Home Blog Page 102

अवेळी पडत असलेल्या परतीच्या पावसाने राज्यातील पिकांचे नुकसान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिंधुदूर्ग जिल्ह्यात सकाळपासून कणकवली व कुडाळ परिसरासह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत आलाय.

मागील चार ते पाच महिने मेहनत घेऊन पिकवलेलं भात शेतीचे पीक आता कापणीसाठी परिपक्व झालं असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चितींत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे निघून जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ही अधून मधून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडून शेतीतील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड, ठाणे, नागपूर आदी जिल्ह्यात ही अधून मधून पाऊस पडत आहे.

डोंबिवलीत शिवसेना नेते संजय राऊत यांचे पोस्टर्स फाडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळे समोरील पेंडसे नगर तीन रस्ता प्लाझ्मा रक्तपेढी जवळील यादव डेअरी येथे शिवसेना दसरा मेळाव्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. काही अज्ञात इसमाने खोडसाळपणाने शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोटो असलेला भाग धारदार वस्तूने फाडला आहे. गुरुवारी ६ आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर घटना घडल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश श्यामराव तेलगोटे यांनी केली आहे.

रामनगर येथील डोंबिवली पोलीस स्टेशन यांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या अनुषंगाने अज्ञात इसमा विरुद्ध धारा ४२७ प्रमाणे एनसीआर दाखल करून घेतला आहे. सदर घटनेबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांना कळविण्यात आले असल्याचे प्रकाश तेलगोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

 

मुंबईचे प्रसिध्द उद्योगपती अंबानी कुटुंबाला धमक्या देणारा अटकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबाला धमक्या आल्याच्या घटनेवर तत्परतेने कारवाई करत मुंबई पोलीसांच्या पथकाने बिहार पोलीसांच्या मदतीने मध्यरात्री बिहारमधील दरभंगा येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. राकेश कुमार मिश्रा असे या व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या ‘सर एच एन हॉस्पिटल’ च्या लँडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता व हे प्रशस्त हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती .

मुंबई पोलीसांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेत तपासला सुरुवात केली. तपासात बिहारमधील दरबंगा शहरातून राकेश कुमार मिश्राला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध भादंवि कायदा कलम ५०६ (२),५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन मुंबईत आणले आहे. राकेश कुमार मिश्राने धमकी का दिली ? याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या ‘हाय कमांड’ सोनिया गांधींची हजेरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो’ यात्रा आज ६९८ किमी अंतर पार करून कर्नाटक मध्ये दाखल झाली. आज या यात्रेतील सहभागींसाठी उत्साहवर्धक दिवस होता. कारण काँग्रेसच्या हाय कमांड सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेत आज सोनिया गांधी यांची एन्ट्री झाली आहे. मांड्या जिल्ह्यातील डाक बंगला परिसरातून सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेला सुरुवात केली आहे.

राहुल यांनी मोठ्या उत्साहात सोनिया गांधी यांचं स्वागत केलं. यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात मिळवून अभिवादन केलं. सुमारे १५ मिनिटे चालल्यानंतर सोनिया गांधी आपल्या कारकडे परतल्या. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया गांधी पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या.

अध्यक्षपदावरून पक्षात गदारोळ सुरू असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. बऱ्याच दिवसांनी सोनिया गांधी त्यांच्या मातोश्री वारल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. सोनिया गांधी काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते ‘भारत जोडो’ यात्रेअंतर्गत कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पायी यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधी सातत्याने विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत.

भारत जोडो यात्रेची वैशिष्टे

‘* भारत जोडो यात्रा’ ३ हजार ५७० किलोमीटर लांब असणार आहे. ५ महिन्यांपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

* ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते कंटेनरमध्येच झोपतात. अशा ६० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कंटेनरमध्ये बेड, टॉयलेट आणि एसी देखील आहेत.

* यात्रेतील सहभागी काँग्रेसचे नेते दररोज ६ ते ७ तास पायी चालतात आणि २२ ते २३ किलोमीटर अंतर कापतात.

* काँग्रेसचे ११९ नेते या यात्रेत सहभागी आहेत, यात २८ महिला आहेत.

बीकेसी मधल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना कोणी लिहून दिली ? अमोल मिटकरींनी लगावला टोला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत_

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून वादळी राजकारण रंगल्याचे दिसून आलं. अखेर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडला. दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची दसरा मेळावा पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात काल प्रथमच दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

या सभेतील भाषणात शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाषणाची स्क्रिप्ट भाजपची असल्याची खिल्ली उडवली आहे.

दसऱ्याच्या दिवशी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ट्विटरवर त्यांनी भाजपाचा केमिकल लोच्या झाल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात भाजपला स्थान मिळाले नाही, असा टोला लगावत याकडे अमोल मिटकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा “केमिकल लोच्या” झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.” असं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे.

“माननीय मुख्यमंत्री महोदयांचे बीकेसी मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट. या भाषणात नरेंद्रजी मोदी, आरएसएस व भारतीय जनता पार्टीवर स्तुतीसुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.” अशी टीकाही मिटकरींनी ट्विटच्या माध्यमातून केली.