Home आपलं शहर कल्याणच्या महात्माफुले चौक पोलिसांनी उबेर चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना शिताफीने केली अटक..

कल्याणच्या महात्माफुले चौक पोलिसांनी उबेर चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना शिताफीने केली अटक..

0
कल्याणच्या महात्माफुले चौक पोलिसांनी उबेर चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना शिताफीने केली अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकतीच भिवंडीतील माणकोली पुलाखाली ‘ओला टॅक्सी’ चालकाची हत्येची बातमी ताजी असताना ‘उबेर टॅक्सी’ चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

अमृत सिद्धराम गवारे राहणार ऐरोली, नवी मुंबई, हे दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११:३० वाजता च्या सुमारास कल्याण शिवाजी चौक ते धुळे असे प्रवासी भाडे घेऊन गेलेला असून अद्याप परत आलेला नाही. अशी तक्रार प्रमोदकुमार रामलाल गुप्ता राहणार ऐरोली, यांनी नवी मुंबई पोलीस ठाण्यात जाऊन दिली. त्यांच्या या तक्रारी वरून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग प्रमाणे ३ ऑगस्ट २०२१ प्रमाणे तक्रार दाखल झाली.

या तपासा मध्ये सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल च्या आधारे आरोपींनी ‘एर्टिगा’ कार चोरी करून उत्तरप्रदेश मधील भदोई येथे कार घेऊन गेल्याचा सिद्ध झाले ह्या घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ -३ कल्याण चे मा.पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे यांची परवानगी व मार्गदर्शन घेऊन गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले व त्यांचे पथक उत्तर प्रदेश भदोई येथे पाठवले. मोबाईल मधून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ३ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून चोरी करून नेलेली ‘एर्टिगा’ कार ताब्यात घेतली. तसेच कसून चौकशी केले असता, त्यांनी ड्राइवर चे हात पाय बांधून त्याच्या छातीवर व गळ्यावर वार करून त्याला ठार मारून कसारा घाटात फेकून दिल्याचे सांगितले .त्या नंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन पत्रे व पथक ने आरोपींनी सांगितल्या प्रमाणे ड्राइवर च्या प्रेताचा कसारा घाटात शोध घेतला असता १० ऑगस्ट २०२१ रोजी ड्राईव्हर चे प्रेत मिळाले. मयताच्या प्रेतावर जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे पोस्टमोर्टम करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले व त्यांचे पथक यांनी उत्तर प्रदेश मधील भदोई जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोपींचा शोध घेऊन ३ आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेली ‘एर्टिगा’ कार ताब्यात घेतले त्या नंतर आरोपी १) राहुलकुमार बाबूराम गौतम २) धर्मेंद्रकुमार उर्फ वकील संपतराम गौतम ३) हरीशचंद्र उर्फ अमन रमाकांत गौतम याना ११ ऑगस्ट २०२१ रोजी ह्या ३०२ च्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मयत इसमाचा मोबाईल फोन,आधारकार्ड, पॅनकार्ड, मास्टरकार्ड, आर.सी.बुक, रेल्वेची पावती जप्त करण्यात आली आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here