Home Blog Page 111

राष्ट्रीय हरित लवादाने तब्बल २५० कोटींचा दंड ठोठावत दिला ‘बेंजो केम’ कंपनीला मोठा दणका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बुलढाणा येथील मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमध्ये २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘बेंजो केम कंपनी’च्या दूषित पाण्यामुळे शेतजमिनीसह पाणी स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही.

कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्येही मिसळत होते. त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर ४५ शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात प्रकरण ऍड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दाखल केले होते.

याचिकाकर्त्याची बाजू ऍड. बिना परदेशी यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २९ ऑगस्ट रोजी निर्णय दिला. मलकापूर येथील ‘बेंजो केम कंपनी’ने गत दहा वर्षांपासून रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने ५० शेतकऱ्यांची २५० एकर जमीन नापीक झाली.

याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या प्रकरणात ‘बेंजो केम कंपनी’च्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला २५० कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. तसेच हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

 

तरुणीच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबून कपडे फाडले आणि गुप्तांगावर ओतली दारू; पुण्यातील चित्तथरारक घटना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराची संतापजनक घटना पुण्यातील निगडीमधून समोर आली आहे. ४ तरुणांनी एका तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर तिच्या कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने हातावर वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी पुण्यातील निगडी परिसरातील गंगानगर येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या बहिणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी चेतन मारुती घाडगे सह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी चेतनला अटक केली आहे.

२७ वर्षीय पीडित तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी येत होती. वाटेमध्ये ती एका फेरीवाल्याजवळ मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी चेतन घाटगे आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला कोयत्याने वार करण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडित घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर आरोपी चेतन आणि त्याच्या साथीदारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे ही तरुणीने जीव वाचवण्यासाठी एका शौचालयामध्ये आसरा घेतला. पण पाठलाग करणारे तरुण हे सुद्धा सार्वजनिक शौचालयामध्ये घुसले आणि पीडितेला मारहाण केली. तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली अंगावरचे कपडे फाडले आणि गुप्तांगावर दारू ओतली. एवढंच नाहीतर या नराधमांनी तिला मिरची पावडर खाऊ घातली आणि तिच्या हातावर ब्लेडने वार करून पळ काढला.

या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता आरोपी चेतन घाटगेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १९ जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. तर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे असणार आहेत. याशिवाय कोल्हापूरचे पालकमंत्रीही ते असतील. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालक मंत्र्यांची नावे आणि जिल्हे

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या सर्व जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

* राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
* सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया
* चंद्रकांत दादा पाटील – पुणे,
* विजयकुमार गावित – नंदुरबार
* गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड
* गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा
* दादा भुसे – नाशिक,
* संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
* सुरेश खाडे – सांगली,
* संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
* उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
* तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
* रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
* अब्दुल सत्तार – हिंगोली,
* दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर
* अतुल सावे – जालना, बीड
* शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
* मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

डोंबिवलीकरांना सांस्कृतिक मेजवानी देत यंदा पुन्हा रंगणार भव्य ‘रासरंग’ नवरात्रोत्सव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डॉ.श्रीकांत शिंदें फाउंडेशन च्या माध्यमातून गेले पाच वर्षांपासून डोंबिवली शहरात आयोजित केला जाणारा सर्वात मोठा रासरंग नवरात्रोत्सव दोन वर्षांच्या कोरोना मुळे पडलेल्या खंडानंतर आणि यंदाच्या नवीन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने जसे दहीहंडी व गणेशोत्सव सारख्या हिंदू सणांवरील सगळे निर्बंध उठवल्यामुळे यंदा पुन्हा आयोजित करण्यात आला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डोंबिवलीत नऊ दिवस हा भव्यदिव्य रास गरबा आयोजित केला जातो. तरुणांसह अबाल-वृद्धांमध्ये नऊ दिवस या उत्सवाची उत्सुकता असते. सुमारे एक लाख नागरिक या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होत असतात. यंदा २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव रंगणार आहे.

 

 

विकास कामांच्या माध्यमातून शहराला आकार देणारे कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्यही करत असतात. कला, नृत्य, संगीत, खेळ यांचा अनोखा संगम असलेला अंबरनाथचा ‘शिव मंदिर आर्ट फेस्टिवल’ देशभरात प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहरात आयोजित केला जाणारा भव्यदिव्य रास रंग हा कार्यक्रम ही डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव म्हणूनही या रास रंग कार्यक्रमाकडे पाहिले जाते. तरुण-तरुणींसह अबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती बांधवांच्या गरब्याचा साज या रासरंग उत्सवाच्या निमित्ताने मिळतो.

दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टिव्ही जगतातील अनेक प्रसिद्ध कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार आपली हजेरी लावत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या सावटामुळे रासरंग नवरात्रोत्सव रद्द करण्यात आलं होता. मात्र यंदा ठाणे जिल्ह्याचे लाडके माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे नव्या उत्साहात आणि जल्लोषात या रासरंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान डोंबिवलीतील डी.एन.सी शाळेच्या पटांगणावर नऊ दिवस हा उत्सव रंगणार आहे. या नऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद उत्सवात संगीत संयोजन करतील. तर अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शाह, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गडा या कलावंतांचे सादरीकरण होणार असून त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सूत्रसंचालनाची जोड मिळणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रासरंग उत्सवाला हजेरी लावणार आहेत तर महत्वाचे नेते, मंत्री, कलावंत या उत्सवाला प्रामुख्याने हजेरी लावणार आहेत.

 

गरबाप्रेमींनी मोठ्या कालावधीनंतर साजरा होणाऱ्या डोंबिवलीतील सर्वात मोठ्या गरबा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या नवरात्रोत्सवात विविध स्पर्धा होणार असून सोन्याची व आकर्षक बक्षिसांची लयलूट उत्सवात सहभागी होणाऱ्यांना करता येणार आहे अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना शिंदे समर्थक शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण जिल्हा युवा अधिकारी दीपेश म्हात्रे, रवी मट्या पाटील, रणजित जोशी, अभिजित दरेकर, उपशहरप्रमुख अमित बनसोडे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढून दाखवा – नामदार दादाजी भुसे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदूगर्वगर्जनेच्या माध्यमातून शिंदे गटाने डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील दावडी-रिजेन्सी येथील पाटीदार भवन सभागृहात शिवसेनेचे कल्याण लोकसभा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सगळे माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री नामदार श्री. दादासाहेब भुसे होते.

बाळासाहेबांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे शिंदे गटाला मज्जाव करत असल्याने उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढुन निवडणूक लढवून दाखवा असे आवाहन बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. शिंदे गटाच्या वतीने डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना शिवसेनेच्या संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनीता राणे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, प्रशांत काळे, उपशहर प्रमुख अमित बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांची गर्दी पाहून हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असून दसरा मेळाव्याला कोणतं मोठं मैदान शोधावं हा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एनडीआरएफच्या निकषात डबलने मदत केली जाणार आहे.

उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असतात बाळासाहेबांचा फोटो काढून टाका. मात्र बाळासाहेब हे एका कुटुंबाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवा. निवडणूकीपूर्ती महाराजांना आठवायचं नंतर विसरून जायचं हे काम सुरू असल्याची टीका यावेळी दादाजी भुसे यांनी केली.

तर शिवाजी पार्कच्या परवानगी बाबत भुसे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झालं ते चांगलं आहे. शिवाजी पार्क ची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात हा दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी दिवाळीत राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री विशेष भेट देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. दसरा मेळाव्याची ही बैठक असून जेव्हा मेळावा होईल तेव्हा मैदान देखील कमी पडेल. ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मुख्यमंत्री ज्या प्रकारे कामं करत आहेत त्यामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. इतकं गतिमान सरकार महाराष्ट्राने पाहिले नव्हते. बाळासाहेबांचे विचार बासनात बांधून अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सुरू होतं. या सत्तेचा फायदा फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. त्यावेळी पक्ष वाढीसाठी सत्तेत आलो. मात्र उलटं झालं. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत होता तिथे राष्ट्रवादी काँग्रेस वाढत गेली. आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबलं गेलं. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या. आमदारांचा निधी थांबविला. आधी नावाला एक आणि कामाला दुसरा मुख्यमंत्री होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सगळीकडे दिसत असल्याने त्यांना पोटशूळ उठला असल्याचा खोचक टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

तर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटो बद्दल हा फोटो ठाण्यातील घरातला असल्याचे सांगत आता घरी बसायची देखील चोरी असल्याचे सांगितले. मी सलग दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवून पहिल्या वेळी अडीच लाख मताधिक्याने आणि दुसऱ्यांदा साडेतीन मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे मी घरात बसायचं कुठे ? कुठे नाही ? ते मला कळतं. आज पर्यंत एकनाथ शिंदे यांची खुर्ची दिसत होती आता माझी पण खुर्ची दिसत आहे असा टोलाही लगावला.

एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक कामं झाली. आनंद दिघेनंतर शिवसैनिकांना आधार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीच केलं. शिवसेना वाढविण्याचं काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुहृदयसम्राटचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे झालं, ठाकरे सरकार हिंदुत्व विसरल्याची टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी करत दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.