Home Blog Page 149

राज्यातून २८३ आमदारांनी केले राष्ट्रपती पदासाठी मतदान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

राज्यात राष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या मतदानात एकूण २८८ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. उर्वरित पाचपैकी चार जण मतदान करू शकले नाहीत तर एकाचे निधन झाले आहे.

आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मतदानात एकूण २८८ पैकी २८३ जणांनी मतदान केले. शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाले आहे तर राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत, शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने तर भाजपाच्या लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी नियमबाह्य पद्धतीने मतदान केल्याचा आक्षेप भाजपाच्या बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे.

 

“रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स” च्या अध्यक्षपदी श्री. संजय कागदे..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या अध्यक्षपदी २०२२-२३ ह्या वर्षासाठी श्री. संजय कागदे ह्यांची निवड करण्यात आली. नुकताच त्यांचा पदग्रहण सोहळा श्रीमती मीराबाई कागदे सभागृहात पार पडला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. कैलास जेठानी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. संजय कागदे ह्यांनी पहिल्याच महिन्यात १ जुलै पासून आतापर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प, डॉक्टर दिनानिमित्त महापालिकेच्या शात्रीनगर हॉस्पिटल मधील डाक्टरांचा सत्कार, तेथील हॉस्पिटल मधील महिलांना पौष्टिक पदार्थाचे वाटप, डोंबिवली मधील सर्व डबेवाल्याना मोफत रेनकोट चे वाटप, संवाद प्रबोधिनी कर्णबधिर शाळेतील ३५ विध्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तूंचे वाटप व शाळेतील शिक्षकांचा गुरु पौर्णिमा निमित्ताने सन्मान असे विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले.

तसेच पुढील पूर्ण वर्षभर विविध समाज उवयोगी उपक्रम करण्याचे आश्वासन त्यानी दिले व रोटरीच्या कार्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलाश जेठानी ह्यांनी उपस्थिताना फार उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले व रोटरीच्या कार्यांची माहिती दिली. या वेळी क्लबचे सर्व सभासद व डोंबिवलीतील प्रतिष्ठित व्यक्ती मोठया संख्येने हजर होते. डॉ वनिता क्षीरसागर ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे केले. रो. निलेश गोखले ह्यांनी आभार मानले.

 

गॅस कटरने ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तीन चोरटयांच्या मुरबाड पोलीसांनी आवळल्या मुसक्या..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुरबाड शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी तीन चोरटे सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फोडून चोरी करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्यांची खबर गस्तीवर असलेल्या पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर मुरबाड पोलीसांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात पकडले आहेत.

महाराष्ट्राच्या विविध शहरात बँकेच एटीएम फोडून चोरीचे गुन्हे घडत असतानाच मुरबाड पोलीसांच्या सतर्कतेमुळे ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तिघा चोरटयांना गॅस कटरसह एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य व सिटी होंडा कार जप्त करून तिघांच्या मुसक्या आवळल्याची घटना समोर आली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचल्याने ऍक्सिस बँकेचे लाखो रुपये वाचले

मुरबाड शहरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटना घडत असल्याने अनेक महिन्यापासून शहरात पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. अश्यातच काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी तीन चोरटे सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फोडून चोरी करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्यांची खबर गस्तीवर असलेल्या पोलीसांना मिळताच मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, एपीआय सोनोने, पीएसआय तळेकर, पोलीस नाईक रामा शिंदे, अमोल माळी, विजय गांजाळे यांनी घटनास्थळी सापळा रचून ऍटीएम तोडत असतानाच चोरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तिन्ही चोरटे पळून गेल्याने बँकेचे लाखो रुपये वाचले.

नाकाबंदीमुळे चोरटे पोलिसांच्या तावडीत

त्यानंतर मुरबाड पोलीसांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले व लपून बसलेले सर्व तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात पकडले आहेत. या कामगीरीत पीएसआय निंबाळकर, पोह. शेलार, पोना. कैलास पाटील, पोलीस शिपाई चालक भगवान बांगर, पोह. सुरवाडे, दिघे, खंडाळे यांच्याही सहभाग होता. मुरबाड पोलीसांच्या ह्या धाडसी सतर्क पोलीसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुरबाड शहरातील सर्व बँक व एटीएम, सोनारीची दुकाने , व आर्थिक व्यवहार कारणाऱ्या संस्थाना सुरक्षा रक्षक नेमणे बाबत मुरबाड पोलीसांकडून वेळोवेळी बैठका घेवून, तसेच लेखी कळवून देखिल त्यांनी सुरक्षा रक्षक नेमले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या पैश्याची बँका काळजी घेत नाहीत. या घटनेनंतर बँक व एटीएम सेंटर बाबत नागरिकांमधून नाराजी पसरली असून सुरक्षा न पुरविणाऱ्या अश्या बँक व्यवस्थापाकावर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे,

पोलीस गस्तीमुळे गुन्ह्यात घट

गेल्या १० महिन्यापासून मुरबाड पोलीसांनी रात्री व दिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यात मुरबाड शहारत मध्यरात्री ते पहाटेपर्यत पोलीस अधिकाऱ्यासह पथक सतत गस्त घालत असल्याने शहरात चोऱ्या व गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची माहिती मुरबाड पोलुस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी सर्व बँक, एटीएम, सोनाराची दुकाने व आर्थिक व्यवहार संस्था चालकांना रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक ठेवावे असे आव्हान केले आहे.

चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

दरम्यान अटक कऱण्यात आलेले चोरटे टिटवाळा भागात वास्तव्यास असून दोघे नगर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी तर एक चोरटा मूळचा राजस्थानचा असल्याचे पोलीस तपास समोर आले आहे. या चोरट्यांनी इतरही काही ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. अटक तिन्ही चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

 

नरेंद्र मेहताच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा नगरसेवक अनिल विराणीचा दावा खरा की खोटा?

“त्यांचा” काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही” – प्रकाश नागणे (काँग्रेस प्रवक्ते, मिरा भाईंदर)

मिरा भाईंदर: जस जशी मिरा भाईंदर महानगर पालिकेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या राजकीय कोलांटउड्या मारणं सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारे आज रविवारी मिरारोड येथील प्रभाग 21 चे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत डॉ. स्वाती जगताप, दत्ता जगताप, भरतभाई शाह, संजय मोदी, राकेश गुप्ता, पिंकी मोदी, चंद्रकांत जगताप, मानव शाह, अनिता आंचन, भगवान मोरे या काही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांचा हा दावा खोडून काढला असून जे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा दावा अनिल विराणी करीत आहेत त्यांचा काँग्रेस पक्षाशी काडीचाही संबंध नाही, आपल्याच कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भासवून वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न अनिल विराणी करीत आहेत असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे.

त्याच बरोबर काँग्रेसचे मिरा भाईंदरचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून “जे कधी काँग्रेसचे साधे कार्यकर्तेही नव्हते व ज्यांचा कॉंग्रेसच्या विचारधारेशी काडीचाही संबध नाही अश्या काही लोकांना काँग्रेसचे पदाधिकारी सांगत मेहतांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गटबाजीने शहरात भाजपची वाताहात झाली आहे, त्यात काँग्रेसचा वाढता जनाधार पाहून भाजप वाल्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यानेच आपल्याच कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे दाखवून नवीन नौटंकी चालू केल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी केला आहे.

या लोकांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतल्याची साधी पावती दाखवावी तसेच २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार केला व कोणत्या प्रभागात व कोणत्या बुथवर काम केले ते जाहीर करावे असे थेट आव्हानच प्रकाश नागणे यांनी दिले आहे.

या घटनेमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगू लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांत ही रणधुमाळी आणखीनच वाढणार हे मात्र नक्की दिसत आहे.

मुळात आत्ताचे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते व माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. शिवाय त्यांच्या पत्नी रेखा विराणी ह्या 2012 च्या महापालिका निडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून नगरसेविका झाल्या होत्या. नंतर 2017 च्या महापालिका निवणुकीच्या आधीच दोन्ही विराणी दांपत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता अनिल विराणी भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक आहेत. त्यामुळे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण? आणि भाजपचे कार्यकर्ते कोण? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

येणाऱ्या काही महिन्यांत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत असतात. तर काही कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात आपल्या राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारे राजकीय कार्यकर्ते कोलांट उड्या मारताना दिसणार हे मात्र नक्की!

एकनाथ शिंदेचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना दिली स्थगिती..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीसोबत असताना त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार होता, यावेळी त्यांनी नगरविकास विभागाच्या तब्बल ९४१ कोटींच्या कामांना मंजुरी देत निधीची व्यवस्था करून दिली होती. विशेष म्हणजे बारामती नगरपरिषदेला २४१ कोटींचा निधी विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला होता.

सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा असल्याने त्यांनी मार्च ते जून २०२२ या कालावधी दरम्यान मंजूर केलेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे, यामध्ये सर्वाधिक निधी बारामती नगरपरिषदेला देण्यात आला होता. नुकतीच या सर्व विकासकामांवर स्थागिती आणल्याने हा अजित पवार यांच्याकरिता मोठा दणका मानण्यात येत आहे. इथे विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या विकासकामांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे, परंतु शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामावर स्थगिती न आणल्याने त्यांना एकप्रकारे अभयच मिळाले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न झाल्याने तूर्तास शिंदे सर्व विभागांच्या कामावर जातीने लक्ष ठेवत आहे, त्याअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. महविकास आघाडीच्या काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत होती, त्यामुळे येत्या काळात या सर्व बाबी एकनाथ शिंदे कशा प्रकारे हाताळतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.