Home Blog Page 187

‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागे, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

 

सदर आठवडी बाजाराचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. आयुक्त डॉ-सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले, यावेळी उप अभियंता जगदीश कोरे, शमीम केदार, कनिष्ठ अभियंता दिलीप शिंदे आणि ‘ब’ प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप व आयोजक नरेंद्र पवार उपस्थित होते. या आठवडी बाजाराला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यापुढे दर रविवारी या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

हिंदु मंदिरात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापन समितीच्यांमध्येही अन्य धर्मीयांनी घुसखोरी केली आहे. हिंदु मंदिरांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जे निधर्मी लोक हिंदु मंदिरांचा कारभार चालवू पाहत आहेत, तेच हिंदूंच्या देवी-देवतांना ‘सैतान’ मानतात. मंदिर परिसराजवळ अन्य धर्मीय आपली दुकाने थाटतात, मात्र मशिदी आणि चर्च यांच्या जवळून हिंदूंच्या उत्सवांची मिरवणूक निघाली, तर त्याला विरोध केला जातो. ‘हलाल’वर बंदी घाला, हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणूकांना स्वातंत्र्य द्या, यांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले पाहिजेत, मात्र हिंदूंची मंदिरे अन्य धर्मीयांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हिंदूंवर लादला जात आहे. हिंदूंच्या मंदिरांची संपत्ती, नियम यांमध्ये हस्तपेक्ष करण्याचा सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगणा येथील स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर करण्याचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्’ चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, सरकार कोणत्याही प्रकारे हिंदूंच्या मंदिरांना नियंत्रणात ठेऊ शकत नाही. भक्त आणि भाविक जो पैसा हिंदूंच्या मंदिरात अर्पण करतात, सरकार तो पैसा इतर धर्मीयांसाठी कसा काय वापरू शकते ? हा हिंदूंच्या बाबतीत केलेला विश्‍वासघात आणि घोटाळा आहे. मंदिरांत फक्त देवतांचे नियम चालणार. हिंदूंच्या मंदिर व्यवस्थापनात अन्य धर्मीय हस्तक्षेप करून हिंदूंची मंदिरे भ्रष्ट करत आहेत. संविधानातील अनुच्छेद २६ नुसार ‘हिंदूंना आपल्या मंदिरांची व्यवस्था पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे’, तसेच अनुच्छेद २५ नुसार ‘हिंदूंना आपली धार्मिक स्वतंत्रता अबाधित ठेऊन धर्म आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे.’ या विषयी हिंदूंचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार असून, जर न्यायालयाने म्हणणे ऐकले नाही, तर जनतेमध्ये जागृती करून हिंदूंचा आवाज लोकप्रतिनिधींद्वारे संसदेत पोचवणार असल्याचेही अधिवक्ता जैन यांनी सांगितले.

कर्नाटक येथील अधिवक्ता श्रीहरी कुत्स म्हणाले की, अन्य धर्मीयांना मंदिर परिसरात दुकाने थाटायला दिली जात आहेत. मशिद परिसरात हिंदूंना दुकाने चालवू दिली जातील का ? मंदिरांना प्रेक्षणीय, पर्यटन स्थळाप्रमाणे सरकार पाहत आहे, हे थांबले पाहिजे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, मंदिरे ही धर्माची आधारशीला आहे. विविध सरकारांनी मंदिरे अधिग्रहीत करून मंदिरांना लुटण्याचा प्रारंभ केला. अनेक मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण करून ही भूमी हडप केली. मंदिरांच्या धनाचा गैरवापर हज यात्रांना अनुदान देणे यांसह अनेक गोष्टींसाठी केला गेला. आता त्यांनी धार्मिक परंपरामध्ये हस्तक्षेप करायला प्रारंभ केला आहे. हिंदूंच्या मंदिर संस्कृतीला नष्ट करण्यासाठी एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे प्रयत्न केले जात आहेत, हे वेदनादायी असून यामुळे हिंदूंच्या मनात असंतोष निर्माण होत आहे. हिंदू समाज हे अधिक काळ आता सहन करणार नाही.

 

व्यापाऱ्याच्या घरावर छापा; सापडली तब्बल १५० कोटींची रोकड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कानपुर येथील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरासह इतर ३ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यात सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिली. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली. जवळपास १६ तास रक्कम मोजण्याचे काम सुरु होते. १५० कोटींची ही रक्कम नेण्यासाठी ट्रक मागवावा लागला. सीबीआयसीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसुली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपुर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांचे कन्नौजमध्ये घर, परफ्यूम फॅक्टरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंपही आहे. पियुष जैन यांचे मुंबईत घर, मुख्य कार्यालय आणि शोरूम आहे. गुरुवारी सकाळी कानपूर, मुंबई आणि गुजरातमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरू झाली या कारवाईत जैन यांच्या घरातून सुमारे १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे बंडल मोजण्यासाठी १५ मशीन मागवाव्या लागल्या. छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची नोटा मोजणी करताना दमछाक झाली या प्रकरणी जीएसटी इंटेलिजन्सने एक प्रेस नोट जारी केली आहे.

२२ डिसेंबर रोजी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेस लिमिटेडवर छापे टाकण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. शिखर ब्रँड अंतर्गत पान मसाला बनविणाऱ्या कंपनीच्या कार्यालय, गोदाम आणि ट्रान्सपोर्ट येथे छापे टाकण्यात आले. बनावट कंपन्यांच्या नावाने टॅक्स इनव्हॉइस जारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या बाहेर चार ट्रक जप्त केले आहेत आणि गणपती रोड कुरिअर्समधून २०० बनावट पावत्याही जप्त केल्या आहेत. कानपूरशिवाय कन्नौजमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. रोकड मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सीबीआयसीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वसुली आहे, एवढी मोठी वसुली झाल्यानंतर रक्कम नेण्यासाठी २५ पेट्या मागवाव्या लागल्या, त्या ट्रकमध्ये भरून घेऊन गेल्या आहेत.

 

ज्येष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांची नवीमुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड

संपादक: मोईन सय्यद/मुंबई, प्रतिनिधी

नवी मुंबई: जेष्ठ पत्रकार व संपादक बाळकृष्ण कासार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली.

बाळकृष्ण कासार हे पत्रकारितेतील एक उत्तुंग शिखरावर पोहोचलेले जेष्ठ पत्रकार आणि लोक निर्माण वृत्तपत्राचे संपादक आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांचे वृत्तपत्र वितरित होत असते. त्याना अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेकडून त्यांना नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष पदी निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, विश्वस्त गणेश कोळी, केंद्रीय खजिनदार सत्यवान विचारे यांच्या हस्ते पनवेल मधील शासकीय विश्रामगृहात देण्यात आले.

संपादक बाळकृष्ण कासार यांच्या निवडीने नवीमुंबई या विकसित होत असलेल्या जिल्ह्याला एक पत्रकारितेतील कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष मिळाल्यांने त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदनासहित शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केले सराईत मोटरसायकल चोरास जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथे दिनांक ०४.११.२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गांधी गार्डन, नगरसेवक श्री.शैलेश धात्रक यांच्या कार्यलयासमोर, दीनदयाळ रॉड, डोंबिवली पश्चिम येथून एक होंडा कंपनीची सी.डी. डीलक्स मोटरसायकल चोरी झाली म्हणून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. २५५/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलं होता. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना. लोखंडे यांच्याकडे आहे.

डोंबिवली परिसरात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप वाढल्याने नमूद गुन्ह्याचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री.गणेश वडने व पथक।यांना आदेशीत केले. नमूद गुन्ह्याच्या घटनस्थळाच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासले असता एका सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामध्ये दोन इसम गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल ढकलत घेऊन जात असल्याचे दिसून आले. नमूद इसमांची गुप्त माहितीदारांमार्फत ओळख पटवून एका इसमाला तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने त्याचे ठिकाण बदलत असताना व शेवट मोबाईल बंद असताना कौशल्यपूर्ण तपास करून पारोळा जळगाव येथून ताब्यात घेतले व त्या इसमाच्या मार्फतीने दुसऱ्या इसमास चिंचपाडा, कल्याण पूर्व येथून ताब्यात घेतला. नमूद दोन्ही इसमांकडे चौकशीअंती त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याचे कबुल करून मोटरसायकल हस्तगत केली तसेच आरोपी क्र.१ दिलीप शांताराम पाटील याने विष्णुनगर पोलुस ठाण्याच्या हद्दीत आणखी ५ गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून त्या हस्तगत केली आहेत. आरोपी क्र.२ नामे रोहित अविनाश यादव (वय ३१ वर्षे) याचा नमूद ऐका गुन्ह्यातच सहभाग दिसून येत आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री.दत्तात्रय कराळे सो, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, सहा पोलीस आयुक्त मा. श्री.जयराम मोरे सो, डोंबिवली विभाग व मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि श्री.गणेश वडणे, पो.शी भामरे, पो.हवा पाटणकर, पो.ना सांगळे, पो.ना लोखंडे, पो.शी मिसाळ, पो.ना कांगुणे यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.