Home महाराष्ट्र कोकण कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये समाधान

कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये समाधान

0
कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये समाधान


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात राज्यात ९७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी राज्यात १०७६ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७९,५४,०५२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे आणि सध्या कोरोना संक्रमित सक्रिय रुग्ण ७,०६७ आहे.

मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची सर्वाधिक संख्या २०८५ असून राज्यात सध्या ७,०६७ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात १,५३२ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे- १,७२१, पालघर १५८ , रायगड २८१ , नाशिक १८६ , नागपूर १३८ आणि चंद्रपूरमध्ये १६१ सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. यवतमाळमध्ये सध्या फक्त चार सक्रिय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये पाच तर परभणीमध्ये सहा सक्रिय रुग्ण आहेत. बीड आणि गोंदिया जिल्ह्यात सात सक्रिय रुग्ण आहेत अशी माहिती मिळाली आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here