Home Blog Page 189

औरंगाबादमध्ये सैराट सिनेमाची पुनरावृत्ती; सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची केली हत्या!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह

औरंगाबाद, ता 5 डिसें : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी तो लाडगावमध्ये गेला होता त्यावेळी त्याने रागाच्या भरात बहिणीची गळा चिरून हत्या केली.

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा गोयेगाव येथील रहिवासी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.

सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच किशोरीचा भाऊ हा लाडगावला आला. त्यानंतर बहिणीला तू पळून प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावानेच जवळ असलेल्या कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केले.

भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केल्याने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली असून एकविसाव्या शतकात देखील अशा घटना घडत असल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.

विकासासाठी राज्यातील १२५ तालुक्यांच्या प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत, अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजाणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘मानव विकास कार्यक्रम’ या अंतर्गत राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’ चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’ वर अधिक भर देण्यासाठी ‘विशेष योजना’ तयार करण्यात आली असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी आज वितरीत करण्यात आला असून ही विशेष योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या ‘विशेष योजने’ बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

ही विशेष योजना महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन-घन केंद्र, जीवनोन्नत्ती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील मागास तालुक्यातील नागरिकांना रोजगार निर्मितीच्या समान संधी उपलब्ध होणार असून या भागांच्या विकासाला गती मिळणार आहे.

रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यासाठी ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना’ अंतर्गत ‘विशेष योजना’ तयार करुन त्या राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  ‘मानव विकास कार्यक्रम’ या अंतर्गत आर्थिक वर्ष सन २०२१-२०२२ मध्ये ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना अंतर्गत’ विशेष योजने करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या २३ जिल्ह्यातील सुमारे १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. वितरीत करण्यात आलेल्या निधीचा विनियोग प्रामुख्याने महिला बचतगट व अनुसूचित जाती-जमातीचे सक्षमीकरण करण्याकरीता करण्यात येणार आहे.

अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार

जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत ‘विशेष योजना’ प्रामुख्याने महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. या ‘विशेष योजने’साठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ७५:२५ तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ९०:१० याप्रमाणे अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार आहे. विशेष योजनेचे प्रस्ताव तयार करताना ‘शाश्वत विकास ध्येया’ अंतर्गत असलेली विशेषतः गरिबी निर्मूलन, उपासमारीचे समूळ उच्चाटन यांसारखी ध्येय साध्य करण्यात येणार आहेत.

‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २३ जिल्ह्यातील सुमारे १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

 

गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण कडून डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील तडीपार खतरनाक नामचीन गुंड जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.३०.११.२०२१ रोजी रात्री ८.०० च्या दरम्यान डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड – सनी परशुराम जाधव हा ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची वर्णनासह गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार – दत्‍ताराम भोसले मुख्यालय ठाणे शहर, यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना फोनद्वारे संपर्क करून कळवल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक पोउपनिरी- मोहन कळमकर,सपोउपनिरी- संजय माळी, पोलीस हवालदार-वसंत बेलदार, सचिन वानखेडे, विश्वास माने यांना बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

सदर ज्योतीनगर परिसरात पोलीस दबा धरून बसलेले असताना दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दुर्गा माता मंदिरासमोर फिरत असताना दिसला त्यास पोलीस पकडण्यास जवळ जात असताना त्याला पोलीसांचा संशय येताच तो पळण्याच्या तयारीत असताना त्यास झडप घालून पकडले, त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सनी परशुराम जाधव (वय ३८) वर्षे रा.ज्योती नगर झोपडपट्टी आयरे गाव डोंबिवली पूर्व, असे सांगितले सदर आरोपीत इसम डोंबिवली पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील धारदार शस्त्राने वार करणारा खतरनाक नामचीन गुंड असून त्याच्यावर ५ गुन्हे दाखल असून त्याची दहशत असल्याने त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा,परिमंडळ – ३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२४.०८.३०२१ रोजी पासून ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण कडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार गुंडावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण कडून, परत एकदा डोंबिवली शहरातील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील घरफोड्या,चोरी करणारा तडीपार केलेला अट्टल गुन्हेगार जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.२.११.२०२१ रोजी सायंकाळी ६:३० वा दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील हद्दपार (तडीपार) केलेला इसम कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी हा त्रिमुर्ती नगर झोपडपट्टीत त्याचे राहते घरा जवळ उभा आहे, अशी त्याचे वर्णनासह गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार दत्‍ताराम भोसले, मुख्यालय ठाणे शहर यांना मिळाल्याने, त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट-३ चे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कळवले असता, वपोनि मनोहर पाटील यांनी विलंब न लावता त्यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन तात्काळ डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी गुन्हेगार व पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेत असलेले एक पोलीस पथक सपोनि भूषण दायमा, पोउपनि मोहन कळमकर, सपोउपनि संजय माळी, पोलीस हवालदार विश्वास माने, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग, महेश साबळे, उमेश जाधव आणि राहुल ईशी असे सदर बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीत त्याचे घरा चे बाजूलाच गल्ली जवळ सदर इसम उभा होता, मिळालेल्या वर्णनाप्रमाणे त्यास पथकातील एका पोलीसांनी ओळखले परंतु त्याचे घराचे पुढील व मागील बाजूने पोलीसांनी घेराव केल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडले असता त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव- कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी (वय ३५ वर्ष) रा. पोपट किराणा स्टोर च्या मागे रूम नं. ०५ त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी, पाथरली डोंबिवली पूर्व असे सांगितले सदर इसम हा अटल घरफोडी, चोरी करणारा आणि अतिशय चपळ असल्याने मानपाडा, डोंबिवली, विष्णूनगर,असे पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, नागरिकांच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवू नये म्हणून त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा, परिमंडळ -३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२६.१०.२०२१ रोजी पासून ०१ वर्षे कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार केलेल्या अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्यामुळे पोलीसांचे उत्कृस्ट कामगिरीचे नागरिकांकडून जाहीररीत्या कौतुक होत आहे.

रिक्षात विसरलेला आयफोन ७ डोंबिवली वाहतूक शाखेने शोधून केला परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मानपाडा रोड बाज आर.आर. हॉस्पिटल, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग या दिनांक २४/११/२०२१ रोजी सकाळी १० वा चे सुमारास नेहरू मैदान, डोंबिवली पूर्व येथून रिक्षाने आर.आर हॉस्पिटल येथे जात असताना त्यांचा आयफोन ७, किंमत सुमारे २५,०००/- रुपये हा मोबाईल रिक्षामध्ये विसरला गेला होता. ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाला होता. त्यांनी तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखा येथे संपर्क करून सदरबाबत माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोशि.स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी, गुरू छाया सोसायटी, डोंबिवली पूर्व या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षा चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. परंतु रिक्षा व रिक्षा चालकाच्या मिळालेल्या अस्पष्ट वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेऊन सदरचा मोबाईल शोधून आर.आर हॉस्पिटल चे प्रतिनिधी यांच्या ताब्यात दिलेला आहे.

डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल आर.आर हॉस्पिटल चे संचालक डॉ.आमिर कुरेशी व डॉ.श्वेता सिंग यांनी वपोनि उमेश गित्ते यांचे आभार व्यक्त केले आहेत.