Home Blog Page 198

परवाना नसलेल्या ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ वर गुन्हे शाखा घटक-३ ची धडक कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १०/०९/२०२१ रोजी कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड येथील ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ कल्याण पूर्व येथे बार मालक व चालक हे विना नोकरनामा व कोणताही परवाना नसताना बार मध्ये ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देऊन गिऱ्हाईकांना रिचवून आकर्षित करण्याकरिता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून सेक्सी हावभाव करून अश्लील कृत्य करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वपोनि विलास पाटील व पथकाने ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ मध्ये २०:५५ वाजण्याच्या सुमारास छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण २१ महिला विनामास्क तोकडे कपडे परिधान करून ३० गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व सेक्सी हावभाव करत असताना मिळून आल्या. तसेच बारमध्ये एकूण ६३,४१०/- रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे मनोरंजन व महिलांना अश्लील हावभाव करण्याकरिता गाणी वाजवण्यासाठी मिक्सर व एम्प्लिफायर असे एकूण १४,५००/- रुपये किंमतीचे असे एकूण रुपये ७७,९१०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा धोका माहीत असताना व तसे समजण्यास कारण असताना वर नमूद बारचालक, मॅनेजर, वेटर, महिला व ग्राहक यांनी एकत्रित जमून मास्क परिधान न करता व परस्परांमध्ये योग्य ते अंतर दिसून आले नाही म्हणून त्यांच्या विरोधात सपोउनि व्ही.डी. मालशेटे नेमणूक गुन्हे शाखा घटक-३ यांच्या फिर्यादीवरून दि.११/०९/२०२१ रोजी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.नं ४७७/२०२१ भादवि कलम २९४,१८८,२६९,२७०,३४ सह केडीएमसी मनाई आदेश सह कोविड-१९ उपाय ईजना नियम २४ चे नियम ११ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५२ सह साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम १९९७ चे कलम २,३,४ सह मपोकाक ३३(W)१३१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील २१ महिला, बारचालक, वेटर असे मिळून ०५ इसम व ३० ग्राहक यांना पुढील कारवाई करिता मानपाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि दायमा, पोउनि कळमकर, सपोउनि मालशेटे, पोहवा शिर्के, पोहवा किशोर पाटील, पोहवा कामत, पोहवा प्रकाश पाटील, पोना सुरेश निकुळे, पोशि मिथुन राठोड, चापोशि राहुल ईशी, मपोशि मालती ठाकरे नेम-कोळशेवाडी पोस्टे, मपोशि जयश्री आंधळे नेम-कोळशेवाडी पोस्टे यांनी केली आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत तात्काळ द्यावी – चंद्रकांत कारके


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे,नद्या नाल्या वाहुन गेल्या असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे व पशुधांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे गोर-गरीब वंचित जनतेला विविध संकटाचा सामना करावा लागत आहे तेव्हा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगट भरीव आर्थिक मदत तालुका प्रशासनाने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अंबड तालुक्याच्या वतीने आज सकाळी ११.३० वा.अंबड चे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा संघटक चंद्रकांत कारके, जिल्हा उपाध्यक्ष सतीष खरात, जिल्हा प्रवक्ते सुभाष ससाने, तुकाराम धाईत, शहराध्यक्ष अशोक साळवे, तालुका सहसचिव आनंद खरात, भिमराव तांबे, सुरेश वाहुळे, अंबादास जाधव,अतिश खरात, अभिजित शिरगोळे, विक्की डोंगरे, दिपक पिसुळे, सुधाकर कसार, विकास खरात, संदिप डोंगरे, अनिल उघडे, राजेंद्र राठोड, सौ.ताराबाई कांबळे, नन्नु सुतार, रामेश्वर केदार, गणेश उबाळे, तुकाराम माळी, प्रमोद कारके, सचिन तुपसैंदर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली.

नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुजरात मध्ये विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा
राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गोरधन झडफिया यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजपा नेतृत्त्वानं भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली आहे. मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजपा नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर ‘#सीएमनहींपीएम_बदलो’ ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, ‘सीएम नाही, तर पीएम बदला’ असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही, असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र, असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.

देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही ? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार ? असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील काँग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला याचा काँग्रेसने निषेध केला आहे. “तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही ?” असा बोचरा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या १० महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्याचा कट रचत आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

टीका करण्यापेक्षा शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे : बाळासाहेब थोरात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशात काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करण्याने काही नुकसान होणार नाही. समविचारी असलेल्या लोकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आल्यास काँग्रेसला चांगले दिवस येतील आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई एकत्र लढावी असे आवाहनच बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांनी पलटवार करत सदर आवाहन केलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. असे शरद पवार यांनी म्हटले असून त्यांच्या विधानाशी मी असहमत आहे. पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर राजकीय फायद्यासाठी टीका केली तरी काँग्रेसचे त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या विचाराचे जे लोकं आहेत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी सोबत लढाव असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी करत राष्ट्रवादीला आवाहन केलं आहे.

देशात धार्मिक भेदभाव करणारे लोकं अधिक झाल्यामुळे काँग्रेसच्या विचाराला कठीण दिवस आले आहेत. काँग्रेस हा एक विचार आहे. आपण सर्व एका विचाराचे आहोत, त्यामुळे पुन्हा एकत्र सर्व आले तर काँग्रेसला यापुढे चांगले दिवस येतील असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विरोधकांना सोबत घेतलं आहे

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयावर चर्चा करुन कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसारच सर्व मिळून चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या जसं बोलतात तशी ‘ईडी’ कारवाई करते यामुळे भाजपच्या इशाऱ्यावर ‘ईडी’ चालते असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे जनता जाणून असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होण्याचा अंदाज आहे.