Home Blog Page 145

डोंबिवली येथे पीएनटी कॉलोनीतील ‘होली एंजल्स’ विद्यालयातील दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या विद्यार्थिनीने दहावीत ९९.६०℅ गुण मिळवून महाराष्ट्रात पहिली तर ‘सीबीएसई’ बोर्डाची टॉपर बनण्याच्या मान पटकावला ..


           प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्याचे स्वतःचे प्रयत्न तसेच त्याच्या आई-वडिलांचे श्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन व तो शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा मोठा वाटा असतो. होली एंजल्स संस्थेने नेहमीच प्रयत्नशील गुणी विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, त्याचेच फलित म्हणून आज या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

सन २०२१-२२ सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यावर्षी दीक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने ९९.६० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील सर्व सीबीएसई शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हे यश होली एंजल्स संस्थेसाठी तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. मुळातच अतिशय शांत व अभ्यासू वृत्तीच्या दीक्षा कडे अभ्यासास पूरक असे सारे गुण होते पण त्याच बरोबर उत्तम कथ्थक नृत्य, चित्रकला यातही ती पारंगत आहे. तिच्या या यशामागे तिची आई रोहिणी सुवर्णा ज्या ‘एचडीएफसी’ बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत व वडील सुरेंद्र सुवर्णा यांच्याही मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमन डेव्हीड सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १६ वर्ष १००℅ रिझल्ट चा वारसा कायम राखत संस्था चालवत आली आहे व गेल्या कोरोना काळात ही या शिक्षण संस्थेने त्यांच्या होली एंजल्स शिक्षण संस्थेच्या १००% रिझल्टचा वारसा कायम राखत यंदाच्या वर्षी इतिहासातले ‘दीक्षा सुवर्णा’ हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे व असेच यश तिला व इतर विध्यार्थ्यांना लाभो अश्या शुभेच्छा होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हीड सर यांनी आज तिच्या सत्कारासाठी होली एंजल्स शाळेच्या सभागृहात आयोजण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात दीक्षा सुवर्णा व सर्व विद्यार्थ्यांना दिल्या.

यंदा होली एंजल्स शाळेतून दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस १४९ विध्यार्थी बसले होते त्यात शाळेतील २१ विध्यार्थ्यांना ९२% हुन अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा ही या सत्कार समारंभात पुष्पगुच्छ व आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. खास करून ९७.८० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या अनुश्री मनिष खिशती व ९७.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या रुचिता विनय दीक्षित यांना गौरविण्यात आले.

या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हीड सर, प्रिन्सिपल बिजॉय ओमेन, मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमती लीला ओमेन व मुख्याध्यापिका श्रीमती रफत शेख त्याच सोबत दहावीच्या वर्गावर शिकवणाऱ्या जयंती टीचर, नेहा कामत टीचर, रेवती टीचर, मेरी बोबन टीचर, विजी टीचर व हिंदीच्या अनिता सोनावणे टीचर व गौरवण्यात आलेले विध्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

 

मुसळधार पावसाचे पुढचे ३ दिवस विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांत थैमान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात जूनपर्यंत दडी मारून बसलेला पाऊस जुलैमध्ये राज्यातील बहुतांश भागात मुसळधार कोसळतोय. अशातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी पुढील ३ दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही भागात सूर्यदर्शन झाले होते. बऱ्याचशा नद्यांची पाणी पातळी आता घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुढचे तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे, असं म्हणता येईल.

दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मात्र, तो आता उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे चित्र आहे. याशिवाय राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

 

राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली आणि भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. एन.व्ही.रमणा यांनी राष्ट्रपती यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभास माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पी.सावळाराम राज्यस्तरीय साहित्य सम्मेलनात कवी तथा संपादक श्री.संतोष सावंत यांना दोन सन्मान चिन्हाने गौरविले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित आज रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवली येथे ‘२’ रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संम्मेलन’ डोंबिवली पूर्व येथे पार पडले. यात ७० हुन अधिक कवींनी या कवी संम्मेलनात भाग घेतला होता.

या साहित्य सम्मेलनाच्या ठिकाणी कवी तथा ‘लोकसत्यवाणी न्युज’चे संपादक, पत्रकार श्री.संतोष सावंत हे उपस्थित राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करिता सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्वागताध्यक्ष सौ.अनिता गुजर, उद्गघाटक शरद गोरे, संम्मेलन अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा या व अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

.

या संम्मेलन मध्ये कवी संतोष गोपाळ सावंत यांनी आपली “पावसा तू असा कसा” ही वास्तववादी कविता सादरीकरण केल्याबद्धल कवी व प्रेक्षकांमधून कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे त्यांच्या या कामगिरीस सन्मानचिन्ह देण्यात आले, व दुसरे पत्रकार तथा संपादक या उत्कृष्ट कामगिरी करिता म्हणून दुसरे सन्मानचिन्ह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने देऊन गौरविण्यात आले.


आज एकाच दिवसात एकाच कार्यक्रमात दोन कामाकरिता दोन वेगवेगळ्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र कवी तथा संपादक श्री.संतोष सावंत यांना देऊन गौरविण्यात आल्याने संतोष सावंत यांच्या चाहत्यांकडुन त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पुन्हा एकदा रचला इतिहास !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

ऑलिम्पिक खेळांमध्ये ट्रॅक आणि फील्ड सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनल्यानंतर, हा भारतीय स्टार जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारा केवळ दुसरा भारतीय बनला आहे. नीरजने रविवारी, २४ एप्रिल रोजी अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकले. अँडरसन पीटर्सने सुवर्णपदक (९०.४६ मीटर) जिंकले.

नीरज चोप्राचा पहिला जॅविलियन थ्रो फाऊल होता. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८२.३९ मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८६.३७ मीटर, चौथ्या प्रयत्नात नीरजने ८८.१३ मीटर फेक केली, तर पाचव्या फेरीत तो अपयशी ठरला. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.१३ मीटर होती याच थ्रो चा मदतीने त्याने दुसरे स्थान कायम राखत रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.

ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकला. रौप्यपदक विजयानंतर नीरज चोप्राने सांगितले की, वाऱ्यामुळे काहीसा त्रास झाला. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा कठीण होती, शिकण्यासारखं खूप होतं, अशी भावना त्याने व्यक्त केली.

नीरज १९ वर्षांचा असताना २० वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने ८६.४८ मीटरचा जागतिक विक्रमही रचला. त्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नीरजचं कौतुक केलं होतं. आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली होती. पुढे २०१८ मध्ये त्याने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. त्याचवर्षी भारत सरकारने नीरजला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केलं.

पण तब्बल १९ वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू तसेच पुरुष खेळाडू ठरला आहे.