Home Blog Page 139

मनसे’ पक्षाचा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच “जे चाललंय ते सर्वच खपवून घेणार नाही” असा ट्विटरद्वारे दिला सरकारला सज्जड दमवजा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तरावरून आज डोंबिवलीतील मनसे पक्षातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी ‘ट्विटर’ द्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा मुहूर्त सापडलेला असताना आणि सरकार मंत्र्यांची यादी बनविण्यात व्यस्त असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र सरकारला ट्विटरद्वारे सज्जड दमवजा इशारा दिला आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. या पूर्वी मनसे आमदार पाटील यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता, तर आता त्यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.

कल्याण-डोंबिवली खड्ड्यावर काय बोलले मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील ?

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाटले, उलटे लावून झाले, तरी कामे अजून सुरू झाली नाहीत, असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतं आहोत. या मागची भावना व भूमिका कोणावर टीका करण्याची नाही, तर या कामाकडे लक्ष द्यावे अशी आहे. जिथे कामे झालेली नसतील तिथे आम्ही बोलणारच. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार, असा सज्जड दमवजा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीच आता राज्याचे मुख्यमंत्री असताना निदान जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे तरी भरले जावेत हीच अपेक्षा !

पाऊस जोरात होता, त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र तसे कुठे डोंबिवली – कल्याणमध्ये कुठेही झालेले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जात आहेत. इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यात मंत्रिमंडळ नाही, ४० दिवस झाले आता, दाद मागायची कुठे ? असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावत ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हेच आता मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत’, एव्हडीच अपेक्षा आहे अशी मागणी मनसे चे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली.

भाजपच्या १६ मंत्री राजीनामा देत नितीशकुमार यांचे सरकार कोसळले; बिहारमध्ये राजकीय भूकंप !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार यांचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजप पासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळही मागितली आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या या भेटीपूर्वी भाजपच्या १६ मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्रही दिले आहे. उद्या किंवा परवा नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. महिन्याभरातील घडामोडींवर नजर टाकल्यावर नितीश कुमार आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल सुरु असल्याचे दिसून येत नाही. नितीश कुमार यांनी एका महिन्यापासून भाजप पासून अंतर ठेवले आहे.

त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमध्ये काडीमोड होवून बिहारमध्ये ११ ऑगस्टपूर्वी ‘एनडीएचे सरकार’ पडेल आणि नितीश पुन्हा ‘राजद’ सोबत सरकार स्थापन करतील असे अंदाज बांधले जात होते.

 

दिवा येथे ‘कजरी महोत्सव’ कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

दिवा येथे रविवारी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय आघाडीतर्फे ‘दिवा कजरी महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सदर कजरी महोत्सव धुमधाम आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कजरी कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बलिया येथून आलेल्या गायिका सुनीता पाठक यांच्या “पिया मेहंदी लिया दा मोती झील से, जायके साईकिल से” या कजरा गीताने उपस्थित श्रोते उल्हासित होऊन मंत्रमुग्ध झाले होते.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, तर भारतीय नेते प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा, भटक्या विमुक्त आघाडीचे महासचिव शिवाजी आव्हाड, बिंदुरा फाउंडेशन च्या अध्यक्षा ऍडव्होकेट बिंदू दुबे, भाजपाचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला आघाडीचे अध्यक्षा ज्योती पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस श्रीयुत भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, प्रदेश भाजपाच्या महिला उपाध्यक्षा हर्षलाताई बुबेरा, रोशन भगत, उत्तर भारतीय आघाडी चे समशेर सिंग यादव, शीला गुप्ता, गौरीशंकर पटवा तसेच असंख्य उत्तर भारतीय कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.

 

सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल; २२ रेल्वे गाड्या रद्द..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दक्षिण, पूर्व आणि मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागाचे स्टील साइडिंग चालू करण्यासाठी रेल्वे विभागाने मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २२ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आधीच अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण शिल्लक नाही. त्यात ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान २२ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागपूर विभागाने घेतलेल्या मेगा ब्लॉक मुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे, परिणामी या कामामुळे ८ ऑगस्ट पासून रेल्वे प्रशासनाने हा मेगा ब्लॉक घेतला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द केलेल्या गाड्या
*
१८०३० शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार ८ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द,
* २२८४६ हटिया – पुणे ८ ते १२ ऑगस्ट आणि १० ते १४ ऑगस्टपर्यंत रद्द,
* १३४२५ – १ मालदा टाउन – सुरत ६ ते १३ ऑगस्ट रद्द,१३४२६ सुरत – मालदा टाउन ८ ते १५ ऑगस्टपर्यत रद्द ,
* २२५८९ – ४ हावडा – शिर्डी साईनगर ११ ऑगस्टला रद्द,
* २२८९३ शिर्डी साईनगर – हावडा १३ ऑगस्टला रद्द,
* २२९०५ ओखा – शालिमार ७ ऑगस्टला रद्द, २२९०६ शालिमार – ओखा एक्स्प्रेस ९ ऑगस्टला रद्द,
* १२८१२ हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस १२ व १३ ऑगस्टला रद्द , १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया १४ व १५ ऑगस्टला रद्द,
* १२९०५ पोरबंदर – शालिमार १० व ११ ऑगस्टला रद्द, १२९०६ शालिमार – पोरबंदर १२ व १३ ऑगस्टला रद्द,
* १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ८ ते १३ ऑगस्ट या काळात रद्द, १२८०९ मुंबई – हावडा ८ ते १३ ऑगस्ट रद्द,
* १२८३४ हावडा – अहमदाबाद ८ ते १३ ऑगस्ट रद्द, १२८३३ अहमदाबाद – हावडा ८ ते १३ ऑगस्टला रद्द,
* हावडा – पुणे व पुणे – हावडा या गाड्या दिनांक ८ ते १३ ऑगस्टपर्यंत रद्द,
* १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार ६, ७ व ९ ऑगस्टला रद्द, १२१०२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ८,१० व ११ ऑगस्टला रद्द केली आहे .

 

राज्यातील ग्राहकांसाठी महावितरणद्वारे १ कोटी ६६ लाख स्मार्ट वीज मीटर बसविणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर बसविल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असल्याने महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहीत्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरींग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतुद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच ४ लाख ७ हजार वितरण रोहीत्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारीत वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे आणि वाहिन्यांना संवाद-योग्य आणि अत्याधुनिक मीटरींग सुविधा प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलाइन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे श्री. विजय सिंघल यांनी सांगितले आहे.

या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील २ लाख ६० हजार ४१७ ग्राहक तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्चदाब वीजवापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडे देखील हे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.

तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची २ लाख ३० हजार ८२० वितरण रोहीत्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीजवाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पुर्ण करावयाची आहे. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५ वीज ग्राहकांकडेही हे स्मार्ट मीटर बसविले जातील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी २५ टक्क्यांपर्यत असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६ ग्राहकांना स्मार्ट मीटर आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची १लाख ७६ हजार ६८७ वितरण रोहीत्रांचे स्मार्ट मिटरिंग करण्यात येणार अशा एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना तर ४ लाख ७ हजार वितरण रोहीत्रांना आणि २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविणे प्रस्तावित असल्याचे देखील श्री. विजय सिंघल यांनी सांगितले आहे.