Home Blog Page 146

शिंदे गटाचा दावा खोटा? गिरा व्यास काँग्रेस मध्येच शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही!

मिरा भाईंदर: कोणत्याही प्रकारची राजकीय मान्यता नसताना देखील एकनाथ शिंदे गटाने आपणच अधिकृत शिवसेना असल्याचा दावा करून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे.
अशाच प्रकारे शिंदे गटाने मीरा भाईंदर शहराची कार्यकारिणी देखील घोषित केली असून त्या कार्यकारिणीत अनेक वादग्रस्त नावे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे.

नव्यानेच जाहिर केलेल्या कार्यकारिणीत १४५ मिरा-भाईंदर शिवसेना महिला संघटक पदी काँग्रेसच्या गिरा व्यास यांना नियुक्त केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र गिरा व्यास यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसून त्यांचे नाव शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीत सामील करणे पुर्णपणे चुकीचे असून दिशाभूल करणारे आहे असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी दिले आहे.

गिरा व्यास ह्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असून त्यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केलेला नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत वाद असून आमची सेना हीच खरी शिवसेना आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठीच अश्या प्रकारची बोगस नियुक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला असून गिरा व्यास या काँग्रेस मध्येच आहेत असे स्पष्ट केले आहे.

मिरा भाईंदर शहरातील शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांची संख्या मूळ शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचे भासविण्यासाठी नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये अशाच प्रकारे अनेकांची नावे परस्पर जाहीर केली असल्याने त्यावर आता एक नविनच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेत पक्षात शिंदे गटाला विलीन करण्याचा जर प्रस्ताव आला तर विचार करू – राज ठाकरे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकूण ४० आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले तरी कायद्याच्या कसोटीवर हे सरकार टिकेल का ? अशी विचारणा केली जात आहे. सरकार अबाधित ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाने मनसे पक्षात विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर विचार करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

“हे शिवसेनेचे बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधीही त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. मला याबाबत तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन”, असे म्हणत माझ्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा महाराष्ट्र सैनिक असेल बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मी बाळासाहेब ठाकरे यांनाही पत्र लिहिले होते. मी एकच विचारत होतो की, माझे काम काय आहे ? तुम्ही इतरावंर जबाबदारी द्याल आणि मला निवडणुकीच्या भाषणासाठी बाहेर काढणार. माझा शब्द इतरांच्या जीवावर घालणे मला शक्य नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय होता. महाबळेश्वरला असताना मी म्हणालो की तुमच्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करा. पण मला जाहीर करू द्या. कारण राज की उद्धव हा मुद्दा बंद होईल. म्हणून मी विषय बंद केला, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला ! – मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला होता, प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला, मा.पंतप्रधानांच्या या योजनांमुळे अनेक लोकांचे संसार वाचले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कल्याण डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवा प्रसंगी, दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी मा.कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगर परिषद प्रशासनाचे रोहिदास दोरकुळकर,केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाचे वैभव खानोलकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी नगरसेवक विनिता राणे, रवी पाटील, भाजपाचे प्रेमनाथ म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. फेरीवाले यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी या बरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी असेही ते पुढे म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्याना मदत व्हावी, यासाठी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली आहे, याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे कामही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा असे उद्गार मा.कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. महानगरपालिकेस १४९७० पथविक्रेत्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यानुसार ७४३१ पथविक्रेत्यांचे कर्ज मागणी अर्ज भरण्यात आले आहेत आणि त्यापैकी २४८६ पथविक्रेत्यांना रु. दहा हजाराचे कर्ज विविध बँकांद्वारे उपलब्ध झाले आहे अशी माहिती प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच दहा पथ विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात परिचय पत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. स्वावलंबी पथ विक्रेत्यांच्या या प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवास फेरीवाल्यांचा पथविक्रेत्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला महापालिकेचे सावित्रीबाई फुले कलामंदिर या महोत्सवाच्या वेळी गर्दीने तुडुंब भरल्याचे दिसून आले.

 

कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका होतील; शिंदेंचं बंड हे स्वबळावर नव्हे तर भाजप च्या पाठिंब्यामुळे – अनंत गीते

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गितेंनी आज मोठं वक्तव्य केलं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजप रचित हे बंड :
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार जरुर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी केली.

आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता :
पुढे गिते म्हणाले ”घराघरांत कलह आहेत, वाद आहेत आणि आपली आई संकटात असेल तर आपण कलह करत बसणार नाही, तर आईला वाचवणार. आज शिवसेना संकटात आहे, ही आपली आई संकटात आहे. आपल्याला आईला वाचवायचं आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता आहे, आणि आज ही आई संकटात आहे, तिला आपल्याला वाचवायचं आहे.”

उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे :
उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे, आणि यामध्ये या गद्दारांना गाडून टाका” असेही गिते म्हणाले आहेत. एकनाथ शिदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानतंर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मागच्या काही काळापासून संघर्ष चालू आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना संबोधित करत आहेत.

 

खरी शिवसेना कोणाची ? याचा पुरावा सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिले निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेवरून सुरू असलेल्या वादाच्या लढाईने आता वेगळे वळण घेतले आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ८ ऑगस्टची मुदत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाकडे राहणार याचा निर्णयही ८ ऑगस्टला होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह असल्याचा दावाही शिंदे गटाने केला आहे.

एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आपल्याच गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरू होती, आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय जाहीर करेल. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.