Home आपलं शहर मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या सभे विरोधातील जनहित याचिका फेटाळली..

मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या सभे विरोधातील जनहित याचिका फेटाळली..

0
मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या सभे विरोधातील जनहित याचिका फेटाळली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या सभे विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

या सभेवर बंदी घालावी किंवा सभेचे थेट प्रक्षेपण न करता त्यांनी केलेले भाषण न्यायालय व पोलीसांनी तपासावे व नंतर त्याचे प्रक्षेपण करावे अशा मागणीची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी दाखल केली होती.

काल दुपारी याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना १ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील ३ दिवसात दंडाची रक्कम भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here