Home गुन्हे जगत काशिमीरा पोलिसांनी केली भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात ३ आरोपींना अटक..

काशिमीरा पोलिसांनी केली भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात ३ आरोपींना अटक..

0
काशिमीरा पोलिसांनी केली भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात ३ आरोपींना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.
२१ जुलै ला दुपारी ३ ते रात्री १०.१५ च्या दरम्यान भाईंदर ला राहणाऱ्या श्री.लाला सुग्रीव वर्मा ह्यांच्या पत्नी सौ. सुमन ह्या घरात एकट्या असतानां अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून,गळाआवळून त्यानां जीवे ठार मारले.
त्यांच्या अंगावरील ३५,८०० रु. किंमतीचे सोन्याचे दागिने, बॅगेत असलेले आधार कार्ड, एटीएम कार्ड, इस्त्री आणि साऊंड बॉक्स असे सामान लुटून नेले,याबाबत काशिमीरा पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.

ह्यात कोणताही पुरावा आणि धागेदोरे नसताना पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक माहिती वरून, तांत्रिक तपास आणि विचारपूस याच्या आधारे, ३ आरोपीना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे, त्यांनी गुन्हा कबूल केला असून पुढील तपास चालू आहे असे काश्मीरा पोलिसांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here