Home आपलं शहर तरुणांनी ‘पोलीस भरती झालीच पाहिजे !’ म्हणत उपमुख्यमंत्र्यांसमोरच केली जोरदार घोषणाबाजी..

तरुणांनी ‘पोलीस भरती झालीच पाहिजे !’ म्हणत उपमुख्यमंत्र्यांसमोरच केली जोरदार घोषणाबाजी..

0
तरुणांनी ‘पोलीस भरती झालीच पाहिजे !’ म्हणत उपमुख्यमंत्र्यांसमोरच केली जोरदार घोषणाबाजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रखडलेली भरती पूर्ण करावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांची भेट घेऊन काहीही न बोलता निघून गेले. विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने पोलिसांनी येथे घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना घेराव घातल्याचे दिसून आले.

दरम्यान, नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना या दिवशी आरोप करून दिवसाला महत्त्व देऊ नका, असे सांगितले. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबादमध्ये नेहमीच्या वेळेपूर्वी ध्वजारोहण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचा अवमान केल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

“हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही. आजच्या दिवशी राजकारण करू नये.” असे देवेंद्र फडणवीस येथे बोलताना म्हणाले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here