Home Blog Page 175

संजय राऊत ला राज ठाकरेंनी झोडपुन काढले ! पण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज झालेल्या “उत्तर सभेत” मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक नेत्यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले. यात दै. ‘सामना’ चे संपादक संजय राऊत हे देखील सुटले नाहीत. राज ठाकरेंनी शेलक्या भाषेत संजय राऊत यांचा खरपुस समाचार घेतला. मालमत्ता जप्त होताच त्यांची भाषा बदलली. पत्रकार परिषदेत शिवराळ भाषा वापरण्या इतके ते बिथरले. संजय राऊत नेमके शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळतच नाही.ते लवंडे आहेत. जिथे वरण पडते तिथे लवंडतात, अशी जहरी टीका राज ठाकरेंनी त्यांच्या “उत्तर सभेत” केली.

ही टीका राज ठाकरे यांनी केली त्या बद्धल संजय राऊत काय उत्तर देतात ते दिसेलच. परंतू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मी आठवण करून देतो की, हा भस्मासूर ‘सामना’ मधे आपल्याच आशीर्वादाने १९९२ साली लोकप्रभा मधुन आयात करण्यात आला होता. दैनिक ‘सामना’ मध्ये येण्यापुर्वी संजय राऊत हे गुन्हे वार्ताहर म्हणून होते. दै.सामनात पगारी संपादक म्हणून नोकरीस लागेपर्यंत संजय राऊत साधे शिवसैनिक तरी होते का ? हा संजय राऊत बुमरँग प्रमाणे आता उलटला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सांगावेसे वाटते –
तुम्हीने दर्द दिया है,
तुम ही दवा देना !

किरीट सोमय्या आज जात्यात आहे म्हणून संजय राऊत यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी संजय राऊत हे आज सुपात आहेत ! हे कटू सत्य नाकारता येणार नाही !

मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘आयएनएस विक्रांत’ निधी घोटाळाप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलगा नील सोमय्या याचाही अटकपूर्व जमीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांच्याही अडचणीत भर पडली आहे.

सेव्ह विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा किरीट आणि नील सोमय्या यांच्यावर ठपका आहे. या प्रकरणी सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावरील निकाल आजपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज हा निकाल वाचून दाखवत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला असल्याचे सांगितले. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे किरीट सोमय्या व नील सोमय्या या दोघा पिता पुत्रांना कोणत्याही क्षणी पोलीसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.

 

वाळू उत्खनन गटांचे लिलाव सुरु करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य शासनाने वाळू उत्खनन करण्याबाबत नवीन सुधारित धोरण आणले आहे. या धोरणानुसार सर्व निकष पूर्ण असलेल्या वाळू उत्खनन गटांचे लिलाव सुरु करावे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांना गती द्यावी, असे निर्देश महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरिक्षक आणि महसूल विभागाचे सहसचिव उपस्थित होते.

महूसलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील अनेक भागात वाळू अभावी बांधकामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या धोरणानुसार राज्यातील वाळू, दगड गटांचे लिलाव सुरु करण्याची गरज आहे. सर्व निकषांची पूर्तता असलेल्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया तातडीने सुरु करुन नागरिकांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन नागरिकांना दिलासा मिळेल व वाळूचोरी सारख्या प्रकारांना आळा बसेल. लिलाव प्रक्रिया वेळेत पूर्ण होतील यासाठी देखरेख करावी. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील प्रकरणांविषयी राज्य शासनाने प्रभावी आणि मजबुतीने भूमिका मांडण्याचे निर्देशही महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ई-पीक पाहणी संदर्भात माहिती घेताना येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद करण्यासंदर्भात राज्यव्यापी ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना श्री.थोरात यांनी यावेळी बोलताना केल्या.

हरकत नसलेले प्रलंबित नोंदणीकृत फेरफारची प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढावीत. सातबारा संगणकीकरण बहुतांशी पूर्ण झाले असले तरी ही प्रणाली टिकविण्यासाठी नवनवीन संशोधन करुन या प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल किंवा सुधारणा करण्यात यावी. नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करणे. क्षेत्रिय स्तरावरील महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा, दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याबाबत विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूल विभागाच्या महत्त्वाकांक्षी धोरण आणि निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचनादेखील श्री.थोरात यांनी यावेळी बोलताना केल्या.

 

मेल गाड्यांमधील प्रवाशांचे फोन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास कल्याण लोहमार्ग पोलीसांनी शिताफीने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण येथून सकाळी ०६.३० वा. सुटणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेस कल्याण ते पुणे असा प्रवास करत असताना एका प्रवाशाचा डब्यात चढत असताना त्याचा ₹.१०,५००/- किंमतीचा रेडमी कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रार कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे दि. १८.०३.२०१९ रोजी गुन्हा रजि क्र. ८८५/२०१९ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास मा. प्रभारी महिला पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार करत असताना त्यांना एक मोबाईल चोरणारा इसम कल्याण परिसरात येणार असल्याची गुप्त माहितीदारकडून माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.०५.०४.२०२२ रोजी ०२.५० वा. च्या सुमारास सापळा रचून आरोपी शुभम अरुण सानप (वय:२५ वर्षे) धंदा: गवंडीकाम, रा. रुम नं. ०८, गवळी बिल्डिंग चाळ, भोसरी पुणे. गावचा पत्ता: रा. शिवसेना वसाहत, वीर भगतसिंग नगर, अकोला यांस ताब्यात घेतले. नमूद गुन्ह्याचा अधिक तपास करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

आरोपी शुभम अरुण सानप (वय:२५ वर्षे)याच्याकडे पोलीस कोठडी रिमांड मुदतीत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने लांब पल्ल्याच्या मेल गाड्यांमध्ये प्रवाश्यांचे चोरलेले स्मार्ट मोबाईल फोन अकोला येथे जाऊन त्याच्याकडे अधिक तपास करून त्याच्याकडून ₹.१,२१,४८७/- किंमतीचे ०९ स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत केले असून सदर मोबाईल फोनच्या मालकांचा तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. श्री.कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, मा.सहा.पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई विजय दरेकर यांच्या आदेशानुसार कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी महिला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.आर.जी.चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सहा.पोलीस उपनिरीक्षक आर.टी.आखाडे, पोहवा. एम.आर.निमजे, पोना. पी.बी.पाटील, पोना. पी.पी.मोहिते, पोशि. कुंवर, पोशि. मुख्यदल, पोशि. चोरमले, तसेच अकोला रेल्वे पोलीस ठाण्याचे पोशि. यु.आर.जाधव यांनी केली आहे.

 

मोक्का गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या सराईत चैन स्नॅचर ला कल्याण क्राईम युनिट ने केले जेरबंद आणि दोन गुन्हे आणले उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि .०३/०४/२०२२ रोजी गांधारी, कल्याण पश्चिम येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन मोटरसायकल वरून दोन इसम जबरीने खेचून पळून गेले होते. त्याबाबत खडकपाडा पोलीस ठाणे गु.रजि नं १४२/२२ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा घटक -३ हे करत होते.

दि. ०६/०४/३०२२ रोजी युनिट कार्यालयातील पोहवा प्रवीण जाधव यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हा कल्याण परिसरात दुर्गाडी येथे येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्या आधारे कल्याण क्राईम युनिट – ३ मधील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून महमद आयाझ इस्तीयाज अन्सारी उर्फ आझाद अन्सारी (वय: २८) रा. भिवंडी यांस मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून त्याचे साथीदार १. अली, २. अकबर अमजद बेग, ३. हसनेन बरकत बेग, ४. अब्बास शब्बर जाफरी रा. भिवंडी यांच्या मदतीने व दोन मोटरसायकल वापरून वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यात सापडलेली पल्सर मोटरसायकलचा वापर सदर गुन्ह्यात केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडून एकूण रुपये ३३,०००/- किंमतीची मोटरसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर पांढऱ्या रंगाची मोटरसायकल चोरीबाबत भिवंडी शहर पोस्टे गु.रजि नं. १०५/२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.२९.०३.३०२२ रोजी नोंद आहे.

अशा प्रकारे चैन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे असे दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण ४ आरोपींना पकडण्यात आले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी हा सन २०१२ मध्ये मोक्का कायद्या अंतर्गत अटक होता तो डिसेंम्बर २०२१ मध्ये जेलमधून बाहेर आला होता. त्याच्यावर खालील प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे.
१. शांतीनगर पोलीस ठाणे गु.रजि नं. ४१/२०१२ भादवि कलम ३७९, ३४
२. वर्तकनगर पोलीस ठाणे गु.रजि नं. ९५/२०१२ भादवि कलम ३९२, ३४ सह (मोक्का १५/१२)
३. राबोडी पोलीस ठाणे गु.रजि नं. ७७/२०१२ भादवि कलम ३९२, ३४

सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी
१. अब्बास शब्बर जाफरी याच्यावर सोनसाखळी, मोटरसायकल चोरीचे ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरात एकूण ३० गुन्हे नोंद आहेत.
२. अली अकबर अमजद बेग याच्यावर सोनसाखळी, मोटरसायकल चोरीचे एकूण ०३ गुन्हे नोंद आहे.

सदरची कामगिरी कल्याण मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर शिरसाठ, पोनि आनंद रावराणे, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा.पो.उप.नि संजय माळी, पोहवा. बापूराव जाधव, पोहवा. प्रवीण जाधव, पोहवा. किशोर पाटील, पोहवा. शिंपी, पोहवा. अनुप कामत, पोहवा. सचिन साळवी, पोहवा. सोनावणे, पोहवा. बेलदार, पोना. साबळे, पोना. कडू, पोशि. शेकडो, पोशि. मिथुन राठोड, पोशि. गुरुनाथ जरग, पोशि. नवसारे, चपोहवा. बोरकर या कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे.