Home Blog Page 103

दसऱ्या मेळाव्यात शिंदे यांनी दाखवून दिले खरी शिवसेना कोणती ते..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काल शिवसेनेच्या दोन्ही गटांची भाषणे ऐकली नाहीत मुंबईतील दसरा मेळाव्यातली, मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने व्यस्त होतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण आता ऐकले. शिंदेंनी दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती खरी ते, शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच हे त्यांनी सिद्ध केलं असे फडणवीस म्हणाले. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलले याबद्दल त्यांचं अभिनंदन असेही फडणीसांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं, त्यामुळे शिमग्यावर काही बोलणार नाही असे ते म्हणाले. शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान दुप्पट मोठं असून बीकेसी मध्ये प्रचंड गर्दी होती असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील निवडणुकांत देखील विधानसभेवर भगवा फडकणार आहे पण तो खऱ्या भाजप-सेना युतीचा फडकणार आहे असे फडणवीस पुढे म्हणाले.

कालच्या शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजप ची म्हणणाऱ्यांनी स्क्रिप्ट बदलला पाहिजे, ते पुन्हा पुन्हा तेच बोलताहेत. अजित पवार काय म्हणाले मला माहित नाही. पण मूळ सेनेचा विचार बाजूला टाकला सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत गेले म्हणूनच शिवसेनेत फूट पडली असे सांगून मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरे कायम पक्ष प्रमुख म्हणूनच बोलले अशी टीका फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कामा’ संघटनेच्या वतीने अपघातातील आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची प्राथमिक काळजी व उपाय योजना यासाठी सराव प्रात्यक्षिकेचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील एमआयडीसी येथे २०१६ साली ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेल्या स्फोटाला काळ उलटला तरी त्या अपघातात सापडलेल्या अपघाती लोकांना सरकारकडून अध्याप मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती असताना पुन्हा अश्या दुर्घटना होऊ नयेत व झाल्यास काय उपाय योजना व कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची काळजी ‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’ (कामा) संघटने च्या वतीने आपत्कालीन वाहीका नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. ही वाहीका योग्य पद्धतीने काम करते की नाही हे पाहण्यासाठी कामा संघटना आणि औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने घेतली असून सराव प्रात्यक्षिकेचे अर्थात ‘मॉकड्रिल’ चे आयोजन करण्यात आले होते.

 

मात्र यावेळी पाण्याचे टँकर उशिरा येणे, रुग्णवाहिका उशिरा पोहोचणे या त्रुटी जाणवल्यामुळे खरी घटना घडेल त्यावेळी या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी कल्पना आली असून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू अशी माहिती प्रशासकीय औद्योगिक सुरक्षा कल्याण सह-संचालक विनायक लोंढे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

डोंबिवली एमआयडीसी येथील परिसर नेहमीच वादाच्या चर्चेत असतो. या परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने घडत असतात. यापैकीच एक आठवणीत ताजी राहणारी दुर्घटना म्हणजे ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेला बॉयलर चा स्फोट. कंपनीत लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला होता आणि अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ‘मेट्रोपॉलिटन कंपनी’ मध्ये देखील अशाच प्रकारची आग लागली होती. मात्र सुदैवाने त्यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. आपत्कालीन वाहीका सुरू केली असून यामध्ये जनरेटर , ऑक्सिजन, फर्स्टएडबॉक्स, स्ट्रेचर्स, मोठेमोठे पाईप, आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा फोम आधी गोष्टींची सुविधा या वाहीकेमध्ये उपलब्ध केली आहे. ही वाहिका नेमकी कशा पद्धतीने कार्यरत आहे हे बघण्यासाठी त्यांनी गुरुवारी दुपारी सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) केले.

औद्योगिक विभागातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील खुल्या जागेत आग लावण्यात आली. आगीमध्ये नाट्य सदृश्यतील काही घायाळ जखमी कामगारांवर प्रथमोपचार व आगीवर नियंत्रण करण्याची तसेच कंट्रोल सेंटर आणि ऑनसाइट अत्यावश्यक वाहन यांच्यासह पाणी आणि पंपच्या माध्यमातुन त्याचा वापर करून आग विझवणे व जखमींना इमर्जन्सीची परिस्थिती कशी हाताळावी व रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवायची याची सुद्धा प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली. यामध्ये वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे निदर्शनास आले. या आधी देखील अनेक वेळा वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा समिती कल्याणचे सह-संचालक विनायक लोंढे यांनी आहे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असून वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत कशी उपलब्ध करता येईल या संदर्भात कामा संघटनेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आल्यामुळे हे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगीची घटना तसेच वायुगळती अश्या आपत्कालीन परिस्थितीला प्राथमिकता कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबी होऊन कसे सामोरे जाता येईल व परिस्थिती कश्या प्रकारे आटोक्यात आणता येईल यासाठीच मॉक ड्रिल म्हणजेच सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. या प्रत्यक्षिका मध्ये दुर्घटना होऊन आग लागल्यास ती विझवण्या प्राथमिकतेने घ्यावयाच्या काळजीबद्दल काही प्रात्यक्षिके दाखवली गेली. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने त्याच्यामध्ये जे होणारे अपघात आहेत त्याच्यावर उपाय योजना काय आहेत आणि कशाप्रकारे हे अपघात कमी करता येतील यांच्यासाठी मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले व घेतलेल्या सराव प्रात्यक्षिकाने समाधानी असून राहिलेल्या उर्वरित त्रुटींची लवकरच पूर्तता करून पुन्हा असेच सराव प्रात्यक्षिक करू असे ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

प्रियांका भोसलेचे दोन अनमोल रतन अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी! दोघे मिळून करतात अनधिकृत बांधकामांची तोडपाणी?

बांधकाम धारक प्रजापती म्हणतो दीड लाख दिले! हिंमत असेल तर बांधकाम तोडून दाखवा!

भाईंदर, प्रतिनिधी: अमोल मेहेर, कृष्णा थंडापाणी ये मेरे दो अनमोल रतन! असे म्हणत सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले यांनी प्रभाग समिती कार्यालय क्र. 01 मधील सफाई कर्मचारी अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामावरील नवीन वसुली बाज म्हणून नियुक्त केल्याचे आता शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग प्रभाग समिती क्र. 01 च्या भाईंदर पश्चिम उत्तन धावगी येथील सरकारी जमिनीवर प्रजापती नावाच्या व्यक्तीकडून दोन गाळ्याचे अनधिकृत बांधकाम वाचवण्याकरिता स्वतःच प्रभाग अधिकारी म्हणून प्रभागात फिरणारे अमोल मेहेर व कृष्णा थंडा पाणी यांनी आयुक्त व उपायुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून चक्क दीड पेटीची वसुली करून पालिकेला विक्रमी निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामगिरीत प्रियांका भोसले यांचे मोलाचे सहकार्य असल्याने या दोन अनमोल रत्नांकडून सांगण्यात येत आहे. आणि म्हणूनच गाळा मालक प्रजापती म्हणतो “हिंमत असेल तर माझे व्यावसायिक अनधिकृत गाळे तोडून दाखवा”

मेरा प्रभाग, मेरा बांधकाम, मेरा वसुली बाज अनमोल रतन (अमोल मेहेर) बोलणाऱ्या प्रियांका भोसले यांनी आता चक्क उपायुक्त यांच्या नावाचा सर्रास गैरवापर चालू केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रभाग कार्यालयातील कर विभागातील काही कर्मचाऱ्यांना भोसले यांनी अनधिकृत बांधकामाची वसुली करण्यासाठी निवड केल्याची चर्चा महापालिका परिसरात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परीसरात ना-विकास क्षेत्र आणि इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले 350 रु. प्रति चौ. फूट घेत असल्याचे आरोप काही स्थानिक वर्तमानपत्रातून या आधी देखील केले गेले आहेत. त्यामुळे आता त्या महानगरपालिकेला मोठया प्रमाणात निधी मिळवून देऊन मोठा आर्थिक फायदा करून देणार आहेत अशी चर्चा पालिका वर्तुळात चालू आहे.

या कामगिरीत प्रियांका भोसलेचे दोन अनमोल रतन अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात असून पालिका आयुक्त दिलीप ढोले त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन मोठा सन्मान करतील का? असा सवाल सामान्य नागरिकांडून केला जात आहे.

डीआरआयने ११.६५ कोटीचे २३.२३ किलो सोने ईशान्य सीमेवरून ४ जणांना अटक करून केले जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून सोन्याच्या तस्करीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील सीमांचा वापर तस्करीसाठी केला जात होता. सप्टेंबर २०२२ या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ११ कारवायांमध्ये एकूण १२१ किलो सोने जप्त करण्यात आले. यावरुन हे दिसून येते की ईशान्य कॉरिडॉर मार्गाचा वापर तस्करांकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

विशिष्ट गुप्त कारवाई अंतर्गत पाटणा, दिल्ली आणि मुंबई येथील तीनही केंद्रांच्या समन्वयाने, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने ३३.४० कोटी रुपयांचे विदेशात निर्मित ६५.४६ किलो सोने जप्त केले. हे सोने आयझॉल येथून देशांतर्गत कुरिअर मार्फत मुंबईत पाठवण्यात आले होते. कपड्यांच्या म्हणून जाहीर केलेल्या गोण्यांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते.

त्याच मार्गाने तस्करीच्या आणखी एका प्रकरणात, विदेशात उत्पादन केलेल्या सोन्याचा तस्करी करून आणलेला एक मोठा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला. या साठ्याचे वजन अंदाजे २३.२३ किलो आहे तर त्याची किंमत अंदाजे ११.६५ कोटी रुपये असून या साठ्याची म्यानमारमधून तस्करी केली जात होती. विदेशात निर्मित हा सोन्याचा साठा चंफई- आयझॉल, मिझोराम येथून कोलकाता, पश्चिम बंगाल येथे वाहनात नेऊन लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पुरावे विशिष्ट गुप्तचरांनी सादर केले होते.

ही तस्करी रोखण्यासाठी २८-२९ सप्टेंबर २०२२ रोजी समन्वित कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सिलीगुडी आणि गुवाहाटीला जोडणाऱ्या महामार्गावर पाळत ठेवली. २ संशयित वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात आले. २ दिवसांच्या कालावधीत दोन्ही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर, वाहनाच्या विविध भागात २१ दंडगोलाकार तुकड्यांमध्ये लपवून ठेवलेले २३.२३ किलो सोने जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात सोने दोन्ही वाहनांच्या मागच्या चाकांच्या मागे असलेल्या चेसीच्या उजव्या आणि डाव्या रेल्सला जोडणाऱ्या क्रॉस-मेम्बर मेटल पाईपच्या आत खास बनवलेल्या पोकळीत आणि सस्पेंशनमधे बसवण्यासाठी सोन्याचा विशिष्ट आकार देण्यात आला होता. जप्त केलेले सोने म्यानमारमधून मिझोराममधील झोखावथार सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

येरे येरे पावसा तुला देतो पैसा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ पासून गेल्या वर्षांपर्यंतचे ‘मेरा यार हस राहा हैं बारिश की जाये..’ अशी पावसाबद्दलची सगळी गाणी कविता आपण ऐकत आलो आहोत. देशाच्या राजकारणात मात्र पावसाबद्दलच्या संवेदना अगदी समसमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणू नका, शिवसेना म्हणू नका की, अगदी काँग्रेस पक्ष म्हणू नका, राजकीय पक्षातील नेत्यांना पाऊस यावासा वाटतो, असेच दिसते. मागच्या निवडणुकीत ज्यांना खरंच आरामाची गरज आहे, असे वयोवृद्ध शरद पवार यांनी पावसात भिजत भिजत भाषण केले. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हावी, तसेच झाले. त्यानंतर कुठच्या तरी कोपर्‍यात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा वर तरला. त्यानंतर मग काही विचारता सोय नाही. जो तो राजकीय नेता पावसात भिजून भाषण करू लागला. आता या वर्गवारीत राहुल गांधी यांनीही वर्णी लावली आहे. तोच तो एकसारखा सगळ्यांचा फोटो.. पाऊस धिंगाणा घालतोय, लोक हैराण आहेत. पण, नेते पावसात चिंब भिजून कडक भाषण करत आहेत. नेत्यांना वाटत राहते की, ते पावसात भिजले की, लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटते. मग त्यांचा जनाधार वाढतो. खरेच हे खरे आहे का ? मुळात पाऊस आल्यावर त्यापासून वाचण्यासाठी स्वतःसकट उपस्थित सर्वच श्रोत्यांना छत्री उपलब्ध करून द्यायची आर्थिक कुवत या नेत्यांमध्ये असते. किती जणांना छत्री देणार, हा प्रश्न असेल तर सभेच्या ठिकाणी ताडपत्री लावण्याचे नियोजनही हे नेते किंवा त्यांच्या सभेचे आयोजक करू शकतात. पण, काय करावे ? पावसात भिजून भाषण केले नाही तर नेतेपद मिळणार नाही, अशी अंधश्रद्धा नेत्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे पावसात भिजून भाषण ऐकण्यात उपस्थित श्रोत्यांना खूप चांगले वाटत असेल का ? शक्यच नाही. अर्थात, एखाद् दुसरा निवडणूक तिकिट इच्छुकाला पावसात भिजून नेत्याचे भाषण तल्लीन होऊन ऐकतोय, असे नाटक करावेच लागते. पण, बाकीच्यांचे काय? नेते पावसात भिजून भाषण करतात. नंतर त्यांच्या अलिशान गाडीत बसून उबदार घरात आराम करतात. पण, त्या पावसात भिजणार्‍या कार्यकर्त्यांचे काय ? पावसात भिजून भाषण करणे आणि तो फोटो पराक्रम म्हणून मिरवणे, हेच नेत्यांचे इतिकर्तव्य असेल, तर मग आपण तरी काय करणार ? इतकेच म्हणू की ‘नेता भाषण कर रहा हैं, बारिश की जाये’..

वांगी की आलू ? गहन प्रश्न !

कृषी कायद्याबद्दल एकदाही मोदी शेतकर्‍यांशी बोलले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान व्हावे म्हणूनच मोदींनी नायजेरियामधून चित्ते आणले. त्यामुळेच भारतात ‘लम्पी’ व्हायरस पसरला.” महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अशा पाट्या टाकल्या आहेत. अर्थात ‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ अशी नानांची ख्यातीच! बरं आपण काय बोलतो, याबाबत जराही अभ्यास नाना करत नसावेत, नव्हे करतच नाहीत. त्यामुळेच मोदींनी चित्ते नायजेरियामधून नाही, तर नामिबिया या देशातून आणले, हे सुद्धा त्यांना माहिती नाही.

काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या अध्यक्षाला वर्तमानकाळातील सामान्य ज्ञान अजिबात नाही, हेच यातून प्रतित होते. नाना असे का करत असतील बरं ? याचे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. असे काहीही बोलले की, प्रसारमाध्यमांत त्याची भरपूर चर्चा होते. त्यामुळे नाना असे बरळतात. ‘बदनाम हुये तो क्या ? नाम तो हुआ’ असे नानांचे प्रकरण आहे. पण, तसे पाहिले, तर यातला एक स्पष्ठ मुद्दा असा आहे की, भारतीय लोक भोळे आहेत. अगदी खोट्या बातम्यांनाही खरे मानणारे आपल्या इथे कमी नाहीत. खेडेगावातल्या शेतकर्‍यांपर्यंत नानांचे म्हणणे पोहोचले, तर या मुर्खतापूर्ण विधानाचे खंडन करणारी विधाने पुन्हा या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतीलच, असे नाही.

दुसरे असे की, सध्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नाना पटोले या निवडणुकीत दूरदूरपर्यंत कुठेही नाहीत. नानांना माहिती आहे की, मोदींबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे मागेसुद्धा नाना मोदींबद्दल असेच काहीसे बरळले होते आणि मग स्वतःच्याच विधानांचा वेगळाच अर्थ त्यांनी लावला होता. ‘मी मोदींना मारू शकतो,’ अशी उद्दाम भाषा केली होती. या विधानावरून वातावरण पेटले तेव्हा मग नाना म्हणाले की, “ते गावच्या गुंडाबद्दल बोललो होतो, पंतप्रधान मोदींबद्दल नाही.” तर असे हे नाना ! जिभेत काँग्रेसी गवतासारखी निरूपयोगी ताकद. पण, डोक्यात बुद्धी असणेही गरजेचे ना ? तिथे सुप्रियाताईंच्या शेतातले एक कोटी रुपयांचे उत्पन्न देणारी वांगी भरलीत की राहुल गांधींच्या आलूपासून सोना बनवण्यातलेे जे आलू आहेत ते भरले, ते नाना जाणोत आणि त्यांची काँग्रेस हायकमांड.. वांगी की आलू ? सरते शेवटी एकचं गहन प्रश्न !!