Home Blog Page 193

भटके विमुक्त जमातीच्या एक संघ आंदोलन केल्याने शासनाचे नमते पाऊल

संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे

भटके विमुक्त जमाती साठी दिलेले प्रतिज्ञापत्र शासन वापीस घेणार! – विजय वड्डेटीवार बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन

न्याय मिळे पर्यंत व असे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या सचिवावर हक्क भंग कारवाई होई पर्यंत आंदोलन सुरूच राहणार संघर्ष वाहिनी

मुबंई: आज जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) सामान्य प्रशासन विभाग पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत

आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात पहिले पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
1. राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल.
2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांचे देखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही,असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांनादेखील पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 प्रमाणे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. ते कायम ठेवण्यात यावे,असे मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये राज्यातर्फे मांडण्यात यावे.
3. वरील बाबी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात यावे.
4. सदर प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. असे आज मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आले आहे.

गुन्हे शाखा घटक -३ कल्याण कडून ६ वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: दि.०९.१०.२०२१ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गु.र.न. I 108/2015 भादवि कलम 394, 34 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1), (II), 3(2), 3(4) प्रमाणे मधील पाहिजे असलेला आरोपी नामे-सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-31 वर्षे रा. स्वतःचे घर इंदिरानगर,आठाळी रोड,आंबिवली स्टेशन जवळ आंबिवली मुळ राहणार-तहसील पिपरिया राम मनोहर लोहिया वार्ड, होशांगाबाद मध्यप्रदेश हा सहा वर्षांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.

प्रस्तुत गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना हवा असलेला आरोपी याचा पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याचे खात्रीशीर माहिती काढून सदर ठिकाणी सापळा रचून पाहिजे असलेला आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेअंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. सदर आरोपी याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) एम् एफ सी पो.स्टे. I 52/2015 भादवि कलम 394,34 प्रमाणे
2) एम् एफ सी पो.स्टे. I 90/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
3) एम् एफ सी पो.स्टे. I 237/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
4) एम् एफ सी पो.स्टे. I 287/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
5) आर.के.मार्ग पो.स्टे. I 32/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
6) आर.के.मार्ग पो.स्टे. I 41/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
7) आर.के.मार्ग पो.स्टे. I 44/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
8) आर.के.मार्ग पो.स्टे. I 51 /2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
9) आर.के.मार्ग पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
10) मानपाडा पो.स्टे. I 286/2010 भादवि कलम 394,34 प्रमाणे
11) ताडदेव पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांच्याकडे रिपोर्टसह जमा करण्यात आला आहे.

तसेच प्रस्तुत आरोपी हा आणखी कोणत्या गुन्ह्यात पाहिजे आहे अगर कसे त्या विविध पोलीस ठाण्यात तपास यादी पाठवण्याची तजवीज ठेवली आहे.

प्रस्तुत कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी , सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

 

अट्टल मोबाईल चोरटा डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात, ३ लाख ४० हजार किंमतीचे चोरीचे ३१ मोबाईल हस्तगत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली परिसरात चालत्या वाहनातून लोकांचे मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुफियान उर्फ सद्दो मलिक बागवान असे या अट्टल चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ३१ मोबाईल स्मार्टफोन हस्तगत केले आहेत.

एमआयडीसीतील पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वॉचमनचा स्मार्टफोन बाईकवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी वॉचमनने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही माहिती किंवा घटनास्थळावरील कोणताही पुरावा नव्हता. त्याचदरम्यान खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील साईबाबा मंदिर परिसरात राहणाऱ्या सुफियानला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत त्यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ४० हजारांचे ३१ स्मार्टफोन आणि मोबाईल चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त केल्याची माहिती एसीपी जयराम मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच त्याच्यावर कोळसेवाडी, डोंबिवली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दिपक गडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे, पवार, यल्लप्पा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा यांनी ही दमदार कारवाई केली.

 

डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दिनांक ०८/१०/२०२१ रोजी उप प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण व वाहतूक विभाग डोंबिवली यांनी डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ८० रिक्षाचालकावर दांडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण सुमारे १,१३,०००/-रुपये (सुमारे एक लाख १३ हजार रुपये) असा दंड आकारण्यात आला आहे. तसेच २ रिक्षा जमा करण्यात आली आहेत.

डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे डोंबिवली वाहतूक शाखेकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यानेच दिली वीस लाखांची सुपारी! कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्यावरील गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

भाईंदर, ०६ ऑक्टोबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला होता त्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

मोटारसायकल वरून आलेल्या अमित सिन्हा आणि अजयसिंह या दोन इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाल्या नंतर मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ चे गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी समांतर तपास करत उत्तर प्रदेशच्या भदोहीं व गाजीपुर येथून दोन आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता हा गोळीबार का करण्यात आला? याची धक्कादायक माहिती मिळाली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेचे नगर रचना विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि देशमुख यांनीच दीपक खांबीत यांना ठार मारण्यासाठी वीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.

श्रीकृष्ण मोहिते आणि देशमुख हे 2004 पासून मिरा भाईंदर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला श्रीकृष्ण मोहिते हे अतिक्रमण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असताना सुपारी घेऊन अनेक बांधकामे तोडण्याचे आणि अनेक बांधकामे वाचविण्याचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यावेळेस मोहिते यांनी भरपूर माया गोळा केली असल्याची चर्चा देखील केली जात होती. त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना अनेक महिने निलंबित करण्यात आले होते. आणि नंतर ज्यावेळी त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले त्यांना कमी महत्वाच्या विभागात पाठवण्यात आले होते.

त्यानंतर वेळोवेळी होणाऱ्या पदोन्नती मध्ये या दोघां कनिष्ठ अभियंत्यांना दीपक खांबीत हे दरवेळी डावलत होते. त्यांना महत्वाच्या विभागात नियुक्ती देखील मिळू देत नव्हते या गोष्टींचा राग मनात ठेवून मोहिते आणि देशमुख यांनी खांबीत यांना संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच मोहिते आणि देशमुख यांनी अमित सिन्हा याला खांबीतला ठार मारण्यासाठी वीस लाखांची सुपारी दिली होती. त्या वीस लाखांपैकी दहा लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते व काम झाल्यानंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

दीपक खांबीत यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या सदरील घटनेत सुखरूप असले तरी त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. मात्र या घटनेनंतर मिरा भाईंदर महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचारी यांच्या मधील वाद किती विकोपाला गेला आहे याची कल्पना येते. त्याच बरोबर आणखीन एक गोष्ट समोर आली आहे की मिरा भाईंदर महानगरपालिकेवर कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांचे एकछत्री राज्य चालत आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याला पदोन्नती द्यायची किंवा नाही द्यायची हे दीपक खांबीतच ठरवत असल्याचे दिसून येत आहे.

दीपक खांबीत यांच्यासोबत, शहर अभियंता शिवाजी बाराकुंड, मुख्य लेखाधिकारी शरद बेलवटे, सहायक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, दिलीप घेवारे, उद्यान विभागातील हंसराज मेश्राम या अधिकाऱ्यांशी गेल्या अनेक वर्षांपासून वाद-विवाद सुरू होते हे सर्वांनाच माहीत होते पण हे वाद कधी उघडपणे चव्हाट्यावर आले नव्हते. अनेक अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीच्या प्रकरणात दीपक खांबीत हस्तक्षेप करून त्यांची पदोन्नती होऊ नये किंवा त्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या विभागात बदली होऊ नये म्हणून हस्तक्षेप करीत असल्याचे आरोप अनेक अधिकारी छुप्या पद्धतीने करीत होते परंतु त्यांच्या विरोधात कोणत्याही अधिकाऱ्यांनी उघडपणे बोलण्याची हिम्मत दाखवलेली नव्हती.

कनिष्ठ अभियंता मोहिते व देशमुख यांनी दीपक खांबीत यांना ठार मारण्याची वीस लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांना संपविण्याचा कट रचला गेला यावरून अधिकाऱ्यांमध्ये दीपक खांबीत यांच्या विरोधात इतर अधिकाऱ्यांच्या मनात किती राग भरलेला होता हे दिसून येत असून यावरून मिरा भाईंदर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बादल्या आणि पदोन्नत्या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना शैक्षणिक पात्रता नसताना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत, खुद्द दीपक खांबीत यांची नियुक्ती देखील वादग्रस्त असून त्यांना मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या प्रकरणाच्या विरोधात तत्कालीन विधानपरिषद सदस्य बबनराव घोलप आणि मुजफ्फर हुसैन यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न देखील मांडला होता. परंतु नंतर या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असून हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले आणि दीपक खांबीत यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले असल्याचे आरोप त्यावेळी करण्यात येत होते.

दीपक खांबीत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणा नंतर हे सगळे वाद चव्हाट्यावर आले असून मिरा भाईंदर महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पदोन्नत्या कशा प्रकारे बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे आता तरी महाराष्ट्र शासन या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करणार का? शैक्षणिक पात्रता नसताना ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, नियुक्ती करण्यात आली त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.