Home Blog Page 142

महाराष्ट्र राज्य नळाद्वारे जलपुरवठा करण्यात देशात अव्वलस्थानी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जल म्हणजे जीवन व ते प्रत्येक व्यक्तीला मिळावे याकरिता जलवितरण प्रणाली सक्षमपणे राबविणे गरजेचे असते. नेमके याच बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘जल जीवन मोहीम – हर घर जल’ या सर्वसमावेशक प्रकल्पाच्या उद्दीष्टपुर्तीचे लक्ष्य ठेवले होते. या अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी नळाद्वारे जलपुरवठा करण्याचे धोरण देशभरात राबविण्यात येत आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य नळाद्वारे जलपुरवठा करण्यात राज्यांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील १ कोटी २ लक्ष लोकांना नळाद्वारे जलपुरवठा करण्यात येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जल जीवन मिशन अंतर्गत ३७.१२ टक्के ग्रामीण भागातील घरांना नळजोडणी करण्यात आली आहे. जल पुरवठा करण्यासोबतच अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जल चाचणी करिता प्रयोगशाळांची उभारणी, सध्या जल प्रयोगशाळांच्या बाबतीत राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. जल वितरणासोबत शुध्द पेय जल मिळणे हा सर्वांचा प्राथमिक अधिकार आहे. नेमके याच बाबतीत राज्य प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील ९२ टक्के शाळा व ९३ टक्के अंगणवाड्यांना नळजोडणी करण्यात आली असून ही समाधानकारक स्थिती आहे. पुढील टप्प्यातील लक्ष्य १०० टक्के असून, लवकरच येत्या १ ते २ वर्षात ते पूर्ण होईल अशी आशा करणे गैर ठरणार नाही. सध्याची माहिती ३१ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार असून, राज्यातील अनेक जिल्हे लवकरच नळजोडणीच्या बाबतीत लक्ष्यपूर्ती करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सोनिया व राहुल गांधी मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लाँड्रिंग प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांना अटक होऊ शकते. मंगळवार दि. २ ऑगस्टला ‘ईडी’ ने या प्रकरणी १२ ठिकाणी छापे टाकले. या छाप्याआधी ‘ईडी’ ने २ मोठ्या कॉंग्रस नेत्यांची चौकशी केली. या प्रकरणाचा खुलासा करताना भाजप नेता सुब्रामण्यम स्वामी यांनी, लवकरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेल मध्ये जातील व मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना कठोर शिक्षा होईल असे भाकीत वर्तवले.

विदेशी चलनाला भारतीय रुपयांमध्ये केलं रूपांतर

काँग्रेसने आधी यंग इंडिया लिमिटेडचे ५ लाख शेअर भांडवलावर तयार केले आणि नंतर काँग्रेस ९० कोटी रुपयांचे कर्ज एजेएल विकत घेतले आणि त्यात काहीही उरले नाही असे सांगून ते ५० लाख रुपयांना विकत घेतले. राहुल-सोनिया यांना गुन्हेगार ठरवत स्वामी म्हणतात की, एजेएल वर ९० कोटी रुपयांचे कर्ज नव्हते. कंपनीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाले. स्वामींच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी-राहुल गांधी यांनी परकीय चलनात पैसा आणला असावा आणि त्यांनी या फेरफार करून त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले.

सोनिया-राहुल जेल मध्ये जाणार : सुब्रामण्यम स्वामी

सुब्रामण्यम स्वामी यांनी सुरु असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच आतापर्यंत भाजपमध्ये असे काही नेते होते त्यांना सोनिया-राहूल टाळत होते. पण आता व्यवस्थित तपास सुरु असून लवकरच सोनिया-राहुल यांना तुरुंगात जावे लागेल. सुरु असलेल्या युक्तीवादानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये शिक्षा दिली जाईल. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्यापासून हे प्रकरण चर्चेत आले आहे. या पूर्वी राहुल गांधी यांना अनेकवेळा ‘ईडी’ ने कार्यालयात बोलावून तासनतास त्यांची चौकशी केली आहे. सोनिया गांधी यांना देखील तीनदा बोलावून प्रश्नोत्तरे विचारून चौकशी करण्यात आली आहे. तर ही संपूर्ण चौकशी बनावट असल्याचा दावा करत कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर या प्रकरणासंदर्भात दाखल याचिकेत सर्व पुरावे असल्याने ही केस उभी राहिली आहे. या प्रकरणाच्या पुराव्यासाठी अजून काय हवं असं देखील स्वामी यांनी म्हटले आहे.

नेमक प्रकरण काय ?

काँग्रेस पक्षाच्या नेतृवाखाली ‘यंग इंडिअन’ मधील आर्थिक अनियमतेच्या तपासासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ च्या निधीची फसवणूक आणि गैरव्यवहार करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय, ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ ने ९०.२५ कोटी रुपयांच्या वसुलीचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ ५० लाख रुपये दिले होते, जे एजेएल ने काँग्रेसकडे थकवले होते असाही आरोप आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये; वेळापत्रक जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट <upsc.gov.in> वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. या बातमीत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य २०२२ वेळापत्रक डाउनलोड करू शकता.

ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले जाईल. उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र <upedsced.goved.in> वरून डाउनलोड करू शकतात.

UPSC ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही १६, १७, १८, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा रोज दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल असे आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम चेंबूर येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ सक्षम करण्याचं काम सरकार करणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याला साजेसं स्मारक उभारण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर काम करेल. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्राकडे शिफारस करू, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिले.

त्यांचं प्रमाणे वीना तारण कर्ज योजना त्वरित चालू करणार असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. चेंबूर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मातंग समाज दिलेला शब्द फिरवत नाही, हा अनुभव मला ठाण्यात आलाय. आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मधली अडीच वर्षे सोडा, आता खऱ्या युतीचं सरकार आलंय. जे थांबलय ते पुढे नेऊ. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही आपल्याला सहकार्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं, यासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं आहे.

 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना अखेर ‘ईडी’ कडून अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे. इतके दिवस ‘ईडी’ कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ‘ईडी’ कडून काल अटक करण्यात आली आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे. वारंवार नोटीस पाठवूनसुद्धा संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले असल्याने शेवटी रविवारी सकाळी ईडीची धाड राऊतच्या घरावर पडलीच.

गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांचे नाव आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करून अखेर ईडीकडून संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांवर ईडीकडून अटकेची
होणारी कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच होत आहे असा आरोप शिवसेना खा.अरविंद सावंत यांनी केला आहे.