Home Blog Page 182

रशिया – युक्रेन युद्धजन्य परिस्थितीत जोखमीच्या कामात मोलाचा वाटा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एअर इंडियामध्ये डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले अजित जनार्दन पाटील यांचा युद्धजन्य युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी गेल्या आठवड्यापासून तीन वेळा ते एअर इंडियाच्या विमानातून बुडापेस्ट, रूमानिया इथे जाऊन आले. आतापर्यंत सुमारे ९०० ते १००० भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या कामात ते सहभागी होते.

भारत सरकारमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जेव्हा परदेश प्रवासाला जातात तेव्हा त्या विमानाच्या देखभालीची जबाबदारी प्रामुख्याने या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर असते. अजित पाटील यांच्यावर आतापर्यंत अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान अशा पदावरील व्यक्तींचा समावेश आहे.

डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर अजित जनार्दन पाटील

रशिया – युक्रेन यांच्यादरम्यान भडकलेल्या युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन इथे अडकून पडले आहेत. या अतिशय जोखमीच्या ऑपरेशनसाठी विद्यार्थ्यांना आणणा-या विमानाबरोबर जाण्याची तयारी अजित पाटील यांनी दर्शवली.

मूळचे जळगावचे असलेले अजित पाटील त्यांच्या बालपणापासून डोंबिवलीकर असून, येथील धनाजी नाना चौधरी (डीएनसी) बहुद्देशीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या मित्रांशी यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की “हे कोणा एकट्याचे काम नाही. मी या ऑपरेशन टीमचा एक भाग आहे. टीम म्हणून आम्ही आमची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडत आहोत, त्यातून आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्यात हातभार लागत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे. माझ्या कामाने मला देशासाठी योगदान देण्याची संधी मिळाली म्हणून मी एअर इंडियाप्रती अतिशय कृतज्ञ आहे. युक्रेनहून आलेल्या या मुलांमध्ये मला माझ्या तरूण मुलांचे चेहरे दिसत होते. त्यामुळे त्यांच्या पालकांची अस्वस्थता, घालमेल मी समजू शकत होतो. या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रूमानिया आणि हंगेरी जवळच्या विमानतळावर बोलावून घेतले. तिथवर पोचण्यासाठीही अनेक मुलांना दिव्यातून जावे लागले. मात्र जेव्हा ते विमानात बसले तेव्हा  त्यांच्यासह आम्हां सर्वांनाच झालेला आनंद हा शब्दांपलिकडचा आहे.”

आज संध्याकाळी चौथ्यांदा ते या कामगिरीसाठी रूमानियाला रवाना होत आहेत.

 

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या मान्य; पहा कोणत्या मागण्या झाल्या पूर्ण !*


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून राज्य सरकारकडून जे फायदे देता येतील ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या लढ्याला आज यश मिळाले आहे. आजचा दिवस हा आनंदाचा, विजयाचा दिवस आहे असे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्याही माहिती जनसमुदायाला दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान येथे उपस्थित असलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांपुढे मागण्या वाचून दाखविल्या.

न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश देण्यात आला. परंतु, सप्टेंबर २०२० नंतर सुधारित निवड यादी नुसार जे एसीबीसीएस, ईडब्ल्यूएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडले. त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अधिसंख्य पद म्हणजे सिलेक्शन झालं होतं किंवा पॉईंट मिळाली नव्हती अशा सर्व तरुणांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत यावर खूप चर्चा झाली. कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले. पण, मुख्यमंत्री यांनी काय होईल ते बघू. आपण कायदेशीर लढाई लढतोच आहोत. परंतु, हा प्रलंबित विषय आहे. आपलेच लोक सिलेक्शन होऊनही नोकरीपासून वंचित आहेत. त्यांच्याबद्दल आपणाला निर्णय घेता येईल. तंटामुळे अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या आत हे पद निर्माण करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

या मागण्या झाल्या पूर्ण..

सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येणार परदेशी शिक्षणासाठी कर्जमर्यादा १० लाख होती ती १५ लाख केली. परदेशी शिक्षणासाठी व्याज परत देण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्त पदे भरणार कोपर्डी खून खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत महाधिवक्ता यांना विनंती करणार. १५ दिवसाच्या आत याप्रकरणी हायकोर्टात अर्ज करण्यात येईल. याबाबत गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मी स्वतः पाठपुरावा करणार आहोत. ज्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत ‘केस टू केस’ प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल. आंदोलनात मृत पावलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठा फेरबदल; जाणून घ्या सुधारित दर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. अशातच, १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत फार काही बदल झालेले नाहीत. मात्र, सध्याच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला.

ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमाती १७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७३६ रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते २००० आणि डिसेंबरमध्ये २१०१ रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ते स्वस्त झाले आणि १९०७ रुपयांवर आले.

दरम्यान, सध्याच्या जाहीर झालेल्या नवीन दारांमधील बदल लक्षात घेता नवीन सिलिंडरचे दर तब्बल १०५ रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, ७ मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडर देखील महाग होण्याची शक्यता आहे. कारण सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान ३ मार्चला आणि सातव्या टप्प्याचे मतदान ७ मार्चला आहे. अशा परिस्थितीत ७ मार्चनंतर सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, १९ किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर १ मार्चपासून दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी २०१२ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता १९८७ ऐवजी २०९५ रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता १८५७ रुपयांवरून १९६३ रुपयांपर्यंत वाढली आहे.

दरम्यान, देशातील मुख्य पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून दिलासा मिळाला आहे. अगदी ६ ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती $ १०२ प्रति बॅरल अशी वाढ झाली, तरीही कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर म्हणजेच ७ मार्चनंतर गॅसच्या दरात प्रति सिलेंडर १०० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

गल्लीत चोरी दिल्लीत बेडया! नवघर पोलिसांची दबंग स्टाईल कार्यवाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: विष्णू गायकवाड

भाईंदर : मुंबईसाठी सोनसाखळी चोरी काही नवीन बाब नाही पण काही वर्षांपासून मुंबई पोलिसांनी या भुरट्या चोरांना चांगलाच आळा घातला आहे तरीही अधून-मधून हे चोर आपलं डोक वर काढतच असतात तर पोलीस सुद्धा ते ठेचण्यासाठी आपला दंडुका घेऊन सज्जच असतात.

भाईंदर पूर्व मधून चैनसाखळी चोरी करून दिल्ली गाठणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी थेट दिल्लीत बेडया ठोकून हे पुन्हा सिद्ध केल आहे.

वारंवार पोलिसांकडून जनजागृती करूनही जनता आपल्या मैlल्यवान वस्तू सांभाळण्यास कधी -कधी असमर्थ्य ठरते, चोर जनतेच्या बेसावध पणाचा फायदा घेत संधी साधतात व जनतेची तारांबळ उडते.

असाच एक प्रकार भाईंदर( पूर्व ) येथे घडला, सौ. राजेश्वरी विनोद सिंग वय वर्ष 40 या 8 फेब्रुवारी रोजी रोजच्या प्रमाणे आपल्या मुलाला बसने शाळेत पाठवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या एव्हढ्यात दोन अनोळखी दुचाकी स्वारानी त्यांच्या गळ्याला हिसका मारत त्यांची दिड तोळ्याची सुमारे 52000 रु किमतीची सोनसाखळी घेऊन पसार झाले होते.

प्रसंगी त्यांनी सतर्कता दाखवत नवघर पोलीस स्टेशन गाठलं, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या आदेशानुसार ठाण्यात भा. द. वि. स. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी आपल्या तपास कार्याला गती दिली व दिवस रात्र एक करून शेवटी पोलिसांना यश मिळाल, गुन्हेगारांची तपासाजोगी माहिती तपासकर्त्यानां मिळाली मालवणी मुंबई येथे राहणारे ते गुन्हेगार तांत्रिक बाबींवरून तपासणी केली असता आरोपी थेट दिल्लीला दिसत होते.

नवघर पोलिसांनीही आपली स्वारी थेट दिल्लीकडे वळवली व आरोपीना ताब्यात घेतले आणि गल्लीत चोरी करणाऱ्या चोरांच्या थेट दिल्लीत मुसक्या आवळल्या.

आरोपी 1) रिजवान हैदर अली हुसेन हैदर वय वर्ष 25 रा मालवणी मुंबई, मूळ उत्तर प्रदेश, 2)शहजाद उर्फ विकी इमाम मोहम्मद आरिफ वय वर्ष 36 मूळ रा. अमरोहा उत्तर प्रदेश यांच्या कडून सुमारे 52000रू. किंमत असलेली सोनसाखळी व गुन्ह्यात वापरली गेलेली बजाज पल्सर ही दुचाकी असा अंदाजे 82000 किंमतीचा येवज जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 01, डॉ. शशिकांत भोसले, सह. पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, यांच्या मार्गदर्शना खाली मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पो नि- प्रकाश मसाळ (गुन्हे) स पो नि- योगेश काळे, पो उ नि- संतोष धाडवे, पो उ नि- प्रमोद पाटील, पो ना-भुषण पाटील, पो शि- गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत, विनोद जाधव यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेला मानपाडा रोडवरील ‘कस्तुरी प्लाझा’ शेजारील ‘रिलॅक्स बार’ व त्यांच्या आजूबाजूची दुकाने अनधिकृत असून ती जागा चेतन हौसिंग सोसायटीची असून काँग्रेसच्या माजी नगरसेवक यांनी अनधिकृत पणे ‘रिलॅक्स बार’ व परिसरातील दुकाने बांधली याविषयी चेतन हौसिंग सोसायटीने उच्चन्यायालयात दावा दाखल करुन न्यायालयाने चेतन हौसिंग सोसायटीचा दावा मान्य करून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा व त्याची चित्रफित बनवून त्याचे तीन महिन्यांत न्यायालयात सादरीकरण करण्यात यावे असा आदेश देऊनही सदर गोष्टीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असून अजूनपर्यंत कडोंमपाच्या ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी काही ही कारवाई केली नाही फक्त याविषयी फायली डोंबिवली-कल्याण महानगरपालिकेच्या कार्यालयात फिरत आहेत.

यावरून असे वाटते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाठीशी घालून उच्च न्यायालयाच्या आदेशला केराची टोपली दाखविली आहे. कोर्टाचा आदेश सप्टेंबर २०२१ चा होता व कारवाईची मुदत १७ जानेवारी २०२२ ला संपली असून अजून फक्त फाईलस् डोंबिवली-कल्याण-डोंबिवली कार्यालयात फिरत आहेत. वरील सर्व घटना पहाता कडोंमपाचे अधिकारी व ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामागे नक्की गौडबंगाल काय असू शकते याची उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू आहे.