Home आपलं शहर निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

0
निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

भाईंदरसह देशभरात 1100 ठिकाणी राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
स्वच्छ जलाबरोबरच स्वच्छ मनाचीही आवश्यकता आहे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.
या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.

या परियोजनेच्या अंतर्गत मुंबईलगत असलेल्या मीरा भाईंदर येथील उत्तन समुद्र किनाऱ्यावर हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये 600 पेक्षा अधिक निरंकारी सेवादल व अन्य भक्तगणांनी भाग घेतला. याप्रसंगी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह उपायुक्त रवी पवार, उपायुक्त शरद नानेगांवकर आणि मीरा भाईंदर भाजपा जिलाध्यक्ष रवी व्यास आदि मान्यवरांनी उपस्थित राहून मिशनच्या कार्याचे कौतुक केले तसेच स्वत: साफसफाई करत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.

या व्यतिरिक्त मुंबईसह नवी मुंबई, ठाणे जिल्हा व उरण परिसरात व्यापक स्वरूपात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ठाणे शहरातील स्वच्छता कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मध्य प्रदेशमधील जिल्हाधिकारी नवजीवन पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आदिंचा समावेश होता. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव येथे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी स्वच्छता अभियानास भेट देत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बदलापूर येथे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील उपस्थित राहून मिशनच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे वर्जित होत्या.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here