Home Blog Page 131

‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने उत्तन समुद्रकिनारी आपले १५० वे स्वच्छता अभियान राबविले!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ ( www.forfutureindia.org ) ही पर्यावरण प्रेमी युवांची संस्था असून ही संस्था प्रत्येक आठवड्याला समुद्र किनारा स्वच्छ करण्याची म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर ( Beach Cleanups ) किंवा कांदळवन भागात साफ-सफाई करण्याचे उपक्रम राबवत आहे. आता पर्यंत या संस्थेने उत्तन, मनोरी, गोराई, वेलंकनी, जुहू, दानापाणी, खारदांडा, अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर तर भाईंदर पूर्व खाडी व भाईंदर पश्चिम खाडी येथे हा उपक्रम राबवला आहे.

रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने आपले १५० वे स्वच्छता अभियान उत्तन समुद्रकिनारी राबविले. यावेळी या स्वच्छता अभियानात मीरा भाईंदर येथील रॉयल कॉलेज, अभिनव कॉलेज, शंकर नारायण कॉलेज व मिरा भाईंदर महानगपालिका स्वच्छता विभाग तर प्रामुख्याने उत्तन येथील आमचा घर संस्थेतील लहान मुलांनी हातभार लावला. १६० हुन अधिक स्वयंसेवक या अभियानात सहभागी झाले होते तर सर्वांनी मिळून ३० टन हुन अधिक प्लॅस्टिक व इतर कचरा उत्तन समुद्र किनाऱ्यावरून काढला.
‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने गेल्या जानेवारी २०२० पासून आता पर्यंतच्या अडीच वर्षातील प्रवासात हजरो स्वयंसेवकांच्या मार्फत ७०० टनहुन अधिक प्लॅस्टिक व इतर कचरा काढत लाखो लोकांपर्यंत प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे.

“मिरा भाईंदर येथील वेलंकन्नी व उत्तन समुद्र किनारी पर्यटन व मासेमारी व्यापाऱ्यांकडून तयार होणार कचरा हा दिवसेंदिवस वाढत चाला आहे यात भर म्हणजे पावसाळी काळातील भरती-आहोटी मुळे मोठ्या प्रमाणत किनारी येणारा कचरा यामुळे प्रत्येक किनारी फक्त कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. ‘हा कचरा आपण भरत असलेल्या टॅक्सच्या पैशातून पालिकेला काढायला पाहिजे किंवा स्थानिक नेतेमंडळींनी यात लक्ष देऊन स्वच्छता केली पाहिजे’ असे दुर्लक्षित नागरिकांचा विचार बनण्यापेक्षा स्वतः पुढे येऊन आपले कर्तव्य समजत युवांनी हि मोहीम सुरु केली आहे.” – हर्षद ढगे, संस्थापक/अध्यक्ष – फ़ॉर फ़्यूचर इंडिया व मीरा भाईंदर शहर – पर्यावरण दूत ( www.harshaddhage.com )

आरेचे जंगल वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन”..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे ‘आरे जंगल’ वाचावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन” करण्यात आले. यावेळी मा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरणचे अध्यक्ष श्री. समीर वर्तक यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करीत होते त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये नगरविकास मंत्री होते. सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले परंतू आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे हे “निषेध धरणे आंदोलन” करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान सेलचे अध्यक्ष पराग पष्टे, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, प्रदेश सरचिटणीस सौ. वर्षा विजय शिखरे, अभिजित घाग, अम्मार पटेल, प्रदेश सचिव आमिर देशमुख, विलास साळवे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे ठाणे शहर मनोज डाकवे, ठाणे ग्रामीण रामचंद्र जोशी, वसई विरार जिल्हाध्यक्ष डेरीक फुरताडो व कार्याध्यक्ष संदीप किणी, उपाध्यक्ष तारीक खान, सरचिटणीस आमिर सय्यद, कल्याण डोंबिवली – सौ. रीना खांडेकर, भिवंडी – नौशाद अन्सारी, कोल्हापूर – प्रदीप डाखरे, पनवेल – सुरेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन राऊत, पवन भोईर आणि अनिल जाधव उपस्थित होते. ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस रविंद्र परटोले, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके, राष्ट्रीय फेरीवाला संघाचे महासचिव मॅकेन्झी डाबरे, युवा संस्थेचे राजू भिसे, कामगार संघटनेचे अरनॉल्ड करवालो तसेच पर्यावरण विभागाचे अनेक कार्यकर्ते आणि असंख्य पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते.

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखा यांच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या वार्ता संकलन व समाजसुधारकांची रेखाचित्रे या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पुणे येथे २० ऑगस्ट २०२२ रोजी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते श्री. उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे तसेच श्रीपाल लालवाणी यांनी संकलित केलेल्या २०१३ ते २०२२ या कालावधीतील शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संबंधातील वृत्तपत्रातील कात्रणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.

घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा रविवर्मा कलादालनात हे चित्र प्रदर्शन २० ते २२ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले राहणार होते. या वार्ता संकलन व चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर, श्री. मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले हे आवर्जून उपस्थित होते.

सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत, सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, प्रख्यात लेखक सदानंद मोरे आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. पुर्वी चित्रकला शिक्षक असलेले आणि आता पूर्ण वेळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी असलेले डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी ‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही’ या थीमवर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घुण खूनावर आधारित अनेक चित्रे विविध माध्यमांचा वापर करून तयार केलीत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर समाज प्रबोधनाच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वच समाज सुधारकांचे पोट्रेट्स तयार केलीत. यामधे राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बी प्रेमानंद, अब्राहम कोवूर, डॉ. एन डी पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्यासह अनेकांची पोर्ट्रेटस् तयार केलीत.

आजपर्यंत त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिथे-जिथे कार्यक्रम झालेत त्या अनेक ठिकाणी तर भरवण्यात आलेच त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी या चित्रांचं भरभरून कौतुक केलं. यातूनच या सर्व चित्रांची स्वतंत्र प्रदर्शनी भरवण्याची कल्पना समोर आली. या प्रदर्शनीसाठी चित्रकार उदय देशमुख यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

दुर्मिळ प्रजातीचा वन्यजीवन सर्प मांडूळ साप काळा जादू करण्यासाठी ७० लाख रुपयांना विकणाऱ्या टोळीला कल्याण झोन-३ च्या डीसीपी स्कॉड ने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद  / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काळा जादू करण्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करण्याऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण झोन -३ च्या डीसीपी स्कॉड ने अटक करत ७० लाख रुपये किंमतीचा २ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ४४ इंच लांबीचा एक दुर्मिळ प्रजातीचा मांडूळ वन्यजीव साप जप्त केला आहे व या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ता पाच जणांच्या टोळीने किती लोकांना असे मांडूळ साप विकले आहेत याचा पुढील तपास कल्याण झोन-३ चे पोलीस करत आहेत.

कल्याण झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली की पालघर येथें राहणारे काही लोकं मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार आहेत. डीसीपी स्कॉड चे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे सह पथकाने रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अग्रवाल कॉलेज जवळ सापळा रचला. ३ दुचाकी वरून ६ लोकं संशयित रित्या पोलीसांना येताना दिसले. डीसीपी स्कॉड पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी ता सहा जणांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून मांडूळ साप आढळण्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३३/२०२२ वन्यजीवन (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारित अधिनियम २००३ मधील कलम ३९(३)(अ) सह कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे व
मांडूळ वन्यजीव सर्प हस्तगत करून तो वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक, कल्याण जिल्हा ठाणे यांच्या ताब्यात सुरक्षिततेकरिता देण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ – ३ कल्याण व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, कल्याण विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केचे, पोलीस निरीक्षक शरद झिने (गुन्हे), खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण (प), पोहवा.पाटील, पोकॉ. भालेराव नेम-नियंत्रण कक्ष कल्याण, पोहवा. शेले, पोहवा.देवरे, पोकॉ बोडके व पोकॉ. तागड नेमणूक खडकपाडा कल्याण (प) यांनी केलेली आहे.

 

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याने शिवसेनेचा निकाल कधी लागणार ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सत्तासंघर्षावरील उद्याची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले होते. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उद्या उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आता कुणाची ? या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे धाव घेत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र आयोगाने केवळ दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्याची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत असून सुप्रीम कोर्टाची सुनावणीही आता २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

आजची सुनावणी उद्या

तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती सी.टी. रवी कुमार उद्या अनुपस्थित राहणार असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गेल्या सुनावणीत, सरन्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले होते की, या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवादाची आवश्यकता असल्यास, हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे पाठविण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी घटनापीठ स्थापनेबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे राजकीय निरीक्षकांच्या दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा निवृत्त होत असून, त्यापूर्वी निर्णय होण्याची अपेक्षा शिवसेनेला आहे.