Home आपलं शहर जनतेचा कौल होता म्हणून शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेचा कौल होता म्हणून शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जनतेचा कौल होता म्हणून शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“आम्ही कुणासोबत युती केली, २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आमचं काही चुकलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली आणि जनतेचाही हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीने सरकार स्थापन करावे. पण समीकरण बदलले, दुसरे सरकार आले, आम्ही ते दुरुस्त केले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले.

आज जनता आनंदी आहे. २०१९ मध्ये जे व्हायला हवे होते ते आम्ही आता केले. २०१९ मध्ये जे काही झाले ते कोणालाच आवडले नाही. मतदारांनी युतीला कौल दिला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आता यानंतर अनेकांनी फोन करून माझे अभिनंदन केले आहे. अनेकांनी मला सांगितले, आम्ही युतीला मतदान केले. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे असे नवनवीन प्रयोग करताना आम्हाला ते विश्वासात घ्यावे लागले. आमची मते घेऊन फसवणूक केली. त्यामुळे अनेकांनी मला सांगितले की आज आपण खूप आनंदी आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.

…म्हणून हे काम केलं नाही..

गेल्या वर्षी गणपतीला काय विनंती केली असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. “मी नेहमीच या महाराष्ट्रातील लोकांना सुखी कर. या राज्यावर कोणतेही संकट येऊ नये, असे म्हणत कोणत्याही निकालाची अपेक्षा न करता मी मेहनत करत राहिलो. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, त्यामुळे मी हे काम केले नाही.” तत्पूर्वी बोलताना शिंदे म्हणाले की, दीड दिवसांच्या गणपतीमध्ये आपण किमान २५० लोकांच्या घरी भेटी दिल्या असून या भेटी अजूनही सुरूच आहेत आणि अनंत चतुर्दशी पर्यंत सुरूच राहतील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here