Home Blog Page 174

शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल; रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. शासकीय शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेल्या मानांकनांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन मानांकनाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे.

आर्थिकदृष्ट्या समृद्ध लाभ घेत आहेत

वितरणात अनियमितता येऊ नये म्हणून नवीन मानांकन पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत. सध्या देशभरात ८० कोटी लोकं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानांकनांमध्ये बदल करणार आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना

आतापर्यंत ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना लागू करण्यात आली आहे. एनएफएसए (NFSA) अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी ८६ टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे १.५ कोटी लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत. नवीन मानांकने तयार केल्यानंतर वितरण व्यवस्था पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे.

केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल

गरजूंना डोळ्यासमोर ठेवून काही बदल करण्यात येत आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मानांकनांमध्ये बदल करण्याबाबत राज्यांसोबत बैठक घेतली जात आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानांकने तयार केली जात आहेत. ही मानांकने लवकरच निश्चित केली जातील. नवीन मानांकने लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल. अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही असे प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले.

मनसे ने हनुमान जयंती निमित्त शिवसेना भवनात हनुमान चालीसा आणि आरती करण्याची परवानगी मागून शिवसेनेला टाकले कोंडीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने पत्र लिहिलं आहे. मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा रद्द करण्यात आली. या यात्रेवर कायदा आणि सुव्यवस्था यावरून कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसंच माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी, या पत्रातून करण्यात आली आहे.

यशवंत किल्लेदार यांनी १६ एप्रिलला हनुमान जयंती निमित्त शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्या अशी पत्रातून मागणी केली आहे. सर्व ठिकाणी कारवाई करत आहात म्हणून शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे त्यामुळे परवानगी द्या, असं किल्लेदार यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेना भवन मध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरासमोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

रेकॉर्डवरील आरोपीला पकडुन बाजारपेठ पोलीस स्टेशन च्या पोलीसांनी केली उत्कृष्ट कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा रेकॉर्डवरील गुंड आरोपी फारीस इस्तीयक खोत राहणार: बाबू शेठ चाळ, चौधरी मोहल्ला, दुधनाका (कल्याण) हा   कोणता तरी अपराध करण्याच्या उद्देशाने राम मारुती चौक ह्या ठिकाणी एक लोखंडी सुरा घेऊन फिरत आहे अशी पोलीस नाईक बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि.नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि.अरुण घोलप व त्यांच्या डिटेक्शन टीमने आरोपी फारीस इस्तीयक खोत याला धारदार लोखंडी सुऱ्यासह शिताफीने पकडुन त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे कारवाई केलेली आहे.

सदरची कामगिरी वपोनि. नरेंद्र पाटील, पोनी राजेंद्र अहिरे/(गुन्हे), सपोनि अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. जातक, पोना. सचिन साळवी, पोना. प्रेम बागुल, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन साळवी हे करीत आहे.

 

नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

१२ एप्रिल रोजी ठाण्यातील गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवली.

या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला ३०० किलोचा मृत डॉल्फिन

मिरा भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर अंदाजे २५० ते ३०० किलो वजनाचा जवळपास साडेसात फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची रीतसर नोंद घेऊन मंगळवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावरच त्याचे दफन केले.

उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारी मृतावस्थेतील डॉल्फिन मासा सोमवारी आढळून आल्याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना मिळाली. सदर मासा कुजलेल्या अवस्थेत होता. शासनाच्या कांदळवन विभागास याची माहिती मिळाल्या नंतर मंगळवारी वनक्षेत्रपाल चेतना शिंदे, वनपाल सचिन मोरे सह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत डॉल्फिनचा पंचनामा करून किनाऱ्यावरच जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात त्याचे दफन करण्यात आले आहे.

सदर डॉल्फिन हा साडे सात फूट लांब व सुमारे २५० ते ३०० किलो वजनाचा असल्याचे वन विभागाने सांगितले. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी अंदाधुंद वाढत असलेले शहरी कारण त्यामुळे वाढते जल प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्यामुळेच समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे त्यामुळेच कदाचित हा डॉल्फिन मृत्यु पावला असावा आणि लाटांनी त्याचा मृतदेह किनारी लागल्याचे सांगण्यात आले.

भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यासह भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क कोळीवाडा व पश्चिम धक्का येथे देखील गेल्या काही काळात अनेक डॉल्फिन मासे अशा प्रकारे मृतावस्थेत सापडले आहेत. उत्तन समुद्रात तसेच भाईंदरच्या खाडीत देखील डॉल्फिनचा वावर असलेला अनेक वेळा पाहायला मिळतो. या ठिकाणी अनेक वेळा डॉल्फिन दिसून आले आहेत. तर समुद्र किनारी व खाडीतील पाण्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मत्स्य पैदास प्रचंड कमी झाली असून जलप्रदूषण हे भाईंदर मधील डॉल्फिन माश्यांच्या मृत्यूचे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे.