Home आपलं शहर राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..

0
राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातून निवडून देण्याच्या सहा जागांसाठी आज २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले मात्र दोन्ही बाजूने घेतलेल्या हरकतींमुळे मतमोजणी आणि निकाल रात्री उशिरा पर्यंत लांबला होता.

सहा जागांसाठी सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाले. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने ही परवानगी नाकारल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. मात्र भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन्ही आजारी आमदारांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे सुहास कांदे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष रवी राणा यांनी केलेल्या मतदानावर दोन्ही बाजूने आक्षेप घेतला गेला मात्र निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी तो फेटाळून लावला, तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली. तिथून निर्णय येण्याची प्रक्रिया रात्री उशीर होऊनही पूर्ण न झाल्याने याबाबतची मतमोजणी आणि निकाल दोन्हीही लांबले.

नियोजीत वेळापत्रक प्रमाणे सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती मात्र रात्री साडे नऊ वाजून गेले तरीही ती सूरु झाली नव्हती यावरून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या धामधूमित शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात कोण विजयी ठरतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here