Home आपलं शहर ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ च्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गीत रामायण आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यरुपांतर सादर..

‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ च्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गीत रामायण आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यरुपांतर सादर..

0
‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ च्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गीत रामायण आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यरुपांतर सादर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जान्हवी मल्टी फाउंडेशन च्या डोंबिवली पश्चिम येथील जन गण मन शाळेच्या प्रांगणात श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत नाट्यरूपात सादरीकरण करण्यात आले. सीतामाई, लक्ष्मण, हनुमानजी, लव कुश आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ढोल ताशामध्ये अश्व रथातून आगमनाच्या उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे तसेच ज्ञानेश्वरीवर पीएचडी केलेल्या डॉ. सौ.अनुराधा सुधीर कुलकर्णी, ब्रह्मकुमारीचे माउंटअबू वरून खास उपस्थित असलेले डॉ. कुमार वैद्य, सौ.चारुलता गुजराती असे अनेक मान्यवर या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होते.

सुमारे २०० कलावंत आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रेक्षक तसेच पत्रकार बंधू-भगिनी यांच्या साक्षीने नाट्यमय, रंगारंग आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आपला छंद जोपासला पाहिजे आणि डिजिटल डॉट्स ही संकल्पना। मांडली. रोज सायंकाळी सात ते आठ वाजता आपण सर्वांनी दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी म्हणजेच ‘डिजिटल वर्ल्ड’ पासून दूर राहावे म्हणजेच त्याचा वापर एक तासासाठी करूच नये आणि या वेळात आपला छंद जोपासावा असे सांगितले. भविष्यात संस्थेत सम्राट अशोक, महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील असेही ते म्हणाले.

डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष बजरंग वाळुंज आणि ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांचा सत्कार डॉ. कोल्हे यांनी केला. पत्रकार नरेंद्र थोरावडे, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक अवधूत सावंत, अनघा पाटील, मीनल पवार, आयूषी विचारे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे यांची होती आणि ती कल्पना प्रत्यक्षात साकाराण्यासाठी श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे आणि सर्व जेएमएफ परिवारातील सदस्य यांनी अथक प्रयत्न केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांनी बग्गीमध्ये बसण्याचा मनमुराद आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ने झाली.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here