Home Blog Page 186

दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यातील न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न!

संपादक: मोईन सय्यद/पुणे प्रतिनिधी: मुझम्मील शेख

पुणे – न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून “गौरव समारंभ 2021” या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त धायगुडे साहेब,संचालक व सचिव रकीब पटेल, खजिनदार अ बासित पटेल, सभासद मुबशीर शेख आदी मान्यवर उपस्थितीत होते.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे खलील प्रकारे…

1 – प्रमोद यादव साहेब (भा प्र से)
व्यवस्थापकीय संचालक सैनिक कल्याण विभाग व मेस्को विभाग.
2 – माजी कर्नल प्रशांत वानखेडे,
महाव्यवस्थापक मेस्को विभाग,
3 – लेफ्टनंट कर्नल आर आर जाधव,
प्रशासन अधिकारी सैनिक कल्याण विभाग,
4 – किरण सरोदे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सेंट मेरी उपविभाग पुणे. म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
5 – विजयकुमार माने,
कनिष्ठ अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
6 – रोहित तेंडुलकर,
पश्चिम महाराष्ट्र क्लस्टर हेड HDFC बँक.
7 – राहुल म्हामाणे,
शाखा व्यवस्थापक HDFC बँक
कात्रज शाखा,
8 – तुषार कोठारी, (CA),
संस्थापक के जे एस अँड असोसिएट्स,
9 – स्टार्टअप कन्सल्टन्सी सर्व अधिकारी व कर्मचारी.
10 – डॉ सोहेल खान, (MBBS & MS),
व्यवस्थापकीय संचालक सना हॉस्पिटल,
11 – डॉ अतिक शेख,
डॉक्टर सना हॉस्पिटल,
12 – विजय कुमावत,
शाखा अभियंता पुणे मनपा,
13 – सुनील पाटील,
सहाय्यक अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
14 – तमराज बडगे,
वरिष्ठ तंत्रज्ञान सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.

आज मध्यरात्रीपासून राज्यात नवीन नियमावलीसह कडक निर्बंध लागू; महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहे.

राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू होणार आहे. तसेच परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यात गुरुवारी १९८ नव्या ऑमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे यातील १९० रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ४ रुग्ण हे ठाण्यातील आहे. राज्यात एकूण ऑमिक्रॉनबाधितांची संख्या ४५० वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. तसेच राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत गेली तर राज्यात आणखीन कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारची नवीन नियमावली
– लग्न सोहळा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा मेळाव्या देखील बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
– आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा..
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही.

राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

 

नवीन वर्षानिमित्त मध्यरात्री बनावट विदेशी दारू विरुद्ध औरंगाबाद येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक यांची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री. कांतीलाल उमाप तसेच संचालक सन्माननीय श्रीमती उषा वर्मा मॅडम राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री. प्रदीप पवार व अधीक्षक श्री. सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगाबाद यांना मिळालेल्या खात्रीपूर्वक गुप्त बातमीनुसार पडेगाव ते मिटमीटा सरकारी रोडवरील शनिमंदिर समोर पडेगाव ता.जि.औरंगाबाद येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी एक मारुती सुझुकी कंपनीची इको चारचाकी वाहन क्रमांक एमएच २०, एएक्स-७२९५, व एक दुचाकी क्र. एमएच २०, एफएम-४१२९ मध्ये संपूर्ण प्रथमदर्शनी बनावट तयार केलेल्या विदेशी मध्य १८० मि.ली क्षमतेच्या एकूण १२०० सीलबंद बनावट बाटल्या (२५) बॉक्स चारचाकी व दुचाकी वाहनासह एकूण ८,६७,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

दोन आरोपी नामे १) वैभव परशुराम खरात (वय:३२) धंदा-दारूविक्री रा. एन-४२, सी.सी-२, ३१/०६, त्रिमूर्ती चौक, सिडको ता.जि. नाशिक २) राहुल पांडुरंग वालझडे (वय:३५) धंदा-दारूविक्री रा. एन-४२, सी.सी-२, २८/०३, त्रिमूर्ती चौक, सिडको, ता.जि. नाशिक यांना सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले असून व इतर दोन आरोपी नामे १) फरार इसम नामे सागर संतोष जैस्वाल अंदाजे वय:२२ वर्ष, रा.औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद २) फरार इसम नामे दत्ता नानासाहेब वारे अंदाजे वय:२६ वर्ष, रा.औराळा ता.कन्नड जि.औरंगाबाद हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवूण पसार झाले.

सदर कारवाई श्री.विजय रोकडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद, श्री.डाहके निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ‘क’ विभाग सिल्लोड दुय्यम निरीक्षक, श्री.शरद रोटे, श्री.रमेश विठोरे सह-दुय्यम निरीक्षक, प्रवीण पुरी, जवान सर्वश्री श्री.युवराज गुंजाळ, श्री.रवींद्र मुरडकर, श्री.भास्कर काकड, श्री.सुभाष गुंजाळे, श्री.शारेक कादरी वाहन चालक श्री.संजय गायकवाड व श्री.अमोल अन्नदाते यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

 

वाहतूक शाखेची नवीन ‘इ -चलान’ दंड प्रणाली करता जनजागृती व्हावी म्हणून ‘नो चलान डे”.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली, सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ पासून लेखी चलान बंद होऊन ई-चलान सुरु करण्यात आले आहे.

‘ई-चलान’ मशीन मध्ये नवीन दंड प्रणाली दिनांक १२/१२/२०२१ पासून सुरु करण्यात आली असून ठाणे आयुक्तालयातील कार्यान्वित असलेल्या सर्व ई-चलान मशिन्स वाढीव दंडप्रणाली प्रमाणे अद्ययावत करण्यात आली आहेत.

वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, आपल्या वाहनांचे अपूर्ण कागदपत्र पूर्ण करण्यासाठी तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहनचालकावर आकाराला जाऊ नये या उद्देशाने ३० डिसेंबर २०२१ हा एक दिवस “नो चलान डे” म्हणून आयोजित केला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना समुपदेशन करण्यासाठी व सुधारणा करण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. ३०/१२/२०२१ रोजी दिवसभर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही क्षेत्रामध्ये वाहतूक संदर्भातील चलान केले जाणार नाही तसेच प्रत्येक वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी नवीन वाहतूक नियमांसंदर्भातील वाढीव दंडाच्या तरतुदीबाबत व सुरक्षिततेच्या योजनेबाबत कसूरदार वाहनचालकांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी जाऊन नवीन दंड प्रणाली जाणून घेण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. श्री. बाळासाहेब पाटील यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, या दिवशी जे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा १० ते १५ वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात १५ ते २० मिनिटे समुपदेशन करण्यात येईल, त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची  जाणीव करून देण्यात येईल तसेच प्रलंबित चलान असल्यास त्याची माहिती करून देण्यात येईल. “नो चलान डे” जरी असला तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार! – राजेश करवीर

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

बोईसर, 26 डिसेंबर: बोईसर सह संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व ओमीक्रोन व्हायरसचा प्रभाव देखील वाढत असताना बोईसर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मात्र कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चक्क आंदोलन करावे लागत आहे. बोईसर येथील गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांनी आपल्या इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत बाजार विक्रेत्यांना खुलेआम बसवून कोरोना नियमांचे पायमल्ली करत समज देण्याकरिता गेलेल्या युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नावाने धमकवण्याचे प्रयत्न केला जात आहे असे माजी उपसरपंच व युवा प्रतिष्ठान बोईसरचे सरचिटणीस राजेश करवीर यांनी सांगितले.

सदस्य गण ग्रामपंचायत असताना औषध फवारणी, दूर फवारणी असो किंवा कचरा व्यवस्थापन समस्यचे निवारण तात्काळ होत होते मात्र प्रशासकाने ग्रामपंचायतीचे सुत्र हाती घेतल्यापासून ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याकडून या सर्व बाबींचा विचार केला जात नाही असे देखील करवीर यांनी प्रशासक हेमंत भोईर यांना बोलताना सांगितले आहे.

दरम्यान प्रशासक भोईर यांनी गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांना नोटीस देऊन पुढील योग्य ती कार्यवाही करणे बाबत वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करण्यात येईल व बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगत घंटानाद आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले.

घंटानाद आंदोलनात युवा प्रतिष्ठान बोईसरचे अध्यक्ष विक्रम धोडी, सरचिटणीस राजेश करवीर सह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.