Home Blog Page 157

शिंदे सरकारचा राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये पेटलेल्या आरोप युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलीसांनी बरखास्त केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होत. ५९ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप प्रकरणी हा ईओडब्लू नंतर एसीबी ने गुन्हा दाखल केला होता.

मात्र, संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर केला. त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलीसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. दरम्यान, हा निर्णय किरीट सोमय्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अडचणीत सापडले होते. पण आता नवलानी प्रकरणच बरखास्त केल्यामुळे सोमय्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. जितेंद्र नवलानी नावाची एक व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करते असा आरोप त्यांनी यावेळी केला होता. या आरोपानंतर कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावे एक तक्रार दिली होती. ८ मार्च २०२१ या दिवशी ही तक्रार दिली होती. या तक्रारारीच्या १ वर्षानंतर म्हणजे २२ मार्च या दिवशी मुंबई पोलीसांनी या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र नवलानी संबंधीत ५ कंपन्यांना आणि ज्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्याशी संशयास्पद व्यवहार केले आहेत अशा कंपन्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत.

 

भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ ३ नेत्यांमध्ये जोरदार चुरस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपामध्ये संघटनात्मक बदलांच्या हलचालींना वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून ३ नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

सत्ताबदलानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य हे मुंबई महापालिका जिंकणे हे आहे. राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजपा नेते आहेत. ते यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.’पक्षानं मला आजवर भरभरून दिलं आहे. यापुढेही पक्षाचा जो आदेश असेल तो स्विकारेन’ असं बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना जाहीर केले आहे.

 

बहुसंख्य लोकं स्ट्रोक बाबतच्या लक्षणां विषयी अनभिज्ञ

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलने केले स्ट्रोक सर्वेक्षण

गोल्डन अवर्सबाबत जागृकता होणे आवश्यक असून योग्य वेळी रूग्णला उपचार मिळाले तर स्ट्रोक पासूनही वाचविणे शक्य!

मुंबई: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने एक सर्वेक्षण केले ज्यामध्ये स्ट्रोक बाबत चिंताजनक तथ्ये समोर आली. २०० नागरीकांमध्ये आँनलाईन सर्वेक्षणातून सुमारे 61% लोकांना स्ट्रोकची लक्षणेच माहित नसल्याची बाब समोर आली आहे. संतुलन गमावणे, दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, हात कमजोर होणे, बोलण्यात अडचणी यासारखी प्राथमिक लक्षणेही माहिती नाहीत. सामान्य लोकांमध्ये पक्षाघाताबाबत जागरूकतेचा अभाव आहे. पण, स्ट्रोकचा झटका आल्यास आणि गोल्डन अवर्समध्ये उपचार केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. स्ट्रोकच्या रूग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना स्ट्रोकची चेतावणी देणारी चिन्हे ओळखण्यास मदत करण्यासाठी, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारोडने पुढाकार घेतला आहे. सर्वसमावेशक आणि सर्वसमावेशक उपचार प्रदान करण्यासाठी स्ट्रोक सपोर्ट ग्रुप सुरू करून हॉस्पिटलने आणखी एक बेंचमार्क सेट केला आहे.

मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा अडथळ्यामुळे स्ट्रोक होतो. मग मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्स काही मिनिटांनंतर रक्त किंवा ऑक्सिजनशिवाय अकार्यक्षम ठरतात आणि मेंदूची कार्यक्षमता नष्ट होते. स्ट्रोक एखाद्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणे, खाणे, विचार करणे आणि लक्षात ठेवणे आणि शरीराच्या इतर महत्त्वपूर्ण कार्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करेल. हे कोणालाही कधीही होऊ शकते. या जीवघेण्या स्थितीबाबत अत्यंत कमी जागरूकता आहे. यादृष्टीने, रुग्णालयाने लोकांच्या सामान्य समस्या जाणून घेण्यासाठी स्ट्रोक सर्वेक्षण केले.

डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स मीरा रोड म्हणाले, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 64.4% लोक विंडो पिरियड (पहिल्या स्ट्रोकच्या 4.5 तास) दरम्यान स्ट्रोकच्या उपचारांबद्दल जागरूक असले तरी सुमारे 61% लोकांना स्ट्रोकची चेतावणी देणारी चिन्हे माहित नाहीत. ज्यांना लक्षणे दिसून येतात त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की 65.4% लोकांना हे माहित आहे की जर रुग्णाला अशा रुग्णालयात नेले तर त्याचे व्यवस्थापन केले जाते. लोकांना त्यांच्या आरोग्याचे महत्त्व कळू लागले आहे आणि 95.2% लोकांना असे वाटते की वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली पाहिजे. शिवाय, सुमारे 82.7% लोक दरवर्षी त्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करतात. स्त्री-पुरुष गुणोत्तर 3:1 होते आणि सुमारे 200 सहभागी या सर्वेक्षणाचा भाग होते. स्ट्रोकच्या रूग्णांना त्यांचे परिणाम सुधारण्यात मदत करण्यासाठी आम्ही सपोर्ट ग्रुप सुरू केला आणि डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची एक वचनबद्ध टीम चोवीस तास मदत पुरवण्यासाठी आणि जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध आहे. प्रगत उपकरणे आणि बहु-अनुशासनात्मक सांघिक उपचार पद्धतीसह रुग्णांचे निरीक्षण केले जाईल.

स्ट्रोक आल्यानंतर माझे जीवन विस्कळीत झाले. पण मी नशीबवान आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यांना स्ट्रोकची लक्षणे ओळखता आली आणि गोल्डन अवरमध्ये मला उपचार मिळाले. मी या प्लॅटफॉर्मद्वारे माझा अनुभव शेअर करू शकलो आणि मला आनंद आहे की मी इतर स्ट्रोक रुग्ण आणि यातून जीव वाचलेल्यांशी संवाद साधू शकलो. रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने स्ट्रोकबद्दल त्यांच्या सर्व शंका दूर करण्यात यश आले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि मला त्वरित वैद्यकीय मदत दिल्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो. मी कोणत्याही अडचणीशिवाय माझी दैनंदिन कामे पुन्हा सुरू केली आहे. हा स्ट्रोक ग्रुप इतर रुग्णांसाठी वरदान आहे ज्यांना स्ट्रोकचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप करण्यास मदत मिळू शकते. या उपक्रमाचा एक भाग बनून मला खूप छान वाटतं, “सहभागींपैकी एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यात पावसाचे थैमान ! मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात जून अखेरपासून आगमन झालेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळनंतर राज्यात मुसळधारेसह हजेरी लावली. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर अविश्रांत बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले.

मुंबईसह कोकण विभागामध्ये शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाण्यालाही शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाट परिसर येथे शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट आहे. पालघरलाही शुक्रवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी ८.३० ला झालेल्या नोंदीनुसार आधीच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे १२४.२ तर कुलाबा येथे ११७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. मंगळवार पर्यंत तो कायम होता. कोकणातील पावसामुळे राज्यातील पावसाची सरासरी भरून येण्यासाठी मदत झाली आहे.

मराठवाड्यात नांदेड येथे चांगला पाऊस झाला असून तिथे ४७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात आता पाऊस सरासरीच्या श्रेणीत आला असून मंगळवारी सकाळी १२ टक्के तूट नोंदवली गेली. पावसामुळे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे अर्धा तास ठप्प झाले होते.

येत्या शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशावरील कमी दाबाचे क्षेत्र, गुजरात किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती, दक्षिणेकडे सरकलेले मान्सून ट्रफ आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची वाढलेली तीव्रता या चार कारणांमुळे राज्यातील मान्सून सक्रिय झाला आहे, असे मुंबई प्रादेशिक विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी स्पष्ट केले.

या प्रभावामुळे कोकण विभागाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा परिसरातील घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात गुरुवारी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. आपण लवकरच राज्यातील पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची पवारांनी घेतलेली ही सदिच्छा भेट होती.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या फौजेमध्ये महाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे सरकार उर्वरित कालावधी पूर्ण करणार नाही. मध्यावधीच्या तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले होते. पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर शिंदे नाराज असतील, अशी शक्यता असताना त्यांनी अचानक घेतलेल्या ‘या’ भेटीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा ते भेट घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.