Home आपलं शहर १ ऑगस्टपासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल – आरबीआय..

१ ऑगस्टपासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल – आरबीआय..

0
१ ऑगस्टपासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल – आरबीआय..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार बँकांनी स्वयंचलित टेलर मशिन्सवर अर्थात ‘एटीएम’ वर शुल्क आकारू शकणार्‍या ‘इंटरचेंज फी’ मध्ये वाढ केली आहे. १ ऑगस्टपासून २ रुपयांची वाढ दिसून येईल. ‘आरबीआय’ने जूनमध्ये इंटरचेंज फी १५ ते १७ रुपयांनी वाढविली तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी फी ५ रुपयांवरून ६ पर्यंत वाढविण्यात वाढ केली. आरबीआयच्या मते, ही फी बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे देयकांसाठी (पेमेंटसाठी) केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून घेतली जाते. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीएम मधून दरमहा पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र असतील.

काय आहेत बदल ?

१ऑगस्ट २०२१ पासून, व्यावसायिक बँकांना सर्व व्यवहारांमध्ये १५ ते १७ रुपये व सर्व केंद्रांमधील बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढीस परवानगी दिली जाईल. आरबीआयने बँकांना पुढील वर्षापासून मोफत मासिक परवानगी मर्यादेपलीकडे रोख आणि विना-रोकड ‘ए.टी.एम’ व्यवहारासाठी शुल्क वाढविण्यास परवानगी दिली आहे. “जास्त इंटरचेंज फी ची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सर्वसाधारण वाढ झाल्यास त्यांना ग्राहकांच्या शुल्कामध्ये प्रत्येक व्यवहारांसाठी २१ रुपये करण्याची परवानगी आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल”, असे ‘आरबीआय’ने सांगितले. रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की, बँक ग्राहकांनी मोफत व्यवहाराची मासिक मर्यादा ओलांडल्यास त्यांना १ जानेवारी २०२२ रोजी २० रुपयांऐवजी २१ रुपये प्रत्येक ट्राजेंक्शनसाठी द्यावे लागतील. तथापि, बँक ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँक एटीएम मधून दरमहा पाच विनामूल्य ट्राजेंक्शनसाठी पात्र आहेत.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here