Home Blog Page 164

खासगी वाहनधारकांसाठी वाहनांवरील ‘टोल माफी’ संदर्भात सरकारचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  खासगी वाहन धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्याकडे जर तुमची स्वत:ची कार असेल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्य शासनाकडून खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कारण राज्य सरकारने खासगी वाहनधारकांची टोलटॅक्स माफीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आता महामार्गांवरून प्रवास करताना तुम्हाला टोल टॅक्स अर्थात टोल नाक्यांवरील टोलवसुलीचा फारसा ताण घेण्याची आवश्यकता नाही.

कमर्शियल वाहनांवरील टोलवसुली मात्र कायम राहणार आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महामार्हांवर आता फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जाईल. एमपीआरडीसी ने यासाठीचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. कारण, हा नियम राजस्थान सरकारडून लागू करण्यात आला आहे.

सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणी पाहता राजस्थान प्रशासनानं महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीनंतर सदर निर्णयाच्या धर्तीवर टेंडर करण्यात आले. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, टोल ब्लॉक सुरु होणार आहेत.

राजस्थान मध्ये घेण्यात आलेला हा निर्णय पाहता महाराष्ट्रात याच धर्तीवर कोणता निर्णय घेतला जाणार का, हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातही मागील कैक वर्षांपासून टोल वसुलीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. तेव्हा प्रशासन आता नागरिकांना दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

कोणाला नाही भरावा लागणार टोल ?

राजस्थान सरकारनं काही असे विभागही केले आहेत ज्यांना टोल माफी देण्यात आली आहे. सरकारी वाहनांपासून शव नेणाऱ्या वाहनांसह एकूण २५ प्रकारच्या वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या वाहनांचाही यात समावेश असेल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

डोंबिवलीतील आजदे गावकऱ्यांचा वाली कोण ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली पूर्वेकडील आजदे गाव हे ग्रामीण क्षेत्रात येत असून तेथील निवडून आलेल्या नगरसेवकाचा कार्यकाळ संपुष्टात येऊन बराच काळ लोटला असून आजदे गाव सध्या कल्याण डोंबिवली प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्या भागात गटारांचे काँक्रीटीकरण अध्याप झाले नसून पालिके कडून तेथील रहीवाश्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसून येत्या पावसाळ्यात गटार नाले तुंबून सांडपाणी तेथील चाळीत शिरून रहिवाश्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

तेथील भागात गटारांचे सांडपाण्याचे योग्य नियोजन नसताना व सांडपाण्याचा निचरा होत नसताना महापालिका तसेच एमआयडीसी नवीन बांधकामांना परवानगी देतेच कशी असा प्रश्न तेथील समाजसेवक श्री.मनोज गिरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे. त्यांनी स्वतः ‘ई’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून आजदे गावातील सदर जागेवर प्रत्यक्ष आणून संपूर्ण परिसर दाखवून दोन दिवसात महापालिके कडून नालेसफाई करून घेतली. पण येत्या पावसाळ्यात गटारांची पक्के बांधकाम झाले नसल्याने पुन्हा परिसरातील गटारे तुंबल्याशिवाय राहणार नाहीत असा मानस देखील प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलून दाखविला व कल्याण डोंबिवली महापालिकेलाआवाहन केले की गटारांची पक्की बांधकामं जोवर होत नाहीत तोवर नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये अथवा स्थानिक राहिवाश्यांचे त्या विरोधात उग्र आंदोलन केले जाईल.

ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान तर्फे ‘धनगर रत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न!

होतकरू पत्रकार ऍड. इरबा कोनापुरे यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने धनगर रत्न पुरस्कार !

मिरा भाईंदर: राजमाता आहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाज कार्यात काम करणाऱ्या १० जणांचा सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील, नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण, पनवेल व मुंबई येथील विविध क्षेत्रात धनगर समाजातील व्यक्तींना विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्याना एकूण १० जणांना धनगर रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळेस शिवसेना नेते, नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बाळासाहेब पाटील, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व गणपत पिंगळे पोलीस निरीक्षक, ठाणे महापालिकेचे नगरसेवक योगेश जानकर, यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे आणि धनगर समाजाचे अनेक राजकीय नेते उद्योजक व अनेक समाजसेवक व्यापारी उपस्थित होते.

धनगर प्रतिष्ठान ठाणे यांचे तर्फे या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार हे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. सामना व आपलं महानगरचे पत्रकार ऍड. इरबा कोनापुरे (पत्रकारिता), आप्पा सरगर, पोलीस (क्रीडा), डॉ. मानसी डोईफोडे (वैद्यकीय), प्रसाद पांढरे (शासकीय), विशाल दोलताडे (उद्योजक), ह.भ.प. भगवान कोकरे, कीर्तनकार (सामाजिक), मोनिका महानवर (राजकीय) नगरसेविका पनवेल महानगरपालिका, रामभाऊ लांडे (लेखक – साहित्यिक), लक्ष्मीकांत परदेशी (शैक्षणिक), ऋणानुबंध सामाजिक संस्था (सामाजिक संस्था) यांना प्रदान करण्यात आले आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन हे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे व महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर यांच्यामार्फत जाहीर झालेले होते. त्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पार पडला.

मागील ११ वर्षांपासून ठाणे जिल्हयात समाज कार्य या प्रतिष्ठान करण्यात येत आहे. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजासाठी भव्य दिव्य असे समाज मंदिर व हॉल बांधण्यात येईल त्यासाठी पाठपुरावा करावा त्यास आम्ही मान्यता देतो असे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव गणेश बारगीर, खजिनदार अविनाश लबडे, उपाध्यक्ष कुमार पळसे व राजेश वीरकर, प्रचार प्रमुख सचिन बुधे, उपसचिव तुषार धायगुडे, सुरेश भांड तसेच सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. तसेच धनगर प्रतिष्ठान आयोजित पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या कामावरून ‘धनगर रत्न’ पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी समाज बांधवांनी दिलेले प्रेम आणि सन्मान त्याबद्दल समस्त समाज बांधवांचा व धनगर प्रतिष्ठानचा ऋणी आहे अशी भावना दै. सामना व आपलं महानगर ह्या वृत्तपत्राचे पत्रकार ऍड. कोनापुरे इरबा यांनी व्यक्त केले आहे.

लिमा लुईस यांची खो-खो स्पर्धेत राष्ट्रीय तांत्रिक अधिकारीपदी निवड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या ‘युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय’ आणि ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ‘च्‍या संयुक्त विद्यमाने ४ थी ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२१’ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे ४ ते १३ जून, २०२२ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धेत ९ ते १३ जून २०२२ या कालावधीत ताऊ देवी लाल क्रिकेट स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे होणाऱ्या खो खो स्पर्धेसाठी लिमा लुईस यांची राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

लिमा लुईस हे आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी अखिल गोवा खो-खो संघटना स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गोवा खो-खो असोशिवराशनचे ते सध्या उपाध्यक्ष असून त्यांनी चार वर्षे सेक्रेटरी म्हणून सुध्दा यशस्वी कारकीर्द केली आहे. अतिशय मनमिळवू व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख खो-खो क्षेत्रात आहे. पहिली आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (१९९९) कोलकत्ता येथे तर दुसरी आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (२००६) ढाका, बांगलदेश येथे पार पडली या दोन्ही स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे.

लिमा लुईस हे भारतीय खो-खो पंच मंडळावर गेली वीस वर्षे काम करीत आहेत. दर चार वर्षांनी होणार्‍या नॅशनल गेम्स स्पर्धेत चार वेळा मुद्रास, इम्फाळ बंगळूरु व पुणे येथील स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विविध राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत त्यांनी कित्येक वेळा पंच व स्पर्धा पंच प्रमुख म्हणून सुध्दा काम केले आहे.

खेलो इंडिया स्पर्धेत चार पैकी गेल्या वेळी झालेल्या गोहाटी, आसाम येथे पंच व आता होत असलेल्या पंचकुला, हरियाणा येथील स्पर्धेमध्ये ते राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

महाराष्ट्रात दिल्या जाणार्‍या ‘शिवछत्रपती पुरस्कर’ च्या धर्तीवर गोवा सरकारने खो-खो स्पर्धा आयोजनाचा ‘जिवबा दादा केरकर पुरस्कार’ देऊन लिमा लुईस यांचा गौरव केला आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या निवड समित्या जाहीर !!


           (श्री. नागनाथ गजमल, हिंगोली)

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने २०२२-२३ या वर्षासाठी सर्व गटांच्या निवड समित्या जाहीर केले आहेत. या निवड समितींनी फक्त राज्य अजिंक्यपद स्पर्धा निवडीसाठी ग्राह्य न धरता वर्षाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील विविध खो-खो स्पर्धा पाहून व त्यातील खेळाडूंची प्रगती पाहून व राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत खेळणारे खेळाडू या सर्वांचा विचार करून महाराष्ट्राचे संघ निवडण्याची जबाबदारी या निवड समितींना देण्यात आली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सहापैकी पाच गटांनी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले होते. या सर्व बाबींचा विचार करून वर्षाच्या सुरुवातीलाच या निवड समित्या खालील प्रमाणे जाहीर केल्या आहेत.


 (श्री. प्रशांत देवळेकर, रत्नागिरी)

पुरुष व महिला (खुला गट)

१. श्री नागनाथ गजमल (हिंगोली)
२. श्री प्रशांत देवळेकर (रत्नागिरी)
३. श्री संदेश आंब्रे (मुंबई उपनगर)
४. सौ सुप्रिया गाढवे (उस्मानाबाद)

कुमार व मुली (जूनियर – १८ वर्षाखालील)

१. श्री रमेश नांदेडकर (नांदेड)
२. श्री अनिल रौंदाळ (नंदुरबार)
३. श्री पंढरीनाथ बडगुजर (धुळे)
४. सौ भाग्यश्री फडतरे-पवार (सातारा)


(सौ. शुभांगी कोंडुस्कर-जाधव, मुंबई)

किशोर किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील)

१. श्री रविराज परमाने (ठाणे)
२. श्री प्रशांत कदम (सातारा)
३. श्री दीपक रावरे (पालघर)
४. सौ शुभांगी कोंडुसकर-जाधव (मुंबई)

वरील समित्या महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सेक्रेटरी गोविंद शर्मा यांनी जाहीर केल्या आहेत.