Home Blog Page 165

बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे तंबाखू छोडो अभियान!

मुंबई: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था तसेच शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, याच दिनाचे औचित्य साधून मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने बोरिवली स्थानकात डॉक्टर व नर्सेस यांनी” तंबाखु छोडो ‘ अभियान राबविले होते. यावेळी रेल्वे स्थानकातील नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच यावेळी ४० नागरिकांनी तंबाखु सोडण्याची शपथ घेतली.

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. तन्वी शहा म्हणाल्या, ” मुंबई शहरात अनेक नागरिक दाटीवाटीने राहतात त्यामुळे धूम्रपान अथवा तंबाखुचे व्यसन असणारी असंख्यजण आहेत, कधी कधी त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील नकळतपणे व्यसनाच्या आहारी जातात, ३१ मे या दिवशी व्यसन करणाऱ्या नागरिकांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा हाच संदेश आमच्या या उपक्रमाद्वारे दिला गेला.

धूम्रपान तसेच तंबाखूचे व्यसन करणाऱ्या नागरिकांना गंभीर आजार होण्याचा व त्यात मृत्यू होण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत जास्त असतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तंबाखूच्या वापरामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, फुफ्फुसाचा जुनाट आजार आणि मधुमेह यासह चार प्रमुख असंसर्गजन्य रोग होऊ शकतात.”

तंबाखूचे सेवन करणे आणि धूम्रपान करणे आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका उद्भवतो आणि अनेकदा जीवघेणा आजार शरीरात घर करतो. जे लोकं तंबाखूचे सेवन कच्ची तंबाखू, बिडी-सिगारेट, पान मसाला, हुक्का कोणत्याही प्रकारे करत आहेत. त्यांना अशा प्रकारे सेवन केल्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी समजावणे आणि तंबाखू सोडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही; कर्करोग हा त्यातीलच एक आजार आहे! अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल पुढील १५ दिवसात पश्चिम उपनगरात विविध उपक्रम राबविणार आहेत.

राज्यातील १४ महापालिकांची आज आरक्षण सोडत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. तर आता नेत्यांची धाकधूक वाढली असून, मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेकडून आज मंगळवारी २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडती निघणार आहे. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. ही सोडत शालेय विद्यार्थ्यांचा हस्ते काढली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्यात येणार आहेत. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यानंतर महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी वाढीव नऊ प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी ११ वाजता सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांत सलग दोन वेळेस पुरुष किंवा महिला आरक्षण असलेल्या प्रभागांतील आरक्षण यंदा बदलले जाईल. या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्ष, नेते, नगरसेवकपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

आज महाराष्ट्रात पेट्रोल खरेदी बंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आज मंगळवारी (दि. ३१) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांच्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी आज देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे.

आज होणार्‍या या आंदोलनात राज्यातील ६ हजार ५०० तर नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४५० पेट्रोलपंप चालक सहभागी होणार आहेत. केवळ आजच्याच दिवशी पेट्रोलपंप चालकांकडून इंधन खरेदी केली जाणार नाही. ग्राहकांच्या सुविधेकरिता पंपावर साठा उपलब्ध असेपर्यंत त्यांची विक्री जाणार असल्याचे संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

 

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना शेती व्यवसायात प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यसरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या देशासह महाराष्ट्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली गेली. सातत्याने इंधनाच्या होणाऱ्या वाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे त्यात शेतकरीही हवालदिल झाला आहे.

विशेष म्हणजे सध्या राज्यात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून राज्यात सरासरी डिझेलचे दर १०५ रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या या मोठ्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर देखील अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारतर्फे ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ अशा नावाची एक नवी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून मोठा फायदा होणार आहे.

विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान आर्थिक सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे.

शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून ? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे ठाकतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.


केंद्र सरकारचा खाद्य तेलांच्या किंमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय ! साठेबाजांवर कठोर कारवाई सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्रातील सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेल बियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलाशी संबंधित साठेबाजी तपासण्यासाठी छापे टाकले.

देशात अनेक ठिकाणी खाद्यतेल आणि तेल बियांची साठेबाजी होत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. तत्पूर्वी, महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा

सरकारने मार्च २०२४ पर्यंत वार्षिक २ दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर रद्द करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतरही स्वयंपाकाचे तेल स्वस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक २० लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर कस्टम ड्युटी लावली जाणार नाही. आयात शुल्कातील ही सूट देशांतर्गत किमती खाली आणेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.