Home देश-विदेश बिहार मध्ये ७३ मृतदेह नदीतून काढले बाहेर

बिहार मध्ये ७३ मृतदेह नदीतून काढले बाहेर

0
बिहार मध्ये ७३ मृतदेह नदीतून काढले बाहेर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये, देशातील काही शहरांमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे धक्का बसेल. बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये नदीतून कोरोनाबाधित ७३ मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिहार सरकारच्या म्हणण्यानुसार, बक्सर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ मृतदेह गंगेमधून काढण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे त्यांचा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम अंत्यसंस्कार न केल्यामुळे हे मृतदेह गंगा नदीत फेकल्या गेल्याची शक्यता आहे. आता चौसा गावातील महादेव घाट येथे जेसीबी ने खणून हे मृतदेह पुरण्यात येत आहे.

बिहारचे जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी बक्सर जिल्ह्यातील चौसा गावाजवळील गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, गेल्या ४-५ दिवसांत हे मृतदेह शेजारील उत्तर प्रदेशातून वाहून गेले आणि बिहारपर्यंत आले. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळाल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढे मृतदेह सापडल्याने गंगा नदीच्या स्वच्छता आणि सुरळीत प्रवाहाबद्दल नेहमीच चिंतेत आहेत. असंख्य मृतदेह वाहून आल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागला आहे, असे मंत्री संजयकुमार झा यावेळी बोलताना म्हणाले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here