Home आपलं शहर ८ वी ते १२वी च्या शाळा सुरु होणार? – राज्य सरकारचा मोठा निर्णय

८ वी ते १२वी च्या शाळा सुरु होणार? – राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
८ वी ते १२वी च्या शाळा सुरु होणार? – राज्य सरकारचा मोठा निर्णय

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाचा वेग मंदावताच अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोरोना काळात बंद राहिलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत आहेत. आता ८ ते १२ वीं पर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ठाकरे सरकारने या संबंधातील निर्णय घेण्यात सरकारच्या बाजूने हा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्रातील शालेय शैक्षणिक विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हि घोषणा केली आहे. मात्र राज्यात ज्या भागांमध्ये सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्याच भागांमध्ये हा निर्णय लागू होईल. १२ ते १५ जुलै मध्ये ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाच्या अंतर्गत कोरोना मुक्त क्षेत्रातील ग्राम पंचायतींच्या अधिपत्त्याखाली येणाऱ्या गावातील शाळांमध्ये ८वी ते १२वी पर्यंत चे वर्ग सुरु करण्यात येतील. परंतु संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार ग्राम पंचायतींना दिले आहेत.
सर्व मुलांना एकत्र बोलावण्यापेक्षा दिवस अथवा तासांची अदलाबदली करून कमीतकमी गर्दी जमेल असे वेळापत्रक तयार करावे जेणेकरून सामाजिक डिस्टंसिंगचे पालन करणे सोपे होईल.

शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एका बेंच वर एका विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, दोन विद्यार्थ्यांच्या दरम्यान ६ फुट अंतर, एका रूम मध्ये १५ ते २० विद्यार्थी संख्या असावी. पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचे नियम पाळणे, मास्क वापरणे, लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना त्वरित घरी पाठवणे, कोरोना टेस्टिंगसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
शालेय स्वच्छता आणि आरोग्य यावर लक्ष देणे आवश्यक. शाळांमध्ये सॅनिटायझर व अनेक गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

तसेच एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर सुरु असेल तर ते त्वरित स्थानांतरित केले जावे आणि शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात यावा. शिक्षकांची कोरोना चाचणी करणेही अनिवार्य करण्यात यावे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here