावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. लातूर रेल्वे स्थानकावर आ. पाटील यांनी सोलापूर विभागाचे रेल्वेचे उपायुक्त एस. सी.जैन, आर.पी.गुजराल, मुकेश लाल, व्ही.पी. चौधरी या अधिकाऱ्यांना निवेदन.दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी जि.प सदस्य दयानंद भाऊ सुरवसे, गणेश फुलारी, सिध्देश्वर अंकलकोटे, अनिल वाडकर, गणपत कवठे, तुकाराम जाधव, बिलाल पठाण, विजय मारापल्ले आदीसह अनेकजण उपस्थित होते.

बाबासाहेब पाटील – लातूर-मुंबई रेल्वे पूर्वीप्रमाणेच तिरुपती विशेष रेल्वे चालू करा!
लातूर ते मुंबई व मुंबई ते लातूर ही रल्वे सध्या आठवड्यातुन चार दिवस सुरु आहे परंतु या रेल्वेसाठी प्रवाशी संख्या जास्तच असल्याने पूर्वीप्रमाणे आठवड्यातून सातही दिवस नियमित रेल्वेसेवा चालू करून प्रवाशांची गैरसोय दुर करावी. तसेच तिरुपतीला जाण्यायेण्यासाठी विशेष लातूर तिरुपती रेल्वे सुरु करुन तिरुपती भक्तांची सोय करावी.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here