Home Blog Page 150

केंद्र सरकारची देशात कोरोना लसीकरणाची विक्रमी भरारी ! २०० कोटी डोसचा टप्पा पार..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारताच्या कोरोनाविरोधी लसयुद्धात महत्वाचा आणि मोठा विक्रम करत भरारी घेतली आहे. खरंतर हा महाविक्रम आहे. आज भारताने २०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा सर केला. आज सकाळच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.९८ कोटी (१,९९,९८,८९,०९७) मात्रांचा टप्पा पार केला. २,६३,२२,३४५ सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. याचा अर्थ आतापर्यंत देशात २०० कोटी डोसचा आकडा गाठला गेला आहे.

देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम १६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ३.७९ कोटीहून जास्त (३,७९,८२,२५१) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे १० एप्रिल २०२२ पासून १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,10,322
2nd Dose 1,00,79,660
Precaution Dose 60,21,211
FLWs 1st Dose 1,84,27,518
2nd Dose 1,76,52,093
Precaution Dose 1,14,59,871
Age Group 12-14 years
1st Dose 3,79,82,251
2nd Dose 2,62,02,322
Age Group 15-18 years
1st Dose 6,08,43,400
2nd Dose 5,01,13,916
Age Group 18-44 years
1st Dose 55,88,87,272
2nd Dose 50,58,64,044
Precaution Dose 62,19,363
Age Group 45-59 years
1st Dose 20,35,68,118
2nd Dose 19,45,59,339
Precaution Dose 45,13,607
Over 60 years
1st Dose 12,73,60,055
2nd Dose 12,15,70,899
Precaution Dose 2,81,53,836
Precaution Dose 5,63,67,888
Total 1,99,98,89,097

  • भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या १,४३,४४९ इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ०.३३% इतकी आहे
    .
  • परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४% झाला आहे. गेल्या २४ तासात १७,७९० कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून ४,३०,८१,४४१ झाली आहे.
  • गेल्या २४ तासात २०,५२८ नवे रुग्ण आढळले.
  • गेल्या २४ तासात एकूण ३.९२,५६९ चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ८६.९४ कोटींहून अधिक (८६,९४,२५,६३२) चाचण्या केल्या आहेत.
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.५५% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.२३% आहे.

 

अनिश्चित काळासाठी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची, दरम्यान राज्य विधिमंडळाचे या अगोदर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी १८ जुलैपासून राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. परंतू आता १८ जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक तसेच अद्यापही न झालेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार इत्यादी कारणांमुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे समजते, त्यामुळे सध्यातरी अधिवेशनाची पुढील नेमकी तारीख स्प्ष्ट नाही आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

४थी आशियाई व पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेसाठी निवड समिती जाहीर..


(चेअरमन ) डॉ.चंद्रजीत जाधव

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

भारतीय खो-खो महासंघाने आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. ४थ्या आशियायी खो-खो स्पर्धेला १२ ऑक्टोबर २०२२ पासून तर पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेला १६ ऑक्टोबर २०२२ पासून दिल्ली येथे सुरुवात होण्याचा अंदाज खो-खो महासंघाकडून व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेसाठी जो भारतीय संघ निवडला जाणार आहे त्यासाठी निवडसमितीची घोषणा करण्यात आली असून भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव  यांची निवड समितीच्या चेअरमन पदि नियुक्ती झाली आहे.


(सचिव ) ऍड. गोविंद शर्मा                             (कार्याध्यक्ष ) सचिन गोडबोले

या आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाच्या निवड समितीवर महाराष्ट्रातून चेअरमनपदि डॉ.चंद्रजीत जाधव यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड.गोविंद शर्मा व कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. या तिघांसह उपकार सिंग (पंजाब), एस. एस. मालिक (दिल्ली), डॉ. मुन्नी जून (दिल्ली), व सुषमा सारोलकर (मध्य भारत) यांचीसुध्दा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पुणे येथील ‘श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल’ बालेवाडी येथे ६ ते १९ जुलै या कलावधीत प्रक्षिक्षण प्रक्षिण शिबीर आयोजित केले आहे. त्यात सपूर्ण देशातून १२० मुले या प्रक्षिण शिबिरासाठी निवडण्यात आली असून त्यांना प्रक्षिक्षण देण्यासाठी देशभरातून १२ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

याच १२० खेळाडूंमधून आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाठीचा भारतीय संघ टप्याटप्याने निवडला जाणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजीवराजे नाईक–निंबाळकर, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, याचबरोबर खो-खो तील तमाम कार्यकर्त्यांते यांनी निवड समिती वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशील योगदानाची आवश्यकता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वंदन करतानाच त्यांचे अनुकरण करून पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशील योगदान देण्याचे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विश्व हरेला परिवार या संस्थेच्या वतीने येथील महाराष्ट्र सदनात आयोजित विश्व हरेला महोत्सवात श्री. कोश्यारी बोलत होते.

उत्तर प्रदेशचे वने व पर्यावरण राज्यमंत्री अरुण कुमार सक्सेना, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ प्रदीप जोशी, अक्षयपात्र संस्थेचे स्वामी अनंत प्रभु आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले,भारत देशाचे चिंतन हे निसर्ग व पर्यावरणासोबत जोडलेले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायात संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आढळते. बालपणी  निसर्ग आणि पर्यावरणाच्या गोष्टी ऐकूनच या देशातील अनेक पिढ्या मोठया झाल्या आहेत. आज आधुनिक विज्ञानामुळे जग पुढारलेले आहे मात्र, या धकाधकीच्या व सुखनैव जीवनात प्रत्येकाने निसर्ग व पर्यावरणाशी आपली नाळ जोडून ठेवली पाहिजे असे श्री. कोश्यारी म्हणाले.

वृक्षलागवड, मृद व जल संवर्धन आदि माध्यमातून महाराष्ट्र, उत्तराखंड राज्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये अनेक व्यक्ती व संस्था निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. या सर्व निसर्गप्रेमी मंडळींच्या कार्याला सर्व स्तरातून वंदन करतानाच त्यांच्या या कार्याचे अनुकरण व्हावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘विश्व हरेला परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून उत्तराखंड व शेजारील राज्यांमध्ये सुरु असलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्याचा गौरव करून त्यांनी या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

 

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि ‘टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट’ यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच स्किल इंडियाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हे सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज मंत्रालयात हे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन्द्र सिंह कुशवाह, टाटा स्टाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या उपाध्यक्षा अनिता राजन, इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी यांच्यासह या संस्थांचे प्रतिनिधी अमेय वंजारी, राजर्षी मुखर्जी, श्रद्धा डे, सुहेल जमादार, अभिजीत कुमार, कौशल्य विकासच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी, नाविन्यता सोसायटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, देशातील प्रत्येकाला कुशल बनवून ‘स्किल इंडिया’ निर्मितीचे स्वप्न साकारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. आपल्या लोकसंख्येचा देशाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासात योगदान घेण्याचे आपले ध्येय आहे. यादृष्टीने कौशल्य विकास विभाग विविध प्रभावी उपाययोजना राबवित आहे. विविध कार्यक्रमांमुळे राज्यात कौशल्य विकास, उद्योजकता, स्टार्टअप्सचा विकास यासाठी सुलभ वातावरण तथा इकोसिस्टीम तयार झाली आहे. आता टाटा स्ट्राईव्ह, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट, इंडिया हेल्थ फंड अशा विविध संस्थांनीही या कामाता सहभाग घेतल्याने कौशल्य विकासाचे विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात भौगोलिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील दुर्गम तसेच जंगल भागात आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणे कठीण जाते. यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा प्रभावी उपाय ठरु शकतो. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळेल, त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकासच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टसमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यातील आयटीआयचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणास चालना देणे, उद्योजकता आणि नाविन्यतेसाठी विविध कार्यक्रम विकसीत करणे, मास्टर ट्रेनर्स तयार करणे, महिला, दिव्यांग व्यक्ती, एलजीबीटीक्यू, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजातील घटक अशा विविध वंचित घटकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच टाटा ट्रस्ट यांचा उपक्रम असलेल्या इंडिया हेल्थ फंडच्या माध्यमातून राज्यात आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यात येणार आहे. या स्टार्टअप्सना निधीची उपलब्धता, मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित घटक, दुर्गम भागातील घटक यांना आरोग्य सुविधा सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा विकास करणे, त्याअनुषंगाने स्टार्टअप्स विकसीत करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.

टाटा स्ट्राईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता राजन म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाबरोबर आज करण्यात आलेल्या भागीदारीमुळे राज्याच्या विविध भागात काम करण्याची संधी मिळाली आहे. येत्या काळात कौशल्य विकास विभागासमवेत राज्यातील विविध वंचित घटकांसाठी काम करता येईल. राज्य शासन आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करु, असे त्यांनी सांगितले.

इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड आरोग्य क्षेत्रात एकत्रित काम करेल. आरोग्य क्षेत्रात विविध कल्पक तंत्रज्ञानाचा विकास करणे, यासाठी स्टार्टअप्सना चालना देणे यासाठी येत्या काळात महाराष्ट्र शासन आणि इंडिया हेल्थ फंड एकत्रित काम करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाचे अधिकारी आणि संस्थांचे पदाधिकारी यांनी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान केले.