Home Blog Page 141

पुण्याचे पत्रकार मुज्जम्मील शेख राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत…

पुणे : अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख सय्यद साबीर यांच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सत्कार मूर्तींचे औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमात पुण्यातील पत्रकार मुज्जम्मील शेख यांना संजय मैत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी व औरंगाबादचे माजी महापौर रशीद मामु यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्ट युवा पत्रकारितेकरिता समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी पोलीस अधीक्षक कलंदर शेख, डॉ. चौधरी सर, एड. संगीता भट्टड, ठाण्याचे माजी नगरसेवक मनोज भाऊ, अनवर बैग व आदी उपस्थित होते. मुज्जम्मील शेख हे खूप कमी वयापासून पत्रकारिता करत आहेत. त्यांना अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ चांगली प्रतिमा आहे.

अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील त्यांच्या चांगले परिचयात आहे. शेख हे अनेक मंत्री महोदयांच्या तसेच अनेक मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत व त्यांच्या जवळीक मानले जातात. शेख यांनी कोरोना काळात अनेक मंत्र्यांना सी एस आर फंड उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जवळपास 25 लाख किमतीचे कोरोना लक्षणे तपासणारी 3 मशिन उपलब्ध करून दिल्या होत्या.

शेख यांना शासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याने ते गरजू नागरिकांचे शासकीय कामे त्वरित करून घेतात. शेख यांची न्यू युनिक फाउंडेशन ही संस्था देखील संपुर्ण देश भरात जवळपास 12 ते 15 राज्यात काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत पुढे असतात. शेख हे समाजासाठी सतत धावपळ करत असतात. कोरोना काळात देखील अनेक परिवारांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

शेख यांचा देशभरात अनेक राज्यामध्ये दांडगा संपर्क आहे. त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालये, पुण्यातील अनेक पोलीस ठाणे, अनेक राज्यातील राजकीय वरिष्ठ पदाधिकारी, शैक्षणिक संस्थचे प्राचार्य, सामाजिक संस्था व संघटने मधील पदाधिकारी व इतर विभागातील असे अनेक मान्यवर मुज्जम्मील शेख यांच्या संपर्कात आहेत.

आयुक्तांच्या पत्रकार परिषद बंदी आदेशाच्या तुघलकी फर्मानचा जाहीर निषेध! – प्रकाश नागणे

मिरा भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेण्यास बंदी घालण्यात आल्याचे तुघलकी फर्मान काढले आहे ते लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे, प्रशासकीय पातळीवर चाललेले गैरकारभार, भ्रष्टाचार उघड होत असल्याने केवळ सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या आयुक्तांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना वाचवण्यासाठी जे पत्रक प्रशासनातर्फे जारी केले आहे त्यावर कोणाचीही सही नाही.

निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, आचारसंहिता लागू झालेली नाही, नगरसेवकांचा कालावधी या महिन्यात संपणार आहे त्यापूर्वीच आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीसारखा कारभार सुरू केल्याने ही दडपशाही सहन केली जाणार नाही तसेच ही बंदी सत्ताधारी भाजप सह सर्व राजकीय पक्षांना लागू असेल की फक्त काँग्रेससाठी याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे!- अमीत देशमुख

संपादक: मोईन सय्यद/लातूर प्रतिनिधी

लातूर: लातूर येथील काँग्रेस भवनात अहमदपूर येथील विविध राजकीय पक्षातील नेते तथा बसपाचे माजी जिला अध्यक्ष श्रीकांतजी बनसोडे, नगर परिषद अहमदपूरचे माजी गटनेते रहीमखान पठाण, सय्यद तौसीफ सर, शेख उमर सर आदी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते, आमदार धीरज विलासराव देशमुख, मा.आ.त्रिंबक नाना भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव अभय साळुंके, काँग्रेसचे नेते डॉ. गणेश कदम, तालुका अध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत मद्दे, शहराध्यक्ष विकास महाजन, चाकुर तालुका अध्यक्ष विलास पाटील, सिराजोद्दीन जागीरदार, मा.उपनगराध्यक्ष कलीमोद्दीन अहमद, केदार काडवादे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अमित देशमुख यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सम्मानीत केले व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोरोना प्रादुर्भाव काळात काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून जनतेची मदत करीत होता, अशा अनेक तळागाळातील लोकोपयोगी कार्य करणारा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहात आहेत म्हणून समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरणार नाही हे यावेळी आवर्जून सांगितले.

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच! या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक बूथ, वॉर्ड, गाव, मतदार संघ, काँग्रेस पक्षासाठी मताधिक्य देईल या पद्धतीने पक्षाची बांधणी करावी, आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या मर्यादेत काटेकोर नियोजन करून कामाला लागावे असे आवाहन करून त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

सामाजिक सौहार्द तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून जिल्ह्याचा समतोल विकास काँग्रेस पक्षच करू शकतो हे जनतेला पटवून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार असे समजून कामाला लागावे येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महागाईतून जनतेला मिळणार दिलासा; सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर होणार कमी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या कित्येक महिन्यांपासून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले असून, रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाल्याचे दृश्य आहे. जीएसटीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार काही बदल करताना अनेक नव्या बाबींचा जीएसटी अंतर्गत समावेश केल्याने महागाईचे चटके सामान्य जनतेला आता रोजचीच बाब बनली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, अशातच सगळ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, याअंतर्गत खाद्यतेलाचे दर १० ते १२ रुपायांनीं कमी होणार आहे.

खाद्यतेलाचे प्रक्रियाकर्ते व निर्मिती करणाऱ्यांनी जागतिक स्तरावर झालेल्या खाद्यतेलाच्या दरातील घट याचा नेमका फायदा ग्राहकांना देण्याची तयारी दशविली आहे, त्यामुळे आगामी काळात ऐन सणासुदीला खाद्यतेल १२ रुपायांनीं स्वस्त होणार आहे. दरम्यान रशिया-युक्रेनचे युद्ध व इंडोनेशियने इतर देशांमध्ये पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने तेल दराच्या महागाईचा भडका उडाला होता. भारत खाद्यतेलासोबत तेलबियाण्यांचे आयात करणारा प्रमुख देश आहे, सुमारे दोन तृतीयांश इतके खाद्यतेल व तेलबियाणे भारतात आयात करण्यात येते.

केंद्र सरकारने तेल वितरकांना खाद्यतेल किंमती कमी करण्याचा सल्ला दिला असून, जर खाद्यतेल उत्पादक किंमती कमी करत असेल तर मूळ तेल किंमत कमी करण्यात याव्या, याबाबत सरकार आदेश जारी करणार असून आगामी सणासुदीच्या काळात १२ रुपयांपर्यंत तेलांच्या दरात घट अपेक्षित आहे. याचा फायदा जनतेला त्वरित दिला जाणार असून सध्याच्या पॅकिंग तेलावर एमआरपी पेक्षा कमी नवे दर लागू करण्याचा बदल लवकरच केला जाणार आहे. एकंदरीतच यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला बसणारी झळ आता कमी होणार असून, सणासुदीला याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.


अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून बुलढाणा, महाराष्ट्र,विदर्भ या समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य घडले – साहेबराव पाटोळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं.अत्यंत अल्पशिक्षित असले तरी उपजत शाहिरीला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश उपाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी लोणार शहरात काढण्यात आलेल्या मिरवणूकीच्या समारोप वेळी केले.

संजय नगर भागात उर्दू शाळा निर्माण करा; समाज बांधवांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बँड पथक, लाठीकाठी पथक, मल्लखांब पथकांद्वारे कला प्रदर्शन करण्यात करण्यात आले. या मिरवणूकीत शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. खुशालराव मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, नगराध्यक्षा पूनमताई पाटोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष नितीन शिंदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन खरात, नगर परिषद उपाध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद, आबेद खान पठाण, शेख रऊफ शेख महेबुब, रमजान परसुवाले, गुलाबराव सरदार, काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, भरत राठोड, अरुण जावळे, एजाज खान, छगन कंकाळ, प्रवीण नेवरे, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, राहुल मापारी, इम्रान खान पठाण, युवा सेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी, काँग्रेस नेते दौलत मानकर, राहुल मापारी, प्रमोद मापारी, शंकर पाटोळे, रतन पाटोळे, गजानन बाजड, किसन बाजड, गजानन बाजड, श्रावण बाजड, मनीष पाटोळे, ओम पाटोळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

माळीपुरा चौक येथे लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली, यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले व उपस्थितांना फराळ पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, राहुल सरदार, रहमान नवरंगवादी, विठ्ठल घायाळ, गोपाल तोष्णीवाल, किशोर मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.