Home आपलं शहर राज्यातला पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर..

राज्यातला पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर..

0
राज्यातला पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले आणि सकाळी लवकर फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला होता .

हा निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खुलासा नुकताच फडणवीसांनी करीत एकच खळबळ उडवून दिली होती, त्यावर थेट नकार न देता शरद पवार यांनी फडणवीस हे हुशार व्यक्ती आहेत मात्र ते असे काही बोलतील अशी अपेक्षा आपल्याला नव्हती असे सांगत नेहमीप्रमाणे गूढ वाढवले होते.

पुन्हा पवारांनी यावर भाष्य करीत त्यावेळी लागलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी हा विषय झाल्याचे सांगत याबाबतच्या चर्चेला पुन्हा हवा दिली तर ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत कोणी कोणाच्या भेटी घेऊन काय सांगितलं तेही पवारांनी सांगावे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी देत या विषयाला पुन्हा रंगतदार वळणावर आणले आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here