Home Blog Page 148

एकीकडे राज्यात पक्ष अस्तित्वाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंचा कोर्टात लढा, तर दुसरीकडे मनसे राज्यात ॲक्शन मोडमध्ये सज्ज..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सत्तासंघर्षाची ठिणगी ही शिवसेना आमदारांच्या बंडाने पडली व त्याने महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्तेची समीकरणे नक्कीच बदलली, सोबतच काही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्न हल्ली नेमका निर्माण झाला आहे. आज आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, सोबतच शिवसेना नेमकी कुणाची या मुद्द्यावर देखील सुनावणी दरम्यान प्रकाश टाकण्यात येणार आहे.

एकप्रकारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिंदे गटाला आमदार, खासदार, नगरसेवक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याने न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यास शिवसेना प्रमुखपद देखील उद्धव ठाकरेंना गमवावे लागू शकते. याशिवाय संसद भवनातील शिवसेना भावनावर शिंदे गटाचा अधिकार यामुळे स्थापित होईल. दुसरीकडे मनसे पक्षाचा प्रभाव येत्या महापालिका निवडणुकीत कसा असेल, यावर देखील मनसेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

आज पक्षबांधणी व येत्या महापालिका निवडणुकीबाबत चर्चेकरिता पक्ष नेते व कार्यकर्त्यांसोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे आढावा बैठक मुंबईत विविध शाखेत घेत आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय वारे बघता मनसेकरिता सुद्धा अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाचे बळ राज्यापुरते मर्यादित आहे परंतु शिंदे गटासोबत भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाची साथ असल्याने सध्या एकनाथ शिंदे यांचे पारडे जड आहे. परंतु खरी लढाई उद्धव ठाकरे – महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट – भाजप अशी असल्याने आज होणारा सर्वोच्च न्यायालयातील निकाल पुढील घडामोडी स्पष्ट करेल, हे नक्की.

 

कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! “या विषयावर परिसंवाद आणि खुली लेख स्पर्धा”


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ या लोकचळवळीला फार महत्व आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. १९५५ ते १९६० असा सलग पाच वर्षे संयुक्त महाराष्ट्र समितीने जो लढा दिला त्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या जनआंदोलन लढयाचे नेतृत्व करणारे सर्वच आचार्य अत्रे, डांगे, एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील, सेनापती बापट, शाहीर अमरशेख, थोर नेते या विजयाचे शिल्पकार होते. परंतु ज्याला तोफखाना म्हणता येईल असे वाणी आणि लेखणीने जबरदस्त काम केले ते आचार्य अत्रे यांनी.

मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्र लढयासाठी उभे करण्यात अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. राजकीय नेते हे सगळीकडे वा सगळ्या राज्यांमध्ये सारखेच असतात, पण असे म्हटले जायचे की महाराष्ट्रातील राजकारण एकेकाळी सभ्यतेच्या पातळीवर होते. परंतु गेल्या काही वर्षांत सत्ताकारणासाठीच्या राजकीय घडामोडी पाहाता सर्वसामान्य मराठी माणसाला काही प्रश्न पडले आहेत. या अनुषंगाने ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई’ आणि आचार्य अत्रे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र !’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. तर राजेंद्र पै हे आपले आजोबा ‘आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर बोलणार आहेत.

शुक्रवार, दि.२९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ .३० वा. धुरु हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर – पश्चिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या विषयावर खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. मराठीमध्ये ३०० शब्दात टाईप करून लेख <chalval1949@gmail.com> या मेलवर अथवा 8779983390 राजन देसाई यांच्या व्हॉट्सअपवर पाठवावा. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना तीन रोख पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी तर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड.आरती पुरंदरे- सदावर्ते यांनी केले आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची व नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची आणि नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन केली तसेच अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला.

भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आदी त्यांच्यासोबत होते. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट मधील कान्होली या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. अतिवृष्टीग्रस्तांना ग्राम पंचायातीमध्ये ठेवण्यात आले आहे. गावाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम शासकीय यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे, शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाज प्रबोधन करणारी, डोके चालवा चळवळ: अण्णा कडलास्कर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारी, समाज प्रबोधन करणारी, डोके चालवा चळवळ आहे. येथील समाज व्यवस्थेला सातत्याने प्रश्न विचारणारी चळवळ आहे, यातूनच समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना आव्हान देत शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.अण्णा कडलास्कर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर मांडणी करताना व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहने शाखा व भारतीय बौद्ध महासभा मोहने शहर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एक दिवसीय शिबिरात ते बोलत होते.

रविवार दिनांक १७.७.२०२२ रोजी प्रज्ञा बुद्ध विहार, मोहने येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या प्रथम सत्राचे उद्घाटन श्री.अण्णा कडलास्कर यांच्या हस्ते विवेकाची ज्योत प्रज्वलित करून झाले. यावेळी के.पी.गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला अण्णा कडलास्कर, राजू कोळी, सुनीता चंदनशिवे, सरिता ससाने यांनी प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण केले. प्रथम सत्रात श्री.अण्णा कडलास्कर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व विविध उपक्रम याबाबत उदाहरणे देवून, जादूटोणा विरोधी कायदा , विज्ञान बोध वाहिनी इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. संत तुकाराम, संत गाडगेबाबा या सुधारकी संतांची परंपरा लाभलेल्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात समाज प्रबोधनाची चळवळ पुढे घेऊन जाण्याचे, समाजाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील ३२ वर्षांपासून करीत असल्याचे मत व्यक्त केले. आपण आयोजित केलेल्या एका दिवशी शिबिरांच्या माध्यमातून ही चळवळ आणखी जोमाने पुढे जाईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाची मांडणी केली. आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली परंतु त्याची दृष्टी घेतली नाही, याबाबत खंत व्यक्त करून अनेक उदाहरण देऊन ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय ?’ हे समजावून सांगितले.

दुसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी अश्विनीताई माने या होत्या. या सत्राची सुरुवात ऐश्वर्या पवार, राजू कोळी,भीमराव खेत्रे यांच्या चळवळीच्या गीतांनी झाली. त्यानंतर डोंबिवलीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डॉ‌. दुष्यंत भादलीकर यांनी ‘मन व मनाचे आजार’ या विषयाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने केली. मनाचे आजार किती प्रकारचे असतात, त्याची लक्षणे कशी ओळखावी याबाबत सविस्तर, उदाहरणासह मार्गदर्शन केले. असे आजार लक्षात आल्यास त्वरित मानोसपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र बऱ्याचदा मानसिक रुग्णाला भगत, बुवा- बापू, महाराजांच्याकडे नेले जाते. त्यातून त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण कसे केले जाते यावर प्रकाश टाकला. त्यानंतर के.पी गायकवाड यांनी ‘व्यसन व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यसनाचे प्रकार, त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. विवेकवादी चळवळीतील कार्यकर्त्याने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे कळकळीचे आवाहन केले.

डी.जे वाघमारे यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयाची मांडणी करताना व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या सोबत जोडून घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्वाचा विकास कसा घडतो, याबाबत सविस्तर विवेचन केले.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख सर हे व्हीजेटीआय या प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कालानंतर सेवानिवृत्त झालेत, त्याचे औचित्य साधून त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मागील २८ वर्षांपासून प्रा.प्रवीण देशमुख हे चळवळीशी जोडले गेले आहेत. आता निवृत्तीनंतर आणखी वेगाने ही चळवळ पुढे नेण्यासाठी ते मार्गदर्शन करतील, आम्ही त्यांच्या निवृत्तीचीच आतुरतेने वाट बघत होतो, अशा भावना सत्कार करताना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सर्व आर्थिक व्यवहार ज्या ट्रस्टच्या मार्फत चालतो त्या
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ चे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले यांनीही या शिबिराला आवर्जून उपस्थिती लावली व अतिशय चांगल्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजक समितीचे कौतुक केले.

त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ चे सर्वांनी सभासद व्हावे असे आवाहनही केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवली शाखेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रकार श्री.उदय देशमुख यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. यानंतर अविंदाताई वाघमारे यांनी ‘अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्रद्धा अंधश्रद्धा त्यांचे प्रकार, स्त्रियांची व्रतवैकल्ये व अंधश्रद्धा, या विषयावर मांडणी केली. किरणताई जाधव यांनी विधवा स्त्रियांना समाजांत मिळणारी दूय्यम वागणूक याविषयीचे प्रबोधन केले.

त्याचबरोबर हेरवाड व माणगांव या ठिकाणी घेतलेल्या विधवा स्त्रियांच्या संदर्भात ग्रामपंचायतीने केलेल्या क्रांतिकारी अशा ठरावा विषयीची माहिती दिली. विधवा स्त्रियांना, दुय्यम वागणूक देण्याची, सार्वजनिक उपक्रमातून बहिष्कृत करण्याची मानसिकता, आता बदलायला हवी असे मत व्यक्त केले. यानंतर आकाश पवार व साथींनी चळवळीची गीते गायली गौतम मोरे यांनी आभार मानले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन अविंदाताई वाघमारे यांनी केले. तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन राजेश मोरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी डाॅ.जाधव, नागले सर, पत्रकार सोनवणे, जे.एस शिंदे, डी.के.भादवे, निर्मला बोखारे, मधुकर कांबळे, मधुकर पवार, संदीप शिंदे, निशा भोईर , किरण कांबळे, प्रदीप उपदेशे, राधाताई गायकवाड, संदिप शेंडगे, आनंद सोनवणे हे सर्व साथी उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. १०० पेक्षा जास्त साथी या शिबिराला उपस्थित होते.?अशा शिबिरांची समाज प्रबोधनासाठी वारंवार गरज आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद डावलत शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे गटाकडून सेनेची ‘नवी राष्ट्रीय कार्यकारणी’ जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याचं बदललेलं राजकारणाचं समीकरण बघता, शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत झालं आहे. मुख्य म्हणजे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीला सेनेच्या बऱ्याच आमदारांनी पाठिंबा दिला. परिणामी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. आता महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काल दुपारी मुंबईतील ‘ट्रायडेंट हॉटेल’ मध्ये पक्षाच्या पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक झाली. अशातच, नवनवीन बदल, तसेच धोरण शिंदे गट अवलंबत असतानाच महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात शिंदे यांना मुख्य नेता करण्यात आले आहे. त्यात या नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला गटाचे सर्व आमदार आणि दिल्लीतून दहा खासदार आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली आहे. सेनेच्या उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दाखल होत असून तिथे खासदारांची प्रत्यक्ष बैठक घेतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला दावा सादर करणेही अपेक्षित आहे. २० तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबतही ते संबंधितांशी चर्चा करतील. याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं म्हणजे, अद्याप तरी शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्याचं बदललेलं राजकारणाचं समीकरण बघता, शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत झालं आहे. मुख्य म्हणजे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीला सेनेच्या बऱ्याच आमदारांनी पाठिंबा दिला. परिणामी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. आता महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काल दुपारी मुंबईतील ‘ट्रायडेंट हॉटेल’ मध्ये पक्षाच्या पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक झाली. अशातच, नवनवीन बदल, तसेच धोरण शिंदे गट अवलंबत असतानाच महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात शिंदे यांना मुख्य नेता करण्यात आले आहे. त्यात या नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला गटाचे सर्व आमदार आणि दिल्लीतून दहा खासदार आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली आहे. सेनेच्या उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दाखल होत असून तिथे खासदारांची प्रत्यक्ष बैठक घेतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला दावा सादर करणेही अपेक्षित आहे. २० तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबतही ते संबंधितांशी चर्चा करतील. याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं म्हणजे, अद्याप तरी शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.