Home Blog Page 190

लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश ९ नोव्हेंबरमध्ये जारी केले होते.

ह्या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा no vaccination no petrol या आदेशाचा भंग केल्याचे , मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे , अशा गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार श्रीमती सोनाली जोंधळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व श्री राजेंद्र शिंदे जिल्हा पुरवठा निरीक्षक औरंगाबाद यांनी सांयकाळी ८.३० वाजता बाबा पेट्रोल पंप सील केलेला आहे.

 

नाना पटोलेंना मंत्रिपद? काँग्रेस नेते दिल्लीकडे रवाना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत असून, विशेषतः काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या खात्यात अदलाबदल होण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले जात आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला गेल्याने राजस्थानप्रमाणे राज्यातही काँग्रेस बदल घडविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षही निवडला जाणार असल्याने त्याच्या नावावरही काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसच्या मंत्र्यांची खाते बदलले जाण्याची चर्चा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन, त्याजागी पटोले यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाण्याचे बोलले गेले. त्यावरून मंत्र्यात नाराजीही दिसून आल्याने पक्षश्रेष्ठी बदलापासून लांब राहिली. मात्र, पंजाब आणि आता राजस्थानातील बदलानंतर महाराष्ट्रातही तसे घडू शकते, या चर्चा सुरू आहे. त्यात पटोले हे मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यातही भेट घडल्यानेही ठाकरे सरकारमध्ये नव्याने काही बदल होऊ शकतात काय? याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र, अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षाच्या नावावर चर्चाविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हमखास निवडला जाणार असल्याचे पटोले यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. कोरोनाची साथही ओसरल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यास मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील प्रमुख नेते राजी आहेत. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यात विधानसभा अध्यक्षाच्या नावावर चर्चा होऊ शकते.

मुंबईतील तरुणावर घाटकोपर येथे चेहरा सुधारण्यासाठी ११ तासांची सलग शस्रक्रिया

मुंबई: गेली २ वर्षे आपण कोविड -१९ महामारीशी दोन हात करीत असल्यामुळे अनेक शल्यचिकित्सा पुढे ढकलल्या होत्या यामध्ये प्लास्टिक व कॉस्मेटिक शस्रक्रियांचा समावेश होता, आता कोविड -१९ चा धोका कमी झाला असून मुंबईत अनेक शस्रक्रिया होत असून यामध्ये विविध शहरातून व इतर देशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.

घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अशीच एक चेहरा सुधारण्यासाठी ३२ वर्षाच्या तरुणावर ११ तासाची सलग शस्रक्रिया करण्यात आली. लंडन येथिल प्रशिक्षित ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ सम्राट तावडे व ओटोरहिनोलॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. कौस्तुभ सरवदे यांनी हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. याविषयी अधिक माहिती देताना डॉ सम्राट तावडे म्हणाले, ” कुर्ला येथी राहणाऱ्या ३२ वर्षीय कुमारची जबड्याच्या सांध्याची वाढ आणि कानाच्या कालव्यांभोवती हाडांची वाढ जास्त झाल्यामुळे त्याची हनुवटी एका बाजूला वळली होती त्यामुळे जेवताना अथवा बोलताना खूप वेदना होत होत्या. कोणत्याही वेदनाशामक गोळ्यांनी या वेदना कमी होत नव्हत्या त्यात कोरोनाची साथ आल्यामुळे कुमार यां २ वर्षे या वेदना सहन कराव्या लागल्या.

कुमारच्या चेहऱ्याची शस्रक्रियाकरण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्याची ३D मॉडेलिंगद्वारे प्रतिकृती तयार करण्यात आली, त्याचा चेहरा सरळ करण्यासाठी नेमकी जी शस्त्रक्रिया करायची होती ती अंतिम परिणाम पाहण्यासाठी आम्ही या ३D मॉडेलवर केली त्यामुळे आम्हाला त्यात अचूकता कळली कारण अवास्तव वाढलेली जबड्याचे सांधे काढून टाकणे, जबड्याचा डावा कोन काढणे, कानाच्या हाडांची वृद्धी कमी करणे आणि कानाच्या कालव्याला पुरेशा आकारासाठी आकार देणे यासह अनेक प्रक्रियांचे नियोजन करण्यात आले होते.

यामध्ये त्याच्या दातांना सुरक्षित करणे गरजेचे होते. हि शस्त्रक्रिया सलग ११ तास चालली व आता कुमारच्या चेहऱ्यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे.” शस्त्रक्रियेनंतर कुमार आनंदी असून तो आता आत्मविश्वासाने लोकांना भेटू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.किशोरवयापासून कुमार याला चेहऱ्यामुळे मित्र मैत्रिणींच्या चेष्ठामस्करीला सामोरे जावे लागले होते. कुमार याने डॉ. सम्राट तावडे, डॉ. कौस्तुभ सरवदे, बिजनेस हेड आशिष शर्मा आणि संपूर्ण झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल टीमचे आभार मानले.

मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जन्मजात बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया! बंद पडलेले हदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी

मुंबई: : जन्मतः हृदयाचे ठोके बंद पडलेल्या आणि श्वासोच्छावासाचा त्रास असलेल्या एका नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. डॉ वीरेंद्र वर्मा (नियोनॅटोलॉजिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने मृत पेशी आणि मेंदूचे नुकसान कमी करण्यासाठी हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात शिशुच्या हदयाचे ठोके पुर्ववत करत नवीन आयुष्य दिले आहे.

३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या एनआयसीयु टीमकडे दाखल करण्यात आले. जन्मावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनप्रक्रिया सामान्यरित्या होत नसल्याने जन्मल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांतच बाळाच्या –हदयाचे ठोके व श्वासोच्छवास सुरळीत करण्यात येथील डाँक्टरांच्या चमूला यश आले.

वोक्हार्ट हॉस्पिटल मीरा रोड येथील नवजात शिशू तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा सांगतात की, “आम्ही या बाळावर हायपोथर्मियाची पद्धत अवलंबविण्याचा प्रयत्न केला तत्पुर्वी त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याविषयीची माहिती बाळाच्या पालकांना सांगून या उपचाराचा निर्णय घेण्यात आला. उपचारात्मक हायपोथर्मिया उपचारामध्ये बाळाला मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेंटीग्रेड कमी तापमानात ठेवले जाते ज्यामुळे मेंदूमधील इजा कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेत ७२ तासांपर्यंत उपचारात्मक हायपोथर्मिया दिला जातो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर १० मिनिटांच्या आत मुलाला काही विशेष औषध देण्यात आले. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला लागले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सामान्यतः जी बाळं जन्माच्या वेळी रडत नाहीत त्यांना हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात.

1. HIE ग्रेड 1: यामध्ये जवळजवळ 100% बाळं जगली आहेत आणि जवळजवळ 100% चे न्यूरोलॉजिकल परिणाम चांगले आहेत.
2. HIE ग्रेड 2: 70% बाळांना न्यूरोलॉजिकल कमतरता नसते आणि 30% बाळांना सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो, जो अपंगत्व किंवा मतिमंदता किंवा दोन्ही द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे.
3. HIE 3: 50% मुले मरतात आणि उर्वरित 50% मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी विकसित होतात.

वोक्हार्टमध्ये उपचाराकरिता दाखल झालेले हे बाळ HIE-2 किंवा 3 च्या श्रेणीतील असल्याचे दिसून येते.

डॉ वीरेंद्र पुढे म्हणाले*, ही पद्धत तापमान कमी करते आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि मुक्त रॅडिकल्सची निर्मिती कमी करण्यास मदत होते. जेव्हा ऑक्सिजन, ग्लुकोज आणि रक्ताची गरज कमी होते, तेव्हा मेंदूतील चेतापेशींचे संरक्षण होते. उपचारात्मक हायपोथर्मिया केवळ पूर्ण कालावधीत आणि चांगल्या वजनाच्या बाळांमध्येच केले जाऊ शकते जे जन्मल्यानंतर ६ तासांच्या आत रुग्णालयात पोहोचतात. मॅग्नेशियम सल्फेट, अॅलोप्युरिनॉल इत्यादी इतर न्यूरोप्रोटेक्टिव्ह थेरपी देखील दिल्या जाऊ शकतात. हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथीमुळे सेरेब्रल पाल्सी होऊ शकते. परंतु, वेळीच उपचार झाल्याने या बाळाचे प्राण वाचवता आले.

मुलीचे वडील म्हणाले की, “जन्मानंतर मुलीच्या हृदयाचे ठोके योग्यपद्धतीने सुरू नव्हते. तिला श्वसनाचा त्रास होत होता. हे पाहून आम्ही घाबरून गेलो होतो. परंतु, वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामांकडे काणा डोळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लॉकडाऊन असताना देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे छुप्या मार्गाने सुरू होतीच आणि आता तर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर तर अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामे निष्कशीत करून जमीनदोस्त करण्याचे कडक निर्देश देऊन सुद्धा कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रात असंख्य अनधिकृत बांधकामे सुरू असून पालिकेकडून अशी अनधिकृत बांधकामे निष्कशीत करण्याची तोडू कारवाई ही थातुरमातुर होत असून ज्या बांधकामांवर मोठा ताफा घेऊन तोडू कारवाई केली जाते तिथेच महिन्या दोन महिन्यातच पुन्हा अनधिकृत बांधकामे होताना दिसत असून ह्या इमारती पुन्हा कोणाच्या वरदहस्ताने उभ्या राहतात हा प्रश्न डोंबिवलीकर नागरिकांना पडत आहे.

उदाहरण द्यायचंच झालं तर डोंबिवली पूर्वेकडील “ग” प्रभागक्षेत्रातील दत्तनगर चौकात काही महिन्यांपूर्वी एका बांधकामावर त्या “ग” प्रभाग क्षेत्र अधीकारी यांनी पोलीसांचा मोठा फौजफाटा घेऊन तेथील अनधिकृत बांधकाम पूर्णतः निष्कशीत करून जमीनदोस्त केले होते व त्या जागेत बांधकाम करण्यास मनाई करण्यात आलेली असताना त्या इमारतीचे बांधकाम खुलेआम पडदे लावून दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असून त्यास महापालिकेने परवानगी दिली आहे का हा प्रश्न तेथील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे ह्या प्रभागाचे नगरसेवक हे शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख असून त्यांनी त्या चौकात सर्वात उंच तिरंगा फडकावला आहे आणि त्यांना त्यांच्या प्रभागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे.

नुकतेच प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेले एक अनधिकृत बांधकामाचे प्रकरण असे की आयरे गाव येथील सर्वे नं ११ हिस्सा नं अ/३ आणि सर्वे नं ११ ब/३ ह्या जागेचे मालक वेगळा असून त्यावर जागा मालकाशी कोणताही कायदेशीर आर्थिक व्यवहार न करता अतिक्रमण करून सदर जागेवर सात माळ्यांचा टॉवर बांधायचे काम सुरू केले होते पण जागा मालकाने आयुक्त, उपयुक्त, नगररचनाकार, प्रभागक्षेत्र अधिकारी यांना पत्रव्यवहार करून कायदेशीर रित्या महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर काम थांबवण्याची नोटीस बजावली खरी पण तेथेही छुप्या मार्गाने काम सुरू असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले असता त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले खरे पण प्रश्न जितल्या तिथे अजूनही तसाच उपस्थित राहतो की अतिक्रमण करून अनधिकृत रित्या उघडउघड बांधकाम करणाऱ्या भूमाफीयांच्या डोक्यावर वरदहस्त नक्की कोणाचा आहे पालिका प्रशासन, प्रभागक्षेत्र अधिकारी का लोकप्रतिनिधी याचं उत्तर डोंबिवलीकर आता विचारत आहे.

तसेच “ग” व “फ” प्रभाग क्षेत्र उपयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर प्रभागक्षेत्र अधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्यसाठी सांगण्यात आले आहे व ते करतील असे संपर्क साधला असता प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.