Home आपलं शहर कर्जवाटप करताना नवीन उद्योजकांचे खच्चीकरण केल्यास बँकांवर होणार कायदेशीर कारवाई – उद्योगमंत्री उदय सामंत

कर्जवाटप करताना नवीन उद्योजकांचे खच्चीकरण केल्यास बँकांवर होणार कायदेशीर कारवाई – उद्योगमंत्री उदय सामंत

0
कर्जवाटप करताना नवीन उद्योजकांचे खच्चीकरण केल्यास बँकांवर होणार कायदेशीर कारवाई – उद्योगमंत्री उदय सामंत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांस्कृतिक उपराजधानी असे नावलौकिक असलेल्या डोंबिवलीत ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ च्या माद्यमातून आणि एमआयडीसी च्या सहकार्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.

सर्व कागदपत्राची पुर्तता केलेल्या नवीन युवा उद्योजकाला जर बँक कर्ज देण्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत असेल व त्याचे खच्चीकरण करत असेल तर अशा युवा उद्योजकांच्या पाठीशी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार ठाम उभे असून अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी कार्यक्रमात दिला.

तर गेल्या अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले याची मी उद्या यादीच जाहीर करतो असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याच कार्यक्रमात पुढे बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे की उद्योजकांच्या प्रगतीसाठी व त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही जो शब्द द्याल तो मी दिला आहे असे समजेन व आपण तो पूर्ण करू असे सांगितले. एक संकल्प करत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योजकाला कुठलाही त्रास होणार नाही हे उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे त्यावर आमचे नियंत्रण देखील असेलच . उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर सरकार च्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

‘कामा’ संघटनेतील उद्योजकांना भेटणारे उदय सामंत हे पहिले उद्योगमंत्री

कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) ही संघटना १९५८ पासून अस्तित्वात असून डोंबिवली एमआयडीसी येथे कार्यरत आहे. कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारे उदय सामंत हे पहिले उद्योग मंत्री ठरले आहेत. “कालपासून जे सारखे टीका करत आहेत त्यांनी सांगावं की ते कितीवेळा या ठिकाणी आले ? त्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपली जबाबदारी स्वीकारली तर काम सोपे होते. तीच जबाबदारी घेत मी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आहे.” असे ते बोलताना म्हणाले.

कामगारांना भविष्यात न्याय देण्यासाठी योग्य भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामा संघटनेच्या भेटीदरम्यान दिले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अमबलगन उपस्थित होते व त्यांनी उदय सामंत यांना विघनहर्ता श्री गणेशाची मूर्ती देत कोरोना कालावधी नंतरचे उद्योजकांचे सगळे विघ्नांचे निराकारण करावे याकरिता साकडे घातले.

तत्कालिन मंत्र्यांनी येथील कंपन्या स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला होता तो नेमका काय आहे ते तपासावे लागेल . यासंदर्भात येथील उद्योजकांशी बोलावे लागेल. जर खरोखर यात तथ्य असेल तर पाऊल उचलावे लागेल. वेदांताची हाय कमिटीची मीटिंग सहा महिन्यांपूर्वी लावणे गरजेचे होते पण ती मीटिंग लावली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ती मीटिंग दोन महिन्यांपूर्वी लावली. मात्र आधीच सहा महिने त्यांना उशीर केल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासन व सरकारतर्फे करण्यात येईल. ‘गर्व से कहो हंम हिंदू है’ हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही तर हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच दिला होता, मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण विसरले आहेत असे ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांदरम्यान म्हणाले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here