Home Blog Page 181

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकार मागे हटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

* मास्क न घातल्यास दंड नाही.

* आतापर्यंत वसूल केलेला सर्व दंड परत करावा लागेल.

* दोषी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बीएमसी मार्शल, आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांच्यावर आयपीसी ३८४, ३८५, ४२०, ४०९, १२० (बी), १०९, ५२ इत्यादी कलमांखाली कारवाई केली जाईल.

* ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ (एआयएम) आणि ‘इंडियन बार असोसिएशन’ (आयबीए) यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले.

* मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.


           एडवोकेट निलेश ओझा
                 राष्ट्रीय अध्यक्ष
          इंडियन बार एसोसिएशन

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मध्ये मास्क न घातल्यास दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नाही. परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्रातील नागरिकांना मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये आणि नंतर ५०० रुपये दंड ठोठावण्याचा बेकायदेशीर आदेश जारी केला.

लसीच्या सक्तीच्या आदेशाविरुद्ध जनहित याचिका (पीआयएल) सुनावणी सुरू असताना ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ही याचिका श्री. फिरोज मिठीबोरवाला आणि श्री. योहान टेंग्रा यांनी दाखल केला होता.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना आदेश देण्याचा अधिकार नसून त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

याचिका कर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की बेकायदेशीरपणे दंड वसूल करणे ही खंडणी आहे आणि दोषी अधिकारी आयपीसी ३८४, ३८५, ४२०, ४०९, १२० (बी), ३४, १०९ इत्यादी कलमांनुसार जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. नंतर, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशांमधून मास्कचा दंड काढून टाकण्यात आला आहे.

या बेकायदेशीर वसुलीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांनी साथ दिली आणि त्यांनी दंड वसूल करण्याचे कंत्राट अन्य लोकांना दिले.

मुंबईकरांना मूर्ख बनवून आतापर्यंत १२० कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली. हे सर्व दंड परत करण्याचे आदेश देण्यासाठी पुढील आठवड्यात एक नवीन जनहित याचिका दाखल केली जाणार आहे, असे इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले.

 

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे महिलांकरीता भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

मिरा भाईंदर: 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस असतो प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा, अभिमानाचा, त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानचा. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचे प्रमुख उद्देश हेच की स्त्रियांना सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची जाणीव करून देणे. घर, व्यवसाय, नोकरी अशा विविध लढाया सांभाळत स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला अनोखा ठसा उमटवत आहे. परंतु हे सर्व लीलया पार पाडत असताना तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत किंवा काही स्त्रियांना परिस्थितीमुळे दुर्लक्ष्य करावे लागते.

सर्व लढवैय्या स्त्री ने स्वतःच्या आरोग्याबाबतही सजग व्हावे म्हणून शक्ती जनरल युनियन, रुद्रा फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे मीरा भाईंदर शहरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाचा कालावधी हा ८ मार्च २०२२ सकाळी १०.०० ते सायंकाळ ४.०० वाजेपर्यंत असेल. या शिबिरांतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.

मोफत वैद्यकीय सल्लामसलत, मोफत स्त्रीरोग तपासणी, मोफत रक्त तपासणी (रक्तातील साखर, सीबीसी, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड, मूत्रपिंड आणि यकृत कार्य)
मोफत BMD चेकअप
मोफत त्वचा / केस / वजन कमी करणे / आहार आणि पोषण उपचार, मोफत होमिओपॅथिक सल्लामसलत, मोफत अस्थमा तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत कॅन्सर मॅमोग्राफी, मोफत फिजिओथेरपी

मिरा भाईंदर शहरातील गरजू महिलांनी या आरोग्य शिबीर मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अन्नू पाटील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: श्रीमती अन्नु पाटील
अध्यक्षा : शक्ती जनरल कामगार यूनियन/
रूद्रा फ़ाउंडेशन
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस.
राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी.

दिनांक- ८ मार्च २०२२
वेळ- सकाळ १० ते संध्याकाळ ४ वाजेपर्यंत
स्थळ- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, सेक्टर ४, शांती नगर, स्टेशन रोड, मिरारोड (पूर्व)

केंद्र सरकार कडून महाराष्ट्र राज्याला ३५५ कोटींचा राष्ट्रीय आपत्तीनिधीतून निधी मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी १,६८२.११ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्ष २०२१ मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी या पाच राज्यांना १,६६४.२५ कोटी आणि पुद्दुचेरीला १७.८६ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

उच्च न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यांचे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. या आंदोलनाला तीन महिने झाले तरीही या मागणीवर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. उच्च न्यायालयाने विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाने विलीनीकरणाच्या प्रश्नावरून उच्च सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या त्रिसदस्यीय समितीने विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष काढून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाचा राज्यसरकार सेवेत विलीनीकरण करता येणार नाही असा अहवाल या उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे. ही मागणी नाकारल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा कायदेशीर मार्ग बंद झाला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे शून्य रुग्ण आढळून आल्याने शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोना रुग्णांची संख्या शून्य आढळून आल्याने शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक तात्या माने, अमोल पाटील, संजय मोरे यांनी आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची त्यांच्या कार्यालयीन दालनात जाऊन भेट घेतली. रुग्ण संख्या शून्य आढळून आल्याने आयुक्तांचे कौतूक केले. त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा आयुक्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

कोरोना संकट काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल केंद्राकडून महापालिकेस ‘इन्व्होशन अॅवार्ड’ देऊन गौरविण्यात आले होते. ही किमया देखील आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेच फलीत होते. त्यानंतर आज पुन्हा रुग्ण संख्या शून्य आढळून आल्याने त्यांच्या पाठीवर शिवसेनेकडून कौतूकाची थाप देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोरोना काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडे दिलेले विशेष लक्ष यामुळे आजचा दिवस बघायला मिळतो आहे, कोरोना मुक्तीचे हे दिवस असेच टिकून राहो व नागरिकांचे जीवन भयमुक्त असे पूर्ववत होवो अशी सदिच्छा यावेळेला शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केली.