Home Blog Page 203

लाखों रुपये खर्च करून जलवाहिनी टाकली तरी गेली अनेक वर्षे केशवसृष्टी जवळील खाडीवर गाव तहाणलेलाच!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील केशवसृष्टी परिसरात असलेला खाडीवर नावाचे गाव जिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कुटुंब राहातात. हे गाव मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असून देखील गेली अनेक वर्षे ह्या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आजही ह्या गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत.

वर्ष २०१७ साली येथील स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून या गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक १० हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधली होती. या टाकीमध्ये महानगरपालिकेच्या टँकर द्वारे आठवड्यातून तीन वेळा पाणी टाकून खाडीवर या गावाच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता.

वर्ष २०१९ साली टँकर मुक्त मिरा भाईंदर या योजनेमुळे या गावाचा टँकर द्वारे केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकून घेतली परंतु या ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे या गावाला अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे या गावचे नागरिक आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.

महानगरपालिकेचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे सध्या या गावचे नागरिक नाईलाजाने परिसरातील विहिरी आणि तलाव यांचे दूषित पाणी पिण्यास अवलंबून आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी खाडीवर या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांचेकडे केली असून त्यांच्या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गाडीला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून १८ वार्षीय मुलावर हल्ला करून केले ठार!
लाल रंगाचा टीशर्ट घातल्यामुळे झाला हल्ला?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

मिरारोड: सिल्व्हर पार्कमधील एका १८ वर्षीय मुलाची गाडीला ओव्हरटेक करुन कट मारल्याचा शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली या मारहाणीत हटकेश परिसरात सिल्व्हर सरिता येथे राहणारा शुभम शांताराम भुवड नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी नऊ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काशिमीरा परिसरात आरोपी दुचाकीवरुन जात असताना एका लाल टी-शर्ट घातलेल्या मुलाने त्यांना ओव्हरटेक करून मागे टाकले. त्याने आरोपीच्या बाईकला खूप जवळून कट मारली ज्यामुळे दुचाकीस्वार चिडले. त्यांनी त्या लाल टीशर्ट घातलेल्या मुलाला शोधायला सुरुवात केली.

हटकेश परिसरात लवकरच त्यांना लाल टीशर्टमध्ये दुचाकीस्वार दिसला. त्या नंतर ९ जणांच्या गटाने त्याला पकडून त्याच्यावर निर्घृण हल्ला केला. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काशिमीरा पोलिसांनी विनोद उपाध्याय(४४),  आकाश हिरवे(२५), कुणाल किणी(३३), सनी उपाध्याय(२५), वसीम अल्ताफ शेख(३२), राजू इर्शाद शेख(३२), सायस मुंढे(१९), जतीन उपाध्याय(२१) या आठ जणांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर रवी पुजारी नावाचा आरोपी सद्ध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

आरोपी पैकी काहीजण हे घोडबंदर परिसरातील असून वाळू माफिया असल्याचे बोलले जात आहे. त्यांचेवर बेकायदेशीर वाळू उपसा केल्याचे अनेक गुन्हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम भुवडवर झालेला हल्ला हा लाल रंगाच्या टीशर्ट घातल्याने  चुकीची ओळख झाल्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. ज्या मुलाने आरोपींच्या
मोटारसायकलला वेगाने ओव्हरटेक करून अगदी जवळून कट मारली त्याने लाल रंगाचा टीशर्ट घातलेला होता, आरोपी त्या लाल रंगाचा टीशर्ट घातलेल्या व्यक्तीला हटकेश परिसरात शोधत असताना त्या दिवशी शुभम भुवड ह्याने देखील लाल टीशर्ट घातलेला होता.

शुभम आपल्या मित्रा सोबत फॉरचून हाईट्स या इमारतीसमोर आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. आपल्या गाडीला कट मारणारा लाल रंगाचा टीशर्ट घातलेला हाच मुलगा आहे असा समज झाल्यामुळे आरोपींच्या टोळक्याने शुभमवर प्राणघातक हल्ला करून ठार केले.

शुभम भुवड नावाच्या मुलावर हल्ला नक्की गफलतीत झाला? की हा हल्ला पूर्वनियोजित ठरवून करण्यात आला? याचा पुढील तपास काशीमीरा पोलीस करीत असून शुभम भुवड नावाच्या १८ वार्षीय मुलाच्या हत्येचे नेमके कारण लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कल्याण वाहतुक पोलीसांची स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर धडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वृत्त प्रसिद्धीसाठी मिळालेली हकीगत अशी की दिनांक ०६.०७ २०२१ रोजी २०:१४ वा विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १४६/२०२१ भादवि कलम ४५४, ३८० दखल असून सदर गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद दरवाज्याचे कुलूप लावलेला कोयंडा उचकटून कडी उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेले व लॉक न लावलेले लोखंडी कपाटाच्या तिजोरीमधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण रुपये १,२६,०००/- किंमतीचे अंदाजे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या पायातील एक जोडी मासेळी असा मुद्देमाल घरफोडी करून नेला म्हणून गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशन चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा के एम. नलावडे, पोशि के ए. भामरे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे किसन महादेव व्हनकोरे (वय २५ वर्षे) राहणार धाकटा खांदा, रेल्वेब्रिज व पटरी जवळ, पनवेल, नवी मुंबई हा धाकटा खांदा, झोपडपट्टी परिसरामध्ये रेल्वेब्रिज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व त्यास वरील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी परिमंडळ-३ कल्याणचे मा. पोलीस उप आयुक्त श्री.विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग श्री.जयराम मोरे व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा के एम. नलावडे, पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा एस एन.नाईकरे, पोना बी के.सांगळे, पोना टि एच.लोखंडे, पोना एस के.कुरणे, पोशि के ए.भामरे, पोशि एम एस.बडगुजर, पोना एस एस.कांगुने, पोशि व्ही एस.महाजन यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

अट्टल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास विष्णू नगर पोलिसांनी केले शिताफीने अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वृत्त प्रसिद्धीसाठी मिळालेली हकीगत अशी की दिनांक ०६.०७ २०२१ रोजी २०:१४ वा विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १४६/२०२१ भादवि कलम ४५४, ३८० दखल असून सदर गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद दरवाज्याचे कुलूप लावलेला कोयंडा उचकटून कडी उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेले व लॉक न लावलेले लोखंडी कपाटाच्या तिजोरीमधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण रुपये १,२६,०००/- किंमतीचे अंदाजे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या पायातील एक जोडी मासेळी असा मुद्देमाल घरफोडी करून नेला म्हणून गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशन चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा के एम. नलावडे, पोशि के ए. भामरे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे किसन महादेव व्हनकोरे (वय २५ वर्षे) राहणार धाकटा खांदा, रेल्वेब्रिज व पटरी जवळ, पनवेल, नवी मुंबई हा धाकटा खांदा, झोपडपट्टी परिसरामध्ये रेल्वेब्रिज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व त्यास वरील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी परिमंडळ-३ कल्याणचे मा. पोलीस उप आयुक्त श्री.विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग श्री.जयराम मोरे व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा के एम. नलावडे, पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा एस एन.नाईकरे, पोना बी के.सांगळे, पोना टि एच.लोखंडे, पोना एस के.कुरणे, पोशि के ए.भामरे, पोशि एम एस.बडगुजर, पोना एस एस.कांगुने, पोशि व्ही एस.महाजन यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

 

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३६४ येथील बांधलेल्या अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई

संपादक: मोईन सय्यद/ मिरारोड प्रतिनिधी

मिरारोड : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून गेल्या काही आठवड्यापासून अशी अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली जात आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनाधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेजेस, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत झोपड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शहरात अशा प्रकारे सरकारी जागेवर अथवा आरक्षित जमिनीवर वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकामे उभी राहतात, त्यांच्या अनेक तक्रारी देखील केल्या जातात मात्र त्या त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या संगनमताने या अनधिकृत बांधकामांना कर आकारणी केली जाते, पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिले जाते, दिवाबत्ती, रस्ते नाले, गटार, सौचालय इत्यादी सुविधा पुरविल्या जातात तेव्हां महानगरपालिका अधिकारी डोळे मिटून बसलेले असतात.

अनेक वर्षे उलटून गेल्यावर एकतर न्यायालयाचे आदेश आल्यावर किंवा आरक्षित जमीन विकसित करण्याची गरज भासल्यास या अधिकाऱ्यांना आठवण येते की ही सर्व बांधकाम अनधिकृत आहेत. मग त्या ठिकाणी वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांचा कसलाही विचार न करता ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकली जातात आणि शेकडो कुटुंब उघड्यावर पाडली जातात. हे दुष्टचक्र गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले आहे.

अनधिकृत बांधकामा बाबत अनेक नियम आहेत कायदे आहेत, उच्च न्यायालया पासून सर्वोच्च न्यायालया पर्यंत अनेक आदेश आहेत मात्र सर्व नियम कायदे आदेश धाब्यावर बसवून ह्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जाते.

आताही अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या झोपड्या २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रभाग क्रमांक ६ येथील आरक्षण क्रमांक ३६४ या उद्यान आरक्षणावर मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली काशिगावं येथील आरक्षण क्रमांक ३६४ येथे ३०० अनधिकृत बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच एकूण ३० मीटर डी.पी रस्ता आणि १.५ एकर जागा रिकामी करण्यात आली.

सदरची कारवाई आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपायुक्त अमित काळे, काशिमीरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, नगररचना विभागाचे श्रीकृष्ण मोहिते, प्रभाग क्रमांक १ ते ६ चे सर्व प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक माणिक पाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.