Home Blog Page 214

राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाही, त्यासाठी वाट पाहावी लागणार : राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना महामारीचं महाभयंकर संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र कालपासून श्रावण महिणा सुरु झाला असून हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या सगळ्या स्तरातून जोर धरू लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.

त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘तसेच मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत थोडी वाट पहावी लागेल.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान तज्ज्ञांनी शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात आणि मंदिर सुरू करण्याची राज्य सरकारने घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजचा निर्णय संबंधित विभाग घेतील. मंदिरे उघडण्यासाठी आणि लग्नसराई कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी थोडी वाट बघू. घाई गडबडीने काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काही अनर्थ होऊ नये, संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या गोष्टींच्या काळजी पोटी मुख्यमंत्र्यांनी काही काळजीपूर्वक गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे याबाबत थोडी वाट बघावी लागेल.’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दोन दिवसात मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिरे खुली न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमांना यावेळी बोलताना सांगितले.

मीरा भाईंदर शहरातील रंगमंच कलकारांचे वाद्ययंत्रासह आंदोलन

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी

भाईंदर: कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी म्हणजेच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार नष्ट झाला आहे.

लॉकडाउनच्या नियमामुळे नाट्यगृह, सिनेमागृह आणि रंगमंच अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचा रोगजार नष्ट झाला असून आता त्यांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याच विषयावर शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता मीरा- भाईंदर शहरातील रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र व निर्भय भारत सामाजिक संगठना सांस्कृतिक विभाग यांच्या तर्फे भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट सर्कल येथे सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास रंगमंचावर आपली कला सादर करणाऱ्या विविध कलाकारांना सोबत घेऊन आपल्या हक्कासाठी हातात न्याय मागणारे फलक धरून शांततेत आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे नाट्य कलाकाराना स्वतःचे जीवन जगणे आता कठीण झाले असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

इतर दुकाने, कारखाने, छोटे मोठे उद्योग आता हळूहळू सुरू होऊ लागले आहेत मात्र थिएटर, नाट्यगृह, सिनेमागृह यांच्यावर अद्यापही बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे जगणे कठीण झाले आहे. रंगमंच, नाट्यगृह यावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यासाठी ‘रंगमंच कलाकारांनी आपआपल्या वाद्ययंत्रासह आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी कलाकारांनी “कोरोना ने मरु कि नाही माहीत नाही भुखेने मात्र नक्कीच मरु” अश्या प्रकारची घोषणाबाजी करत स्वतःच्या हातात मला माझे वाद्ययंत्र विकायचे आहे असे लिहलेले फलक धरले होते. या आंदोलनात 300 पेक्षा जास्त रंगमंच कलाकार उपस्थित होते.

या आंदोलना नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वात कलाकारांनी नवघर पोलिसांना तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले. या आंदोलनात निर्भयभारत सामाजिक संगठनचे अध्यक्ष अंकुश मालुसरे, अभिजीत घोषाल, कुलदीप मालुसरे, रोहित गुप्ता, समृद्धि कारेकर, एलेक्स पिल्लई, सचिन जावळे, अशोक गेहलोत, राकेश गेहलोत, प्रगति तुरेकर, रविंद्र अल्हाट, मनीष सोलंकी, वासु पाटिल, कौस्तुभ कारेकर, अमर थोरात, चंद्रकांत करजावकर, राजीव, संदीप येल्वे, प्रकाश चौहान, राजेश तिवारी, आशीष मिस्त्री, भरत रामजी सोलंकी, सिंगर देवा, सूर्यकांत चव्हाण, अरुण सोलंकी, हिरन डोबरिया, दिगंबर पांचाल व इतर रंगमंच कलाकार उपस्थित होते.

आधारवाडी जेल च्या स्वच्छतागृहात सापडल्या मोबाईलसह संशयास्पद वस्तू ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या आधारवाडी कारागृहाच्या स्वच्छतागृहात मोबाईल, वायरचा मोठा तुकडा, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड, टाचण्या आणि एमसील या वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या वस्तू कोणी आणि कश्या आत आणल्या याचा तपास सुरू असून जेल प्रशासनाने अज्ञात व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आधारवाडी कारागृहाचे हवालदार संदीप शेट्ये हे शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या आतमध्ये सुरक्षाव्यवस्था पाहण्याचे काम करीत असताना त्यांना सर्कल क्रमांक-३ च्या खोली क्रमांक ७ मध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्या. त्यांनी तत्काळ तुरुंग अधिकारी धीरजकुमार रुकमे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तातडीने खोलीच्या शौचालयाची झडती घेतली असता तेथे असणाऱ्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये एक लोणच्याची बाटली ठेवल्याचे आढळून आले. ही बाटली उघडून तिची तपासणी केली असता त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, वायरचा मोठा तुकडा, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड, टाचण्या आणि एमसीलच्या २ पुड्या आढळून आल्या. कारागृहात इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही एकाच वेळी एव्हड्या सर्व वस्तू सापडल्याने जेल प्रशासनही बुचकाळ्यात पडले आहे. कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी तुरुंगातल्या कैद्यांकडे चौकशी केली असता या वस्तूंविषयी काहीच माहीत नसल्याचे सांगितले.

दरम्यान, हे साहित्य तुरुंगातील बरेकमध्ये कसे पोहोचले याचा शोध घेतला जात आहे. तर हवालदार संदीप शेट्ये यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे तुरुंग अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘पॉक्सो’ अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल !

     

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर मध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी रोशन माखिजा व पंकज त्रिलोकानी ह्यांच्यावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक १४/०५/२०२१ रोजी मनोज तोलानी व त्यांची अल्पवयीन मुलगी आरती तोलानी हे दोघे घरी असताना सकाळी रोशन माखिजा व पंकज त्रिलोकानी त्यांच्या घरी येऊन मनोज तोलानी ह्यांच्याकडे काही काम आहे असे सांगून घरात घुसले.

ओळखीचे असल्याने त्यांनी त्या दोघांना घरात घेतले असता ह्या दुकलीने त्यांना सांगितले के आमचा एक साथीदार पण भेटायला येणार असल्याने आम्ही त्याला तुमच्याच घरी बोलावले आहे, तरी तुम्ही काही नाश्ता घेऊन या असे सांगून त्यांच्या खिशात ₹ २०००/- टाकले व बाकीचे पैसे तुम्हाला ठेवा असे म्हटले, मनोज तोलानी घरा बाहेर पडताच ह्यांनी सदर अल्पवयीन मुलगी घरातील भांडी धूत असताना रोशन माखिजा ह्याने तिला मागून मिठी मारली व चुंबन घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरड चालू केली तितक्यात पंकज त्रिलोकानीने तिचे तोंड दाबले व तिच्या शरीराशी अश्लील चाळे करू लागले सदर मुलगी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण हे दोन्हीही नराधम तिच्यावर तुटून पडले त्याच क्षणी, कोणीतरी दरवाज़ा ठोठावला म्हणून तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बाहेर पळाली व तिला स्वतःला वाचवण्यात यश आले.

त्या नंतर हि दुकली घराबाहेर पडली व तिथून निघून गेले, हि बाब जेव्हा तिच्या कटुंबाला माहिती पडली तेव्हा त्यांनी सदर घटने बाबत पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत झोन-४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त डी.डी टेळे ह्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले असता त्यांनी सदर घटने बाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. दिनांक ०६/०८/२०२१ रोजी हा गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पण अजून कोणालाही अटक केलेली नाही.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे रोशन व पंकज हे गेली २ महिने फरार आहेत कारण ह्यांच्यावर गुन्हे शाखा, ठाणे इथे पण एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे, उल्हासनगर स्थित असलेल्या एका व्यापाऱ्याला गँगस्टर सुरेश पुजारी ह्याच्या मार्फत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. रोशन माखिजा हा कुख्यात गुन्हेगार आहे ह्याच्यावर ह्यापूर्वी पण भादवि कलमानुसार ३०७, ४२० इत्यादी गुन्हे दाखल आहेत, गुन्हे शाखा, ठाणे व उल्हासनगर पोलीस त्यांचा कसून तपास घेत आहेत.

पुण्यातील नामचीन बिल्डर अविनाश भोसले ला ‘ईडी’ चा दणका; ४ कोटींची संपत्ती केली जप्त..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ‘ईडी’ने मोठा झटका दिला आहे. भोसले यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली आहे. पुण्यातील ‘अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची जागा ‘ईडी’ने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत सुमारे चार कोटी रुपये एवढी आहे.

अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले हे गेल्या काही दिवसांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली गेली. अविनाश भोसलेंनी पुण्यातील एक एकर जागेवर बांधकाम केलं आहे. ती जमीन सरकारी आहे. यामुळे भोसले यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. दरम्यान, आज ईडीने अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

‘ईडी’ने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत ‘ईडी’ ने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ‘ईडी’ने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत भोसले यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी सुद्धा त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती.