Home Blog Page 179

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यां तर्फे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांचा सत्कार!

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई, प्रतिनिधी: एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी मेहुल खळे ह्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा छोटेखानी सत्कार केला.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमां संदर्भात चर्चा केली. महिलांचे शिक्षण व समकालीन प्रश्न ह्या विषयावर लवकरच मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे एक परिसंवाद आयोजित करण्यात यावे अशी विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांच्याकडे मेहुल खळे यांनी केली.

ह्या बैठकीस विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव बाळू राठोड देखिल उपस्थित होते.

बनावट करारनामा करून ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडप करणाऱ्या सहा जणां विरुद्ध काशिमीरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल!

संपादक: मोईन सय्यद/मिराभाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: मुंबईत राहणाऱ्या एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्यासाठी बळजबरी कब्जा करुन मृत व्यक्ती सोबतचा बनावट नोटरी करारनामा दाखवून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्वतःच्या नावे कर आकारणी करून घेत ज्येष्ठ नागरिकालाच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी ५ महिलांसह ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश कुमार सेठ (७४) रा. अंधेरी, लोखंडवाला यांच्या फिर्यादी नुसार, काशिमीरा महामार्ग लगत महाजनवाडी येथे त्यांची ११ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी बॉसी बारच्या पुर्व दिशेला सर्विस रोड लगत त्यांचे २ गाळे असून कोरोना संसर्ग काळा पासून ते गाळे बंदच आहेत. गाळ्याची घरपट्टी, लाईटबील सेठ यांच्या नावे असुन, सदर गाळ्यास लोखंडी शटर व जाळी मारलेली आहे.

२३ डिसेम्बर २०२१ रोजी ते दोन्ही गाळ्यांची पाहणी करण्यास ते गेले असता एका बाजुने कोणीतरी गाळ्यांची भींत तोडुन त्यास दरवाजा बसवुन, गाळ्याचा कब्जा करून वापर करीत असल्याचे दिसले. त्यावेळी निलेश जतान्ना उर्फ अन्नु याने ही जागा आमची आहे, इकडे परत आलास अशी धमकी देवुन शिवीगाळी केली. दोन दिवसांनी सेठ यांनी गाळ्यात बांधलेला दरवाजा बांधकाम करुन बंद करून टाकला.

तेव्हापासुन निलेश याने त्याची आई शोभा जतान्ना व इतर ३ महीलांना गाळ्याच्या समोर बसवून ठेवले होते. २८ जानेवारी रोजी सेठ हे गाळ्याच्या ठिकाणी गेले असता निलेश, शोभा, पुनम जतान्ना व इतर ३ अनोळखी महिलांनी सेठ याना शिवीगाळ, दमदाटी करून तू परत आलास तर ब्लाउज फाडून तुझ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करू असे धमकावले. त्यामुळे गाळा मालक सेठ घाबरून परत त्या ठिकाणी गेले नाहीत.

ही घटना घडल्या नंतर त्यांनी मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये चौकशी केली असता, त्यांचे काका नरेश सेठ २००७ साली मृत झालेले असताना निलेशने नरेश यांचे सोबत २००८ साली नोटरी केलेला खरेदी करारनामा मालमत्ता कर आकारणी स्वतःच्या नावे करण्यासाठी सादर केल्याचे आढळून आले व त्या आधारावर निलेश ने गाळ्याला मालमत्ता कर स्वतः च्या नावाने लावून घेतला. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी १६ मार्च रोजी निलेश, शोभा, पूनम व अन्य ३ महिलांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. तर संगनमत करून कर आकारणी करणाऱ्या मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या प्रकरणात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक देखिल सामील असल्याचे बोलले जात आहे. आणि त्यामुळेच गाळा हडप करण्याचा या प्रकरणात अशा प्रकारे प्रभावशाली लोकांचा सहभाग आणि पाठिंबा असल्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जाईल का? आणि पीडित ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांचे आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर; पश्‍चिम द्रुतगती महामार्ग (जेव्हीएलआर जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा होणार सुशोभित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


  मुंबईसह जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणांवर उभारण्यात आलेल्या व येणार्‍या उड्डाणपुलाखालील वाढती अतिक्रमणे दूर करुन त्या जागा सुशोभित करण्यात येणार असून पश्‍चिम द्रूतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणुपलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणाकरीता ऑबेरॉय रियल्टी यांना देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नांद्वारे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देेताना दिली.

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मुंबईच्या विविध भागांमध्ये उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर एमएमआरडीएच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी मेट्रोची कामेही सुरू आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातही जेव्हीएलआर व पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. यात पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्‍वरी वाहतूक चौकी, सिप्झ गेट नंबर ३ समोर, जेव्हीएलआर, आरे जंक्शन, पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथील ऑबेरॉय मॉल, येथील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याचे वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणले. या उड्डाणपुलाखाली बेकायदेशीरीत्या अनेक नादुरुस्त वाहने अनधिकृतरित्या उभी असतात. याच उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधाकम करुन वास्तव्यास असलेले लोक त्यांचे प्रात:विधी याच परिसरात करीत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

त्यामुळे ज्या ज्या उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करुन तसेच या जागेवर अनधिकृतरित्या उभी करण्यात आलेली जुनी व नादुरुस्त वाहने हटवून या उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करुन आकर्षक रचनेची उद्याने बांधून ती जनतेसाठी खुली करावीत, अशी मागणी आमदार वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहात केली. या प्रश्‍नाला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी,‘सिप्झ गेट नंबर ३’ येथील काही मोकळ्या जागेत काहीवेळा बेघर लोक वास्तव्य करीत असल्याचे मान्य केले. जेव्हीएलआर, आरे व ऑबेरॉय मॉल जवळील उड्डाणपुलाखाली मेट्रोलाईन-६ व व मेट्रो लाईन-७ चे कार्यालय असून ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यावर हे कार्यालय तेथेच राहणार असून पश्‍चिम द्रुतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणाकरीता मे.ऑबेरॉय रियल्टी यांना वाटप करण्यात आल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.

 

शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी कापडी पिशव्या वाटून शिव जयंती निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला!

मिरा भाईंदर: शिवसेना प्रभाग क्र.१९ च्या वतीने प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिव जयंती साजरी केली.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३७२ वा जयंती सोहळा (तिथीनुसार) सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी नुपूर नगर येथे प्रभाग १९ च्या वतीने संपन्न झाला.

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी व आमचा प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रभाग १९ मध्ये प्लास्टिकच्या पिशवी न वापरण्याचे आवाहन करण्याते येत असून शाखेतर्फे प्रभागातील लोकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

शिव जयंती नमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रभागातील लोकांनी मोठ्या उत्साहात भाग घेऊन या कापडी पिशव्या वाटपाचा भरपूर लाभ घेतला व निश्चय केला की आम्ही बाजारात जाताना कापडी पिशवीच सोबत घेऊन जाऊ!

शिवसेना उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा व विभाग प्रमुख दिलीप सावंत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौरभ त्रिपाठी या खंडणीखोर (आयपीएस) अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे सुपूर्द..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खंडणीखोर (आयपीएस) अधिकारी सौरभ त्रिपाठीचा निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलीसांकडून महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे. सौरभ त्रिपाठी हे अंगडिया खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत. एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे. वंगाटे पोलीस चौकशीत सौरभ त्रिपाठी यांच्या सांगण्यावरुन खंडणी मागितल्याचे सांगितले होते.

ओम वंगाटे या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. २०२१ वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलीसांची वागणूक आणि पोलीस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशनला न आल्यानं अधिक संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.