Home Blog Page 180

पैश्यांचे अमिश दाखवून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका नराधमाला पुण्यातील दौंड पोलीसांनी केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पैश्यांचे आमिष दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील एका वर्षापासून हा प्रकार त्या मुलीसोबत होत आहे. घरी कोण नसल्याचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील कानगाव मध्ये घडली आहे. वीस रुपयांचे आमिष दाखवून ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार हा नराधम करीत होता. याची माहिती मुलीच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर आरोपीविरोधात त्यांच्यातर्फे पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या नराधमाला यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अटक केली आहे व विविध कलमांतर्गत या आरोपीच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत. मागील वर्षभरापासून हा प्रकार होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मयूर पांडुरंग फडके असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. तो दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पाटस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तत्काळ आरोपी मयूर फडके यास अटक केली.

आरोपी मयूर फडके याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी संबंधित माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.

 

कल्याणच्या कर्तव्यतत्पर रेल्वे पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी; रेल्वेत विसरलेली सव्वा चार लाखांचा ऐवज असलेली बॅग केली परत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १५/०३/२०२२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल चोले व पोलीस नाईक मसळे असे बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दिवसपाळी ड्युटी करत असताना उल्हासनगर येथील ड्युटीवरील पोलीस कॉन्स्टेबल मसने यांनी फोनद्वारे त्यांना कळविले की डाऊन बदलापूर लोकल ट्रेन मध्ये ऐक महीला प्रवाशी यांची लाल रंगाची बॅग विसरलेली आहे तरी सदरची महिला उल्हासनगर येथे उतरली आहे सदरची गाडी तात्काळ अटेंड करा असे कळविल्याने पोलीस कॉन्स्टेबल चोले यांनी सदरची लोकल बदलापूर येथे अटेंड केली असता सीएसटी बाजूकडील पहिल्या महीला जनरल डब्यामध्ये लाल कलरची बॅग मिळून आल्याने ते रेल्वे पोलीस चौकीमध्ये आणुन आतील सामानाची खात्री केली असता खालील नमूद सामान त्यात मिळून आले.

१) लाल रंगाची बॅग.
२) २,५०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे साडेचार तोळ्यांचे गंठण.
३) ५१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे ऐक तोळ्यांचे मंगळसूत्र.
४) ५१,०००/- रुपये किमतीचे ऐक तोळ्यांची सोन्याची चैन.
५) ५०००/- रुपये किमतीचे सोन्याची १ ग्रॅमची छोटी चैन.
६) १०,०००/- रुपये किंमतीची कानातले २ ग्रॅम टॉप्स.
७) ३०,०००/- रुपये किंमतीची सोन्याचे ६ ग्रॅमचे झुमके.
८) १०,०००/- सोन्याचे अशोक चक्र २ ग्रॅम.
९) १०,०००/- सोन्याचे कानातले वेल २ ग्रॅम.
१०) ५००/- सोन्याची नथ
११) ५००/- रुपये किमतीची सोन्याची बाली.
१२) ७,५००/- रुपये किमतीचे सोन्याचे १९ मनी.
१३) जुने वापरते कपडे.
असा एकूण ऐवज ४,२५,५००/- रुपये.

सदर बॅगेची व आतील सामानाची खातरजमा करून चौकशी केली असता महिला प्रवाशी नामे शीतल प्रशांत गायकवाड रा. नवी मुंबई यांचीच ती असल्याबाबतची खात्री करून सदरची बॅग व आतील सामान त्यांचे ताब्यात दिले आहे. शीतल प्रशांत गायकवाड यांनी कर्तव्य तत्पर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी.शार्दुल व कल्याण रेल्वे पोलीसांचे खुप खुप आभार मानले आहेत.

 

पदाधिकारी हल्ला प्रकरणी भाजपाचे रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन; उपोषण तुर्तास स्थगित..

 

 

 

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्व येथील भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या मनोज कटके नामक पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला झाल्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपाने डोंबिवलीत रामनगर येथील पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन व लाक्षणिक उपोषण केले. मात्र हल्लेखोरांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात २८ तारखेला भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या घटनेला १५ दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अध्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हल्ला झालेल्या भाजपा पदाधिकारी मनोज कटके याची भेट घेतली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्यांनतर या प्रकरणाचा तपास पुढे गेला नसल्याने आम्ही संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

याच दरम्यान भाजपाने दिलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलिस ठाण्याबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या परिसरात उपोषणाला बसण्यास परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला. त्यामूळे पोलीस ठाण्याबाहेर असणाऱ्या पादचारी पथावर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. मात्र एसीपी यांनी आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आपण हे आंदोलन तूर्तास मागे घेतल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

“झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या/खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी वर्ग, यांच्यासाठी छोटेखानी स्वरूपात आयोजिलेल्या “झुंड” या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काढले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमधून क्रीडा प्रतिभा निवडून त्यांना संधी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांनी अशाप्रकारे अधिकारी वर्गासाठी एक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. या चित्रपटाच्या खेळापूर्वी झुंड चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी नागराज मंजुळे यांनी चित्रपट निर्मितीबाबतच्या आपल्या उद्देशाची माहिती आयुक्त व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली आणि चित्रपटाच्या खास शो प्रदर्शनाबाबत आयुक्तांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नेहमीच कटाक्ष ठेवला असून आता कोरोना साथीचे स्वरूप निवळल्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या महापालिका अधिकाऱ्यांना इतर विकास कामांबरोबरच, क्रीडा बाबींवर लक्ष घालण्यासाठी त्यांनी संधी निर्माण करण्यसठि उद्युक्त केले आहे.त्याचप्रमाणे महापालिकेच्या सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या क्रीडा गुणांचा विकास करण्याकरिता ‘सावळाराम महाराज म्हात्रे’ क्रीडा संकुलाचा कायापालट करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे . खंबालपाडा येथे एक अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम बुद्धिबळ इ. विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहेत, त्याचप्रमाणे महापालिकेच्या आरक्षित जागेत एक इनडोअर कबड्डी स्टेडियम व बारवी येथे एक फुटबॉल स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. नागरिकांच्या शारीरिक आरोग्य व क्रीडा गुणांच्या विकासासाठी महापालिका क्षेत्रात कबड्डी करिता किमान ५० कबड्डी कोर्ट, ३ फुटबॉल. ५ क्रिकेट, २५ व्हॉलीबॉल, १० खो-खो साठीची मैदाने विकसित करण्याचा मानस आहे, जेणेकरून नागरिकांची खेळाप्रती आवड वाढीस लागून कल्याण-डोंबिवली हे शहर खेळाडूंचे शहर म्हणून ओळखले जावे असा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मानस आहे. तसेच खेळाडूंना खेळासाठी मैदाने पूर्ण वेळ उपलब्ध व्हावीत याकरिता खेळाच्या मैदानावर कोणतेही राजकीय समारंभ, लग्न समारंभ आयोजित न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे.

खेळाडूंच्या, क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी तसेच नागरिक अग्रस्थानी ठेऊन सेवा देण्यासाठी अधिकारी वर्गास प्रोत्साहित करण्याकरिता “झुंड” चित्रपटाच्या खास शोचे आयोजन करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे महापालिका सचिव संजय जाधव व आयुक्तांचे स्वीय सहाय्यक उमेश यमगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सिद्धेश राणे जिल्हाध्यक्ष तर ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर विजयी!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

मुळात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा युवक काँग्रेसच्या सर्वच पदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली असली तरी पक्षांतर्गत वाद पेटू नये म्हणून युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल मात्र अद्यापही गुलस्त्यातच ठेवण्यात आलेला आहे.

या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत मिरा भाईंदर शहरातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन तसेच मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडलेल्या निवडणुकीत मिरा-भाईंदर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सिद्धेश प्रकाश राणे यांनी 3509 मतं मिळवून 3472 मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला तर ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष म्हणून कुणाल काटकर यांनी एकूण 2289 मतं मिळवून 1756 च्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.

या निवडणुकीच्या माध्यमातून दोन सर्वसामान्य घरातील युवकांना मिरा-भाईंदर शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत या दोघांनीही आपल्या विजयाचे श्रेय माजी आमदार मुझफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत व संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीला दिले आहे.

मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर सिद्धेश राणे आणि ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर यांची निवड झाल्यामुळे शहरातील काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या दोघांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“सदर निवडणुकीत मतदारसंघातील व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या मोलाच्या साथीमुळे, घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा विजय आपल्याला बहुमताने मिळवता आला आणि म्हणूनच हा विजय आज आपण साजरा करत आहोत, खरंतर हा विजय फक्त माझाच नसून मतदारसंघातील, शहरातील काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आणि सर्व युवा मतदारांचा आहे, तसेच निवडणूकीच्या सुरवातीपासूनच सर्वांकडून मिळालेल्या सहकार्य, प्रेम आणि आशीर्वादासाठी मी संपूर्ण काँग्रेस परिवाराचा कायम ऋणी आणि कृतज्ञ आहे” – कुणाल काटकर (युवक काँग्रेस अध्यक्ष, ओवळा-माजिवडा विधानसभा)