Home Blog Page 192

मतभेद बाजूला ठेऊन पक्ष संघटना बळकट करा!- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा संपन्न

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्षजयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याचे निमंत्रण पत्रकारांना देखील देण्यात आले होते त्यामुळे या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात पत्रकार देखील उपस्थित होते आणि त्याच वेळी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यावेळी उपस्थित पत्रकारांकडून त्याचे चित्रीकरण केले जात असताना पत्रकारांना या कार्यक्रमात कुणी बोलावले? असे नेत्यांकडून बोलण्यात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बाचाबाची सुरू केली त्यानंतर नाराजी व्यक्त करून पत्रकार त्या कार्यक्रमातून निघून गेले. थोड्यावेळाने सगळ्यांना शांत केल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

संपुर्ण राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. पालघर नंतर आज मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सवांद साधला यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले. काही दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षपदी काँग्रेस मधून आलेल्या अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी समजूत काढून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे बंधनकारक आहे आता बदल होणार नाही. पक्ष संघटना बळकट करा सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा असा संदेश जिल्हाध्यक्ष मालुसरे यांना दिला.

शहरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यावर लवकरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू व राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे इथे एकत्र मिळून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करू मात्र तसे शक्य न झाल्यास स्थानिक पातळीवर पक्षांना एकत्र करून येणाऱ्या महापालिका निवडणुकी लढू असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला शहारत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढेल यावर लक्ष द्या. रोज सकाळी उठून प्रदेश कार्यलयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत बसू नका. पक्षांनी जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांना सोबत घेऊन काम करा असा सज्जड दम नाराज कार्यकर्त्यांना दिला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जास्त नाही तरी पण १५ ते २० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

मिरा भाईंदरचे पत्रकार भाविक पाटीलला भाजप नागरसेविका अनिता पाटीलच्या भावाने केली मारहाण!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर :  महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप करीत आहेत.

पत्रकार भाविक पाटीलवरवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, महाराष्ट्रातील एका नामवंत दैनिकचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास वृत्तसंकलन करण्यासाठी पेणकर पाडा परिसरातून जात असताना पेणकर पाडा परिसरातील भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चौहान चारचाकी वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होते.

त्याच वेळी त्याच्या मागून पत्रकार भाविक पाटील हे देखील मोटारसायकल वरून जात होते. पत्रकार भाविक पाटील यांना गाडी मागे घे अश्या उर्मट भाषेत राजेश चौहान यांनी दम द्यायला सुरुवात केली त्यांचा राग अनावर झाला आणि गाडीतून उतरून पत्रकार भाविक पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली यावेळी पत्रकार भाविक पाटील यांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या संदर्भात शहरातील सर्व पत्रकार यांनी काशिमिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची भेट घेतली व संबंधित मारहाण करणारा मुजोर राजेश चौहान यांच्या पत्रकार संरक्षण कायदा, धमकी, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीवर याअगोदर देखील जमीन बळकावणे, अनधिकृत बांधकाम करणे आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असून नगरसेविका अनिता पाटील ह्या आपल्या भूमाफिया भावाच्या मदतीने पेणकर पाडा परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे करीत असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार भाविक पाटील यांच्यावर झालेला हल्ला जाणीवपूर्वक केला असून अश्या मुजोर आणि सत्तेचा माज असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शहरातील सर्व पत्रकारांनी केली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप स्वतः करीत असून आरोपी राजेश चौहान याला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

संधीवाताचे व्यवस्थापन करताना – डॉ. गिरीश एल भालेराव, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड

तुम्हाला सांधेदुखी, सांध्याना सूज, सुन्नपणा, स्नायुंमधील ताठरता किंवा दाह जाणवतोय का? सांधेदुखीमुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करण्यातही अडथळा येतोय का? या सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण तो संधिवात असू शकतो. होय ते खरंय! घाबरू नका, आम्ही तुम्हाला संधिवात असल्याचे सूचित करणाऱ्या लक्षणांबद्दल सांगतो. ही आयुष्यभराची अट आहे, परंतु आपण ती व्यवस्थापित करू शकता. उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविक आहे. मात्र जीवनशैलीतील काही योग्य बदल केल्यास तसेच आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम संधीवातासारख्या आजाराला दूर ठेवू शकतात.

याकडे दुर्लक्ष करणे आयुष्यभराकरिता अपंगत्व आणु शकते. सांधेदुखीमुळे जगभरात मृत्यू आणि रुग्ण दर वाढले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? संधिवात 100 पेक्षा जास्त रोग आणि संबंधित परिस्थितीचा समावेश करते. संधिवाताचा प्रकार जाणून घेणे, आपल्या परिस्थितीसाठी योग्य प्रकारचे उपचार आणि व्यवस्थापन करण्यात महत्वाचे ठरते.

संधिवाताचे काही सामान्य प्रकार आहेत जसे संधिवात, ऑस्टियोआर्थराइटिस, सोरायटिक आर्थरायटिस, गाउट आणि ल्यूपस ज्यामुळे रुग्णांमध्ये तणाव, निराशा, चिडचिड आणि नैराश्य येऊ शकते. काही प्रकारच्या सांधेदुखीसाठी त्वरित उपचार करणे आवश्यक असते. जर तुम्हाला संधिवात असेल ज्यामुळे कायमस्वरूपी हाडांचे नुकसान होऊ शकते, तर त्वरीत उपचार घेतल्यास हाडांचे कार्य टिकवून ठेवण्यास आणि आरोग्याच्या इतर गंभीर समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.

संधिवात उपचार कधी सुरू करावे?

संधिवाताची विविध लक्षणे आहेत जी चिंताजनक असून विलंब न करता डॉक्टरकडे धाव घ्यावी लागेल. सांध्यातील वेदना, सूज किंवा जडपणा यासारखी लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नका. सांधे जे स्पर्श केल्यावर लालसर किंवा उबदार असतात अतिशय संवेदनशील किंवा कडकपणा जाणवू शकतो. शारीरीक हलचाली करण्यात वेदना तसेच दैनंदिन क्रिया करणे आणि सांध्यामधील दाह अनेक शारीरीक समस्या निर्माण करू शकते.

जर तुम्हाला हाडांसबंधी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांची भेट घ्या. आधुनिक काळातील दर्जेदार औषधांमुळे संधीवात प्रभावीपणे नियंत्रित करता येतो. त्यामुळे संधीवाताच्या रुग्णांमध्ये व्यंग निर्माण होऊन त्याच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम टाळणे शक्‍य होत आहे संधिवात तज्ञ हे संधिवात आणि हाडे, स्नायू आणि सांधे यांच्याशी संबंधित रोगांचे विशेषज्ञ आहेत. ते आव्हानात्मक निदान करण्यात मदत करतात आणि सर्व प्रकारच्या संधिवात हाताळतात. एकदा निदान झाल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार योजना दिली जाईल. आपल्याला दररोज आपली लक्षणे व्यवस्थापित करण्यासंबंधी माहिती दिली जाईल. म्हणून, संधिवात असलेल्या लोकांनी आशा गमावू नये आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास जीवनाची गुणवत्ता वाढवता येते.

मेहकर येथील डीसीसी बँकेचे मॅनेजर रामराव सूर्यवंशी यांना निरोप समारंभ संपन्न

संपादक, मोईन सय्यद / मेहकर प्रतिनिधी, गुरुप्रसाद मेंटे

भालकी, मेहकर : सीमाभागातील भालकी तालुक्यातील मेहकर येथील डीसीसी बँक मॅनेजर रामराव सूर्यवंशी हे मेहकर येथे दहा वर्ष चांगली सेवा देऊन भातंबरा येते त्यांची बदली झाल्याने त्यांना मेहकर , तुगाव हल्सी, आटरंग, आळवाई, येथील पिकेपीएस सोसायटीचे सर्व चेअरमन, व व्हाईस चेअरमन, व सदस्य व सर्व कर्मचारी यांच्या वतीने मॅनेजर रामराव सुर्यवंशी यांना शाल पुष्पहार श्रीफळ व फेटा देऊन सात्विक सत्कार करण्यात आला.

यावेळी बदली होऊन जाणारे व नवीन येणारे मॅनेजर अण्णाराव बिरादार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी विनायकराव पाटील, अशोकराव पाटील, मारुतीराव मगर, अनिरुद्ध पाटील ग्रामपंचायतीचे, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व गावातील, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार मूर्ती मॅनेजर रामराव सूर्यवंशी, अण्णाराव बिरादार कॅशियर तुकाराम राजनाले, संदीप शिंदे, सेवक नरसिंग पवार सह मेकहर, तुगाव, आटरगा, सोसायटीचे अध्यक्ष सदस्य व सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून मॅनेजर रामराव सूर्यवंशी व सेवानिवृत्त नरसिंगराव पवार यांना सोन्याची अंगठी व शाल पुष्पहार फेटा देऊन सात्विक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उत्तम वक्ते अशोक बापुराव पाटील व आभार प्रदशन ज्ञानोबा मलकापूर यांनी मानले.

संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं – डॉक्टर

फ्लुच्या संसर्गाचा धोका वाढतोय…

संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं – डॉक्टर

संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे

पुणे: इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला ‘सिझनल फ्लू’ म्हटले जाते. या ‘फ्लू’ पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध असून त्याला फ्लू शॉट्स असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लू’पासून बचावासाठी ही लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ‘फ्लू’ विरोधातील लसीमुळे ‘इन्फ्लूएन्झा’ व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात म्हणून वेळीच फ्लू ची लस घेऊन त्यास प्रतिबंध करण्याचे आवाहन तज्ञ डाँक्टरांनी केले आहे. ताप, अंग दुखणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर सूज येणे यासारख्या दुष्परिणामांमुळे फ्लू शॉट्स घेण्यापासून स्वतःला थांबवू नका कारण ते दुष्परिणाम एक ते दोन दिवसात निघून जातात.

पुण्याच्या अपोलो क्लिनिकचे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले की, फ्लू तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि दम्यासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लूची लस मिळाल्याने आजाराची गंभीरता कमी होईल आणि फ्लूशी संबंधित हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका देखील कमी होईल. फ्लू लसीकरण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गंभीर गुंतागुंतीपासून वाचवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे न्युमोनिया होतो. जर तुम्हाला आधीच फ्लू असेल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते आणि तुम्हाला कोविड संसर्गास बळी पाडते.

डॉ.बुधवानी पुढे म्हणाले की, फ्लू लस घेतल्याने सह-संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. कारण, फ्लू आणि कोविड -१९ दोन्ही एकाच वेळी होण्याची शक्यता अधिक आहे. जरी ते दोन्ही सांसर्गिक श्वसनाचे आजार असले तरी वेगवेगळे विषाणू त्यांना कारणीभूत ठरतात आणि तुम्ही कितीही निरोगी असलात तरी फ्लू आणि कोविड -१९ च्या लसीकरणानंतर इंजेक्शन साइटवर वेदना आणि सूज, अंगदुखी, ताप येणे,थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात. दुष्परिणामांच्या भीतीमुळे लस घेणे टाळू नका. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लूचे रुग्ण अधिक आहेत. या वर्षात ५,००० हून अधिक फ्लूचे रुग्ण दिसले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका असतो.

पुण्यातील अपोलो डायग्नोस्टीकचे डॉ. कीर्ती कोटला म्हणाले की, ज्या रुग्णांमध्ये –हदयविकाराच्या समस्या आहेत अशा रुग्णांमधील –हदविकाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लू शॉट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या रुग्णामध्ये फुफ्फुसाचा आजार जसे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) बिघडण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे सहा महिने आणि त्याहून अधिक वयाचा कोणीही फ्लू शॉट घेऊ शकतो. तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि नंतर लस घ्या