Home Blog Page 163

काचेच्या बाटली ने पत्नीच्या गुप्तांगावर वार करून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप – कल्याण न्यायालयाचा निकाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पत्नी वारंवार फोनवर बोलत असल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार करीत पत्नीच्या गुप्तांगावर बियरच्या बाटलीने जखमा करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील बिरवाडी परिसरात घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपी पतीला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संतोष शेळके असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

मृत सुनीता आणि आरोपी पतीचा २० वर्षापूर्वी विवाह

मृत सुनीता संतोष शेळके (वय:४० वर्षे) हिचा विवाह १९९४ साली बिरवाडीत राहणाऱ्या आरोपी संतोषशी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. त्यातच २०१७ पासून पती कामधंदा करीत नव्हता शिवाय त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे मृत पत्नीवर २०१८ पासून कुटुंबाच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी पडली. त्यामुळे ती बिरवाडीजवळच असलेल्या एका भगर मिलमध्ये कामाला जात होती.

पत्नीच्या चारित्र्यावर निष्कारण संशय

त्या कामानिमित्त मृत सुनीता वारंवार फोनवर बोलत असत, मात्र आपल्याला बघून पत्नी फोन बंद करते, असा संशय आणि राग आरोपी पती संतोषच्या मनात धुमसत होता. या कारणास्तव तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने ३० एप्रिल २०१८ रोजी पत्नीला काही बहाण्या निमित्त दुपारच्या सुमारास गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ बोलवून तिच्याशी दोन वेळा शरीर संबंध ठेवले. त्यानंतर बियरच्या काचेच्या बाटली फोडून तिच्या गुप्तांगाच्या भागावर जखमा करून तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर संतोषनेच त्या रात्री घरी पत्नी आली नसल्याचा कांगावा केला होता.

मृतदेह सापडल्यावर तपासाला गती

सुनीताचा मृतदेह गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ आढळून आल्यानंतर शहापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतक भावाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम ३०२, ३७६, २०१ प्रमाणे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. व्ही. शेट्ये यांनी पथकासह आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी हा मृतकचा पतीच असल्याचे पोलीस तपासात समोर येताच त्याला पत्नीच्या खून व अत्याचार प्रकरणी १ मे २०१८ रोजी अटक केली होती.


           ऍड.सचिन कुलकर्णी

सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली

आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी वेळी मुख्य पैरवी अधिकारी सहा, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कुटे हे हजर करीत होते. हा खटला अंतिम सुनावणीला आल्यानंतर न्यायालयात या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड.सचिन कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू, साक्षी पुरावे तपासून पहिले असता पतीनेच संशयावारुन पत्नीचा खून केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शनिवारी (४ जून) रोजी शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील ऍड.सचिन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतना सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभाग यांची उत्तम कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मा.श्री.कांतीलाल उमाप सो, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. सुनील चव्हाण सो, संचालक (अ.व.द. मुंबई) श्री प्रसाद सुर्वे सो. विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे.व श्री. डॉ.निलेश सांगडे सो. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.किरणसिंग देवीसिंग पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली, श्री.मल्हारी.एस. होळ, श्री.सागर धिंदसे दुय्यम निरीक्षक, श्री.पी.ए. महाजन सहाय्यक दुय्यम निरीक्षक, अमृता नगरकर, प्रीती पाटील, हनुमंत देवकते जवान व शिवराम जाखीरे जवान आणि वाहन चालक यांनी जामा मशिदच्या समोर, कौसा मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाजूला, कौसा मुंब्रा, ता.जिल्हा. ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी दारू वाहतुकीवर प्रोहीबिशन गुन्हा अंतर्गत छापा टाकून गुन्हा नोंदवून एक चारचाकी वॅगनआर गाडी जप्त केली असून त्यात एकूण ६४० लिटर हातभट्टी दारू असा एकूण ₹. १,७८,६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या उत्तम कारवाईवर सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दूरदर्शन वरील भारदस्त आवाज काळाच्या पडद्याआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“नमस्कार, आजच्या ठळक बातम्या”, अश्या भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं ६४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर आजाराशी झुंज देत अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाला.२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती.

१९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

फास्ट टॅग रिचार्ज करताना या चुका केल्यास अकाउंट होईल रिकामं..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हायवेवर प्रवास करताना टोल प्लाझावर लांब रांगांपासून वाचण्यासाठी सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक टोल’ कलेक्शन सिस्टम अर्थात ‘फास्ट टॅग’ ही प्रणाली लागू केली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह टोल भरण्यासाठीची पद्धतही सोपी झाली. ‘फास्ट टॅग’ आपल्या मोबाइलवरुनच रिचार्ज करता येतो. पण कधी ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करताना तुमची एखादी चूक तुमचं मोठी नुकसान करू शकते.

‘पेटीएम’, ‘फोन पे’ किंवा कोणत्याही इतर पेमेंट ऍप वरुन ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या गाडीचा नंबर टाकावा लागेल. जर तुम्ही चुकून दुसरा एखादा नंबर टाकला तर अकाउंटमधून पैसे तर कट होतील पण रिचार्जदेखील होणार नाही.

‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्याआधी तुमचा ‘फास्ट टॅग’ एखाद्या बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. रिचार्ज करण्याआधी युजरला बँक डिटेल्स टाकावे लागतात. चुकीचे डिटेल्स भरल्यास रिचार्ज कॅन्सल होतो आणि अकाउंटमधून पैसे कट केले जातात. जर तुम्ही तुमची जुनी गाडी एखाद्याला विकली असेल तर त्याचा ‘फास्ट टॅग’ डिअॅक्टिव्हेट करा. जर असं केलं नाही, तर गाडी तुमची नसूनही टोल प्लाझावर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होत राहतील.

जर ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्यासाठी कोणतीही समस्या येत असेल, एक्स्ट्रा पैसे कट होत असतील, तर एनएचएआय च्या १०३३ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. ही हेल्पलाइन ‘फास्ट टॅग’ संबंधित समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

तसंच वेळोवेळी तुमच्या ‘फास्ट टॅग’ चा बॅलेन्स चेक करा. ज्यावेळी ‘फास्ट टॅग’ मध्ये कमी पैसे असतील त्यावेळी लगेच रिचार्ज करणं फायद्याचं ठरेल. जर ‘फास्ट टॅग’ मध्ये रिचार्ज नसेल, तर टोल प्लाझावरुन जाताना तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागू शकतात.

केंद्रातील मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेत जगाला देणार आणखी एक जोरदार झटका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारकडून गहू निर्यात रोखल्याची बातमी धडकली होती. त्यानंतर पुन्हा एक बातमी समोर आलीय ज्यामुळे जगभराला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी सरकार साखरेची निर्यात रोखण्याच्या विचारात आहे. वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी साखर निर्यात थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे निर्यातीमुळे साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते.

साखर निर्यातीला १ कोटी टनाची मर्यादा घालण्याचा पर्यायदेखील सरकारकडे आहे. साखर निर्यातीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. भारतापेक्षा अधिक आयात ब्राझील करतो. भारतानं साखर निर्यात रोखल्यास त्याचा फटका अनेक देशांना बसू शकतो. आठवड्याभरापूर्वीच मोदी सरकारनं गव्हाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता केंद्र सरकार साखर निर्यात रोखण्याची तयारी करत असल्याचं वृत्त दिलं आहे.

भारताकडून अनेक मोठे देश साखरेची खरेदी करतात. इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात, मलेशियासह अनेक आफ्रिकन देश भारताकडून साखर घेतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखरेचं सर्वाधिक उत्पादन होतं. देशात होणाऱ्या साखरेच्या उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन याच ३ राज्यांमध्ये होतं. यासोबतच आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडीसा, तमिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाबमध्येही साखर उत्पादन होतं.

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम गव्हाच्या दरांवर झाला आहे. जगात होणाऱ्या एकूण गहू निर्यातीच्या २५ टक्के निर्यात रशिया आणि युक्रेनकडून केली जाते. मात्र युद्ध सुरू असल्यानं त्यांच्याकडून होणारी निर्यात घटली. भारताच्या गव्हाला असलेली मागणी वाढली. त्यामुळे भारतात गव्हाचे दर वाढले. ते नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारनं गहू निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला होता.

 

@media print {
.ms-editor-squiggler {
display:none !important;
}
}
.ms-editor-squiggler {
all: initial;
display: block !important;
height: 0px !important;
width: 0px !important;
}