Home Blog Page 176

‘मँगो मॅन’ चा एक आगळा वेगळा उपक्रम; आंब्याचे बियाणे एकत्रित करून शेतकऱ्यांना देणार..

__
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  उन्हाळा सुरू झाला आहे त्यात फळांचा राजा म्हणजे ‘आंबा’ याचा सुद्धा मोसम आणि हंगाम सुरू झाला आहे. सर्वांना ज्ञात आहेच की, भारतात दररोज कोट्यावधी आंबे खाल्‍या जातात आणि त्‍याचे ‘बाटे’ रोज केरात फेकल्या जातात. हे सहसा कचरा किंवा रस्त्यावर उतरते. मुंबई येथील एक अवलिया डॉमिनिक फर्नांडिस ज्याला ‘मँगो मॅन’ असे संबोधले जाते यांनी हे बाटे जमवून बियाणे म्हणून काही स्वयंसेवी संस्थांना देण्याचा विचार केला जे नंतर ते महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पाठवतील जेणेकरून त्यांना शाश्वत उपजीविका मिळेल.

हा एक महान विचार आहे नाही का ? एक उत्तम कामाची संधी. ते लोकांना बिया नीट धुवून स्वच्छ करायला सांगतात आणि नंतर त्या उन्हात वाळवून त्याच्याकडे पार्सल करायचं असते.

आपण एकवेळ श्वास घेणे थांबवू शकत नाही परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे करू शकतो ते म्हणजे आपण श्वास घेत असलेली हवा शुद्ध करणे. त्याच शुद्ध श्वासांसाठी ही एक धावपळ हीच या उपक्रमाची संकल्पना असून आपण सर्व साथ द्याल असे अपेक्षित आहे. पत्ता जाणून घेण्यासाठी व्हॉट्सऍप् करा..
डॉमिनिक फर्नांडिस – 9966633632

कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यावर १० हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या तहसील कार्यालयातील तलाठी अमृता बडगुजर आणि तिचा खासगी सहाय्यक अनंत कंठे यांना २३ मार्च रोजी ४५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या घटनेला १३ दिवस होत नाही तोच मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याही विरोधात १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत विभागाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदाराच्या खडवली जवळील मु. गेरसे येथे सर्व्हे नंबर १० हिस्सा नंबर ४/अ या एकूण क्षेत्र हेक्टर ४२ आर ५ प्रती या खरेदी केलेल्या जमीनीवर अधिकार अभिलेखात ७/१२ वर नाव दाखल करण्याकरिता मौजे गरसेच्या तलाठी अमृता बडगुजर हिला १० हजार रूपये दिले होते. तर २3 मार्च रोजी केलेल्या पडताळणीत मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे यानेही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्या कार्यालयातील त्याचा साथीदार निलेश चौधरी याने लाचेच्या मागणीस प्रोत्साहनात्मक स्वरूपाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंडळ अधिकारी राजेंद्र बाबुराव बोऱ्हाडे याच्यासह त्याचा साथीदार निलेश बाळाराम चौधरी या दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे (सुधारीत २०१८) चे कलम ७, ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनाक्रमानंतर कल्याणच्या तहसील कार्यालयाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण कधी संपणार, अशा चर्चा या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांत रंगलेल्या दिसत आहेत.

 

‘ईडी’ च्या कारवाई नंतर संजय राऊत आक्रमक ! मी तुमच्या बापालाही घाबरत नाही..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रवर्तन निदेशालय अर्थात ‘ईडी’ ने आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथे दोन ठिकाणची मालमत्ता जप्त केली असून, या कारवाई नंतर खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही” अशा आक्रमक शब्दांचा वापर करत थेट इशाराच दिला आहे.

एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने त्यांची अलिबागमधील ८ प्लॉट ची जमीन आणि दादर मधील एक फ्लॅट जप्त केला असून, यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘मी तुमच्या बापालाही घाबरत नाही,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. संपत्ती म्हणताय तर तीथे राहते घर असेल किंवा कुणी कष्टाच्या पैशांतून घेतलेले असेल तर त्याचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत”, असे राऊत यांनी म्हटले आहे.

माझी संपत्ती काही नाही, जमिनिचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर २ रूम किचन एका मराठी माणंसाचे घर, एका मध्यमवर्गिय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे ५० गुंठ्याची जमिन, याला कुणी संपत्ती म्हणत असेल, तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. एवढेच नाही, तर अशा कारवायांपुढे संजय राऊत आणि शिवसेना झुकणार नाही आणि वाकणारही नाही, असेही राऊत म्हणाले.

 

अलिबाग येथील जमिनीचे ८ प्लॉट जप्त करत ‘ईडी’ ची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडीकडून कारवाई करण्यात आली असून संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. तसेच याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबाग मधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबाग मध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत गेल्या दीड महिन्यापासून ईडीकडून त्यांच्याकडे विचारणा सुरू होती. त्यादरम्यान मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्यामुळे पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. या आलेल्या संशयातूनच ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. तसेच अलिबाग मधील एकूण ८ प्लॉट आणि दादर मधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला असून, याचा संबंध संजय राऊत यांच्याशी असल्याचं म्हटलं आहे.

या आधी गोरेगावमधील पत्राचाळचा घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. म्हणूनच या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. तर या चौकशी अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीसांनी घरातून मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ मध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना सध्या न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात सुनील सरोज हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १ एप्रिल रोजी त्यांच्याकडे नातेवाईक आले असल्यानं त्यांनी नातेवाईकांची सोय त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर रिकामी असलेल्या खोलीत केली. यानंतर पहाटेच्या सुमारास सरोज यांना वरच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने त्यांनी वर जाऊन पाहिलं असता तिथे एक चोरटा सुनील यांच्या नातेवाईकांचे पैसे आणि मोबाईल चोरत असल्याचं आढळलं. त्यामुळं त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता हा चोरटा खाली असलेल्या त्याच्या एका साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेला.

या प्रकरणी सरोज यांनी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी काही तासातच या दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. आसिफ मेहमूद खान आणि अक्षय उर्फ सुर्य मारी नायर अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही उल्हासनगरला राहणारे असून त्यांचा यापूर्वीचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.